शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

केडीएमटीच्या आगाराला ‘तौक्ते’चा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम आधीच डबघाईला आला आहे. दुसरीकडे त्याकडे पालक संस्था असलेल्या कल्याण-डोंबिवली ...

कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम आधीच डबघाईला आला आहे. दुसरीकडे त्याकडे पालक संस्था असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. गणेशघाट आगारातील जीर्ण अवस्थेतील कार्यालयांची डागडुजी करण्याची वारंवार मागणी करूनही त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सोमवारच्या तौक्ते चक्रीवादळाचाही आगाराला तडाखा बसला आहे. कार्यालयांवरील तसेच रॅम्पवरील जुने सिमेंटचे पत्रे वादळात उडून गेल्याने सध्या उपक्रमाला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २३ मे १९९९ ला प्रारंभ झाला. तेव्हापासून ते आजतागायत उपक्रमाच्या मुख्य गणेशघाट आगारातील कार्यालयांची डागडुजी करायला प्रशासनाला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे तेथील कारभार हा धोकादायक अवस्थेतील कार्यालयांतून सुरू असल्याने भविष्यात जीवित हानीही हाेऊ शकते. सोमवारच्या तौक्ते चक्रीवादळात कार्यालयांवरील सिमेंटचे पत्रेच उडून गेले. कर्मचाऱ्यांचा राबता असलेल्या दोन इमारती, सुरक्षारक्षकांची इमारत आणि रॅम्पवरचे पत्रे उडून तेथील काचेचेही नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी परिवहन सभापती मनोज चौधरी, व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत आणि आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री बांधून सध्या कामकाज सुरू केले आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी येथील इमारतीची दुरुस्ती करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी निधीही मंजूर झाला. पण पुढे कृतीच झालेली नाही. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून, कुणाच्या जिवावर बेतले तरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल सभापती चौधरी यांनी केला आहे.

------------------------------------------------------

सरकारकडून घोर निराशा

दि. २६ व २७ जुलै २००५ ला आलेल्या महापुरात केडीएमटीचा गणेशघाट आगार पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात बसगाड्यांसह तेथील मालमत्तेचे सुमारे एक कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवून, पूरपरिस्थितीने नुकसान झालेल्या उपक्रमास आर्थिक साहाय्य मिळण्याबाबत मागणी केली होती. सध्या या महापुराच्या घटनेला १६ वर्षांचा कालावधी उलटूनही उपक्रमाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. २०१९ च्या जुलै आणि ऑगस्टच्या पूरपरिस्थितीतही आगारातील बसचे नुकसान झाले होते. तेव्हाही इन्शुरन्सवर उपक्रमाची मदार राहिली. यात ३० ते ३५ लाखांचे उपक्रमाचे नुकसान झाले. याशिवाय ३० ते ३५ तिकीट ट्रे पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात तिकिटेही भिजली होती. तेव्हा तेथील ३० फूट उंच असलेल्या संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पडले होते, तर आगारातील अन्य ठिकाणची १०० फूट लांब संरक्षक भिंतही कोसळली होती.

फोटो आहे