शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीला कोंडीचा फटका; दर दिवसाला ४५ टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:30 IST

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या केडीएमटीला आता कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीचाही फटका बसत आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या केडीएमटीला आता कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीचाही फटका बसत आहे. त्यामुळे बसच्या दररोज ४५ टक्के फेºया रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी २० दिवसांत २४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.केडीएमटीचे दर दिवसाला आठ लाखांचे उत्पन्न होते. मात्र, ते तीन लाखांच्या आसपास घटले. त्यामुळे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी परिवहनकडे उत्पन्नवाढीसाठी कृतीआराखडा मागितला होता. त्यानुसार परिवहन प्रशासनाने तो सादर करून उत्पन्न देणाºया मार्गावर जास्तीच्या गाड्या चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न मे महिन्यापासून तीन लाखांवरून पाच लाखापर्यंत वाढले.सध्या मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीसाठी बंद असल्याने तेथील वाहतूक कल्याण-डोंबिवली शहरातून वळवली आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावर ताण पडत असल्याने शहरात दररोज कोंडी होत आहे. उत्पन्न मिळवून देणाºया कल्याण-भिवंडी मार्गावर एका फेरीसाठी चार तास लागतात. त्यामुळे या मार्गावरील फेºया घटल्या आहेत. कल्याण-मलंग गड, कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल, कल्याण-कोकण भवन या मार्गांवरील फेºयाही कोंडीमुळे रद्द कराव्या लागत आहेत.कल्याणचे प्रवेशद्वार समजली जाणारी ठिकाणेही कोंडीच्या विळख्यात आहेत. कल्याण-शहाडपूल, भवानी चौक, मुरबाड रोडवरील सुभाष चौकात, कल्याण स्टेशन परिसरात, सहजानंद चौक, दुर्गाडी खाडीपुलावर प्रचंड कोंडी होते. याशिवाय पत्रीपूल तर कोंडीचे जंकशन बनला आहे. भिवंडीहून येणारी वाहने दुर्गाडी पुलावरून गोविंदवाडी बायपासने पत्रीपुलावरून शीळ येथून ठाणे, नवी मुंबई, पनवेलकडे जातात. तसेच तेथून आलेली वाहने शीळनंतर पत्रीपुलावरून गोविंदवाडीहून भिवंडीकडे जातात. तसेच कल्याण शहरात ये-जा करणारी वाहनेही याच पुलावरून जातात. सर्वत्र होणाºया या कोंडीचा फटका केडीएमटीलाही बसत आहे. त्यामुळे दररोज एक लाख २० हजाराचे सरासरी उत्पन्न घटले आहे. केडीएमटीच्या तिजोरीत दररोज चार लाख २६ हजार ते चार लाख ३० हजार रुपये जमा होतात. दररोज सर्व बसच्या एकूण १६ हजार किलोमीटर फेºया होतात. मात्र, सध्या कोंडीमुळे १० ते ११ हजार किलोमीटर इतक्याच फेºया होत आहेत.शहरातून सहा आसनी रिक्षा, तसेच खाजगी वाहने बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न घटत आहे. परिणामी बेकायदा वाहतूक रोखावी तसेच कोंडी दूर करावी, अशी मागणी केडीएमटी प्रशासनाने वाहतूक शाखा आणि आरटीओकडे पत्राद्वारे केली आहे. परिवहनचे उत्पन्न न वाढल्यास त्याचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मे महिन्यापासून उत्पन्न वाढण्यास सुरुवात झाली असताना कोंडीमुळे उत्पन्न वाढीस पुन्हा फटका बसत आहे. त्यामुळे खाजगीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका