शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीला कोंडीचा फटका; दर दिवसाला ४५ टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:30 IST

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या केडीएमटीला आता कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीचाही फटका बसत आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या केडीएमटीला आता कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीचाही फटका बसत आहे. त्यामुळे बसच्या दररोज ४५ टक्के फेºया रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी २० दिवसांत २४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.केडीएमटीचे दर दिवसाला आठ लाखांचे उत्पन्न होते. मात्र, ते तीन लाखांच्या आसपास घटले. त्यामुळे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी परिवहनकडे उत्पन्नवाढीसाठी कृतीआराखडा मागितला होता. त्यानुसार परिवहन प्रशासनाने तो सादर करून उत्पन्न देणाºया मार्गावर जास्तीच्या गाड्या चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न मे महिन्यापासून तीन लाखांवरून पाच लाखापर्यंत वाढले.सध्या मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीसाठी बंद असल्याने तेथील वाहतूक कल्याण-डोंबिवली शहरातून वळवली आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावर ताण पडत असल्याने शहरात दररोज कोंडी होत आहे. उत्पन्न मिळवून देणाºया कल्याण-भिवंडी मार्गावर एका फेरीसाठी चार तास लागतात. त्यामुळे या मार्गावरील फेºया घटल्या आहेत. कल्याण-मलंग गड, कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल, कल्याण-कोकण भवन या मार्गांवरील फेºयाही कोंडीमुळे रद्द कराव्या लागत आहेत.कल्याणचे प्रवेशद्वार समजली जाणारी ठिकाणेही कोंडीच्या विळख्यात आहेत. कल्याण-शहाडपूल, भवानी चौक, मुरबाड रोडवरील सुभाष चौकात, कल्याण स्टेशन परिसरात, सहजानंद चौक, दुर्गाडी खाडीपुलावर प्रचंड कोंडी होते. याशिवाय पत्रीपूल तर कोंडीचे जंकशन बनला आहे. भिवंडीहून येणारी वाहने दुर्गाडी पुलावरून गोविंदवाडी बायपासने पत्रीपुलावरून शीळ येथून ठाणे, नवी मुंबई, पनवेलकडे जातात. तसेच तेथून आलेली वाहने शीळनंतर पत्रीपुलावरून गोविंदवाडीहून भिवंडीकडे जातात. तसेच कल्याण शहरात ये-जा करणारी वाहनेही याच पुलावरून जातात. सर्वत्र होणाºया या कोंडीचा फटका केडीएमटीलाही बसत आहे. त्यामुळे दररोज एक लाख २० हजाराचे सरासरी उत्पन्न घटले आहे. केडीएमटीच्या तिजोरीत दररोज चार लाख २६ हजार ते चार लाख ३० हजार रुपये जमा होतात. दररोज सर्व बसच्या एकूण १६ हजार किलोमीटर फेºया होतात. मात्र, सध्या कोंडीमुळे १० ते ११ हजार किलोमीटर इतक्याच फेºया होत आहेत.शहरातून सहा आसनी रिक्षा, तसेच खाजगी वाहने बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न घटत आहे. परिणामी बेकायदा वाहतूक रोखावी तसेच कोंडी दूर करावी, अशी मागणी केडीएमटी प्रशासनाने वाहतूक शाखा आणि आरटीओकडे पत्राद्वारे केली आहे. परिवहनचे उत्पन्न न वाढल्यास त्याचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मे महिन्यापासून उत्पन्न वाढण्यास सुरुवात झाली असताना कोंडीमुळे उत्पन्न वाढीस पुन्हा फटका बसत आहे. त्यामुळे खाजगीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका