शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत विरोधकच खरे सत्ताधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:23 IST

सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्या आपापसांतील लाथाळ्या व श्रेयवादासाठी चाललेली कुरघोडी याला फारसे महत्त्व न देता नागरिकांच्या हिताची जबाबदारी आपली असल्याचे भान ठेवत आमचा पक्ष काम करत आहे.

कल्याण : सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्या आपापसांतील लाथाळ्या व श्रेयवादासाठी चाललेली कुरघोडी याला फारसे महत्त्व न देता नागरिकांच्या हिताची जबाबदारी आपली असल्याचे भान ठेवत आमचा पक्ष काम करत आहे. निष्क्रियतेमुळे सत्ताधारी शिवसेनेवर विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची नामुश्की ओढवली आहे. परंतु, नागरिकांच्या हितासाठी आम्ही इथे सत्ताधाºयांच्या भूमिकेत आहोत. मनसेशिवाय महापालिकेला कोणीही वाली राहिलेला नाही. आमच्यावरच केडीएमसीची भिस्त आहे, असा दावा विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.शिवसेनेचे मंगळवारचे आंदोलन पाहता सत्ताधाºयांच्या प्रशासनावर कोणताही वचक नसल्याचे दिसले. सत्तेतही विरोधाची भूमिका, या दुटप्पी शिवसेनेच्या धोरणावर सर्वत्र टीका होत असताना विरोधी पक्ष असलेल्या मनसेनेही आतापर्यंत शिवसेनेने महापालिकेसाठी काय केले, असा सवाल केला आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी जी कृती सत्ताधाºयांकडून अपेक्षित होती, ती आमच्याकडून होत असल्याचे हळबे यांचे म्हणणे आहे.मुख्यंमत्र्यांकडे केलेला पत्रव्यवहार आणि त्यासंदर्भातील पाठपुरावा पाहता ‘एलबीटी’च्या बदल्यात ‘जीएसटी’चे १९ कोटी ८२ लाखांचे अनुदान महापालिकेला मिळवून देण्यात मनसेला यश आले. केडीएमसीचे नाव उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितील सीए इन्स्टिट्यूट चालू करण्यासंदर्भात पाठपुरावा करून महासभेत ठराव मंजूर करून घेतला. शहरातील वाहतूकव्यवस्था, रिक्षा स्टॅण्डचे नियोजन, परिवहन सेवेत सुधारणा होण्याच्या दृष्टीने वाहतूक शाखा, आरटीओ आणि केडीएमसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यासाठी पार्किंग आणि हॉकर्स पॉलिसी ठरवण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला. त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासन आणि सत्ताधाºयांकडे पाठपुरावाही सुरू आहे. परंतु, त्यांचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे हळबे म्हणाले.स्मार्ट सिटीत सर्व स्थानकांचा होणार विकासस्मार्ट सिटीमध्ये केवळ कल्याणच्याच प्रकल्पांचा समावेश होता. परंतु, विशेष बहुउद्देशीय वहन समितीकडे केलेल्या प्रयत्नांमुळे महापालिका हद्दीतील सर्वच रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. द्विपद्धतीय लेखानोंद राबवत असताना प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांचा ताळेबंद सादर केलेला नव्हता. ताळेबंदविना अंदाजपत्रक सादर केले जात होते, याला मनसेने हरकत घेतली असता अंदाजपत्रक सादर करताना ताळेबंद देण्यास प्रशासनाला भाग पाडले. घनकचºयाचा मुद्दा सध्या चांगलाच गंभीर बनला आहे. परंतु, आम्ही आमच्या निधीतून वाहनखरेदी करून संबंधित विभागाला साहाय्य करत आहोत, याकडेही हळबे यांनी लक्ष वेधले.२०१४ मध्ये शहर विकास आराखडामहापालिका हद्दीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्हीच २०१४ मध्ये शहरांचा विकास आराखडा सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाला सादर केला आहे. परंतु, सत्ताधाºयांना शहर विकासाच्या बाबतीत कोणतेही गांभीर्य नसल्याने आजतागायत तो आराखडा कृतीविना कागदावरच राहिला आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता सध्या आमच्याच भरवशावरच केडीएमसीचा कारभार चालला आहे, असा दावा हळबे यांनी केला आहे.