शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

केडीएमटीच्या आगाराला ‘तौक्ते’चा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम आधीच डबघाईला आला आहे. दुसरीकडे त्याकडे पालक संस्था असलेल्या कल्याण-डोंबिवली ...

कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम आधीच डबघाईला आला आहे. दुसरीकडे त्याकडे पालक संस्था असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. गणेशघाट आगारातील जीर्ण अवस्थेतील कार्यालयांची डागडुजी करण्याची वारंवार मागणी करूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सोमवारच्या तौक्ते चक्रीवादळाचाही आगाराला तडाखा बसला आहे. कार्यालयांवरील तसेच रॅम्पवरील जुने सिमेंटचे पत्रे वादळात उडून गेल्याने सध्या उपक्रमाला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २३ मे १९९९ ला प्रारंभ झाला. तेव्हापासून ते आजतागायत उपक्रमाच्या मुख्य गणेशघाट आगारातील कार्यालयांची डागडुजी करायला प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे तेथील कारभार हा धोकादायक अवस्थेतील कार्यालयांतून सुरू असल्याने भविष्यात जीवित हानीही हाेऊ शकते. सोमवारच्या तौक्ते चक्रीवादळात कार्यालयांवरील सिमेंटचे पत्रेच उडून गेले. कर्मचाऱ्यांचा राबता असलेल्या दोन इमारती, सुरक्षारक्षकांची इमारत आणि रॅम्पवरचे पत्रे उडून तेथील काचेचेही नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी परिवहन सभापती मनोज चौधरी, व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत आणि आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री बांधून सध्या कामकाज सुरू केले आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी येथील इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी निधीही मंजूर झाला. पण पुढे कृतीच झालेली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून, कुणाच्या जिवावर बेतले तरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल सभापती चौधरी यांनी केला आहे.

------------------------------------------------------

सरकारकडून घोर निराशा

दि. २६ व २७ जुलै २००५ ला आलेल्या महापुरात केडीएमटीचा गणेशघाट आगार पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात बसगाड्यांसह तेथील मालमत्तेचे सुमारे एक कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून, पूरपरिस्थितीने नुकसान झालेल्या उपक्रमास आर्थिक साहाय्य मिळण्याबाबत मागणी केली होती. सध्या या महापुराच्या घटनेला १६ वर्षांचा कालावधी उलटूनही उपक्रमाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. २०१९ च्या जुलै आणि ऑगस्टच्या पूरपरिस्थितीतही आगारातील बसचे नुकसान झाले होते. तेव्हाही इन्शुरन्सवर उपक्रमाची मदार राहिली. यात ३० ते ३५ लाखांचे उपक्रमाचे नुकसान झाले. याशिवाय ३० ते ३५ तिकीट ट्रे पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात तिकिटेही भिजली होती. तेव्हा तेथील ३० फूट उंच असलेल्या संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पडले होते, तर आगारातील अन्य ठिकाणची १०० फूट लांब संरक्षक भिंतही कोसळली होती.

फोटो आहे