शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

प्रवाशांच्या मदतीला केडीएमटी

By admin | Updated: July 6, 2017 06:02 IST

नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने कंबर कसली आहे. रिक्षाचालकांची अरेरावी मोडीत काढत केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड (रिक्षा स्टॅण्ड) ते मानपाडा रोडच्या जंक्शनपर्यंत (कल्याण-शीळ रोड) तीन बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कायमस्वरूपी ही बससेवा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.डोंबिवली पूर्वेला स्थानकाबाहेरून शहरातील विविध भागांत जाण्यासाठी रात्री ८ नंतर रिक्षा मिळत नाहीत. पावसाळ््यात रस्त्यांवर कमी असलेल्या रिक्षा, खड्डे तसेच वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे रिक्षा स्टॅण्डवर पुरेसा रिक्षाच नसतात. मुजोर रिक्षाचालक अनेकदा भाडेही नाकारतात. त्यामुळे प्रवाशांचे नेहमीच त्यांच्याशी वाद होतात. या सगळ््या प्रकाराच्या निषेधार्थ प्रवाशांनी मागील आठवड्यात रिक्षा रोखून धरत संताप व्यक्त केला होता. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता रिक्षेला वाहतुकीचा सक्षम पर्याय काय, असा प्रश्न वाहतूक विभागाला पडला आहे. केडीएमटीच्या अधिकाधिक बस रस्त्यावर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड ते मानपाडा रोडअखेरपर्यंत बस सोडण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली. प्रायोगिक स्तरावर रविवार सायंकाळपासून या बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारपासून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांनी कायमस्वरूपी या मार्गावर बस सोडण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी शहरात ठिकठिकाणी केडीएमटीची सेवा देणे हाच एक पर्याय आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. परिवहन सभापती संजय पावशे यांनी गंभीरे यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला असला तरी त्याची केडीएमटीत अद्याप त्याची रितसर नोंद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मार्गावर कायमस्वरूपी बस चालवण्यासाठी केडीएमटी व्यवस्थापनाकडे नोंद असणे आवश्यक आहे. डोंबिवलीत रिक्षांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाचे गोविंद गंभीरे यांनी लक्षात आणून दिले. त्यानसार वस्तूस्थितीचा आढावा घेत दोन-तीन बसच्या सहा फेऱ्या सायंकाळी तीन तासांत होत आहेत. त्यातून सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ही सुविधा कायम देण्याचा विचार आहे.- संजय पावशे, सभापती, परिवहन समिती