शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

केडीएमसीत विरोधकच खरे सत्ताधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:23 IST

सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्या आपापसांतील लाथाळ्या व श्रेयवादासाठी चाललेली कुरघोडी याला फारसे महत्त्व न देता नागरिकांच्या हिताची जबाबदारी आपली असल्याचे भान ठेवत आमचा पक्ष काम करत आहे.

कल्याण : सत्ताधारी शिवसेना-भाजपा यांच्या आपापसांतील लाथाळ्या व श्रेयवादासाठी चाललेली कुरघोडी याला फारसे महत्त्व न देता नागरिकांच्या हिताची जबाबदारी आपली असल्याचे भान ठेवत आमचा पक्ष काम करत आहे. निष्क्रियतेमुळे सत्ताधारी शिवसेनेवर विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची नामुश्की ओढवली आहे. परंतु, नागरिकांच्या हितासाठी आम्ही इथे सत्ताधाºयांच्या भूमिकेत आहोत. मनसेशिवाय महापालिकेला कोणीही वाली राहिलेला नाही. आमच्यावरच केडीएमसीची भिस्त आहे, असा दावा विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.शिवसेनेचे मंगळवारचे आंदोलन पाहता सत्ताधाºयांच्या प्रशासनावर कोणताही वचक नसल्याचे दिसले. सत्तेतही विरोधाची भूमिका, या दुटप्पी शिवसेनेच्या धोरणावर सर्वत्र टीका होत असताना विरोधी पक्ष असलेल्या मनसेनेही आतापर्यंत शिवसेनेने महापालिकेसाठी काय केले, असा सवाल केला आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी जी कृती सत्ताधाºयांकडून अपेक्षित होती, ती आमच्याकडून होत असल्याचे हळबे यांचे म्हणणे आहे.मुख्यंमत्र्यांकडे केलेला पत्रव्यवहार आणि त्यासंदर्भातील पाठपुरावा पाहता ‘एलबीटी’च्या बदल्यात ‘जीएसटी’चे १९ कोटी ८२ लाखांचे अनुदान महापालिकेला मिळवून देण्यात मनसेला यश आले. केडीएमसीचे नाव उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितील सीए इन्स्टिट्यूट चालू करण्यासंदर्भात पाठपुरावा करून महासभेत ठराव मंजूर करून घेतला. शहरातील वाहतूकव्यवस्था, रिक्षा स्टॅण्डचे नियोजन, परिवहन सेवेत सुधारणा होण्याच्या दृष्टीने वाहतूक शाखा, आरटीओ आणि केडीएमसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यासाठी पार्किंग आणि हॉकर्स पॉलिसी ठरवण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला. त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासन आणि सत्ताधाºयांकडे पाठपुरावाही सुरू आहे. परंतु, त्यांचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे हळबे म्हणाले.स्मार्ट सिटीत सर्व स्थानकांचा होणार विकासस्मार्ट सिटीमध्ये केवळ कल्याणच्याच प्रकल्पांचा समावेश होता. परंतु, विशेष बहुउद्देशीय वहन समितीकडे केलेल्या प्रयत्नांमुळे महापालिका हद्दीतील सर्वच रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला. द्विपद्धतीय लेखानोंद राबवत असताना प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांचा ताळेबंद सादर केलेला नव्हता. ताळेबंदविना अंदाजपत्रक सादर केले जात होते, याला मनसेने हरकत घेतली असता अंदाजपत्रक सादर करताना ताळेबंद देण्यास प्रशासनाला भाग पाडले. घनकचºयाचा मुद्दा सध्या चांगलाच गंभीर बनला आहे. परंतु, आम्ही आमच्या निधीतून वाहनखरेदी करून संबंधित विभागाला साहाय्य करत आहोत, याकडेही हळबे यांनी लक्ष वेधले.२०१४ मध्ये शहर विकास आराखडामहापालिका हद्दीचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्हीच २०१४ मध्ये शहरांचा विकास आराखडा सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाला सादर केला आहे. परंतु, सत्ताधाºयांना शहर विकासाच्या बाबतीत कोणतेही गांभीर्य नसल्याने आजतागायत तो आराखडा कृतीविना कागदावरच राहिला आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहता सध्या आमच्याच भरवशावरच केडीएमसीचा कारभार चालला आहे, असा दावा हळबे यांनी केला आहे.