शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केडीएमटीला कोंडीचा फटका; दर दिवसाला ४५ टक्के फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:30 IST

आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या केडीएमटीला आता कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीचाही फटका बसत आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या केडीएमटीला आता कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीचाही फटका बसत आहे. त्यामुळे बसच्या दररोज ४५ टक्के फेºया रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी २० दिवसांत २४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.केडीएमटीचे दर दिवसाला आठ लाखांचे उत्पन्न होते. मात्र, ते तीन लाखांच्या आसपास घटले. त्यामुळे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी परिवहनकडे उत्पन्नवाढीसाठी कृतीआराखडा मागितला होता. त्यानुसार परिवहन प्रशासनाने तो सादर करून उत्पन्न देणाºया मार्गावर जास्तीच्या गाड्या चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न मे महिन्यापासून तीन लाखांवरून पाच लाखापर्यंत वाढले.सध्या मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीसाठी बंद असल्याने तेथील वाहतूक कल्याण-डोंबिवली शहरातून वळवली आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावर ताण पडत असल्याने शहरात दररोज कोंडी होत आहे. उत्पन्न मिळवून देणाºया कल्याण-भिवंडी मार्गावर एका फेरीसाठी चार तास लागतात. त्यामुळे या मार्गावरील फेºया घटल्या आहेत. कल्याण-मलंग गड, कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल, कल्याण-कोकण भवन या मार्गांवरील फेºयाही कोंडीमुळे रद्द कराव्या लागत आहेत.कल्याणचे प्रवेशद्वार समजली जाणारी ठिकाणेही कोंडीच्या विळख्यात आहेत. कल्याण-शहाडपूल, भवानी चौक, मुरबाड रोडवरील सुभाष चौकात, कल्याण स्टेशन परिसरात, सहजानंद चौक, दुर्गाडी खाडीपुलावर प्रचंड कोंडी होते. याशिवाय पत्रीपूल तर कोंडीचे जंकशन बनला आहे. भिवंडीहून येणारी वाहने दुर्गाडी पुलावरून गोविंदवाडी बायपासने पत्रीपुलावरून शीळ येथून ठाणे, नवी मुंबई, पनवेलकडे जातात. तसेच तेथून आलेली वाहने शीळनंतर पत्रीपुलावरून गोविंदवाडीहून भिवंडीकडे जातात. तसेच कल्याण शहरात ये-जा करणारी वाहनेही याच पुलावरून जातात. सर्वत्र होणाºया या कोंडीचा फटका केडीएमटीलाही बसत आहे. त्यामुळे दररोज एक लाख २० हजाराचे सरासरी उत्पन्न घटले आहे. केडीएमटीच्या तिजोरीत दररोज चार लाख २६ हजार ते चार लाख ३० हजार रुपये जमा होतात. दररोज सर्व बसच्या एकूण १६ हजार किलोमीटर फेºया होतात. मात्र, सध्या कोंडीमुळे १० ते ११ हजार किलोमीटर इतक्याच फेºया होत आहेत.शहरातून सहा आसनी रिक्षा, तसेच खाजगी वाहने बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न घटत आहे. परिणामी बेकायदा वाहतूक रोखावी तसेच कोंडी दूर करावी, अशी मागणी केडीएमटी प्रशासनाने वाहतूक शाखा आणि आरटीओकडे पत्राद्वारे केली आहे. परिवहनचे उत्पन्न न वाढल्यास त्याचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मे महिन्यापासून उत्पन्न वाढण्यास सुरुवात झाली असताना कोंडीमुळे उत्पन्न वाढीस पुन्हा फटका बसत आहे. त्यामुळे खाजगीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका