शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

प्रवाशांच्या मदतीला केडीएमटी

By admin | Updated: July 6, 2017 06:02 IST

नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने कंबर कसली आहे. रिक्षाचालकांची अरेरावी मोडीत काढत केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड (रिक्षा स्टॅण्ड) ते मानपाडा रोडच्या जंक्शनपर्यंत (कल्याण-शीळ रोड) तीन बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कायमस्वरूपी ही बससेवा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.डोंबिवली पूर्वेला स्थानकाबाहेरून शहरातील विविध भागांत जाण्यासाठी रात्री ८ नंतर रिक्षा मिळत नाहीत. पावसाळ््यात रस्त्यांवर कमी असलेल्या रिक्षा, खड्डे तसेच वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे रिक्षा स्टॅण्डवर पुरेसा रिक्षाच नसतात. मुजोर रिक्षाचालक अनेकदा भाडेही नाकारतात. त्यामुळे प्रवाशांचे नेहमीच त्यांच्याशी वाद होतात. या सगळ््या प्रकाराच्या निषेधार्थ प्रवाशांनी मागील आठवड्यात रिक्षा रोखून धरत संताप व्यक्त केला होता. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता रिक्षेला वाहतुकीचा सक्षम पर्याय काय, असा प्रश्न वाहतूक विभागाला पडला आहे. केडीएमटीच्या अधिकाधिक बस रस्त्यावर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड ते मानपाडा रोडअखेरपर्यंत बस सोडण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली. प्रायोगिक स्तरावर रविवार सायंकाळपासून या बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारपासून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांनी कायमस्वरूपी या मार्गावर बस सोडण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी शहरात ठिकठिकाणी केडीएमटीची सेवा देणे हाच एक पर्याय आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. परिवहन सभापती संजय पावशे यांनी गंभीरे यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला असला तरी त्याची केडीएमटीत अद्याप त्याची रितसर नोंद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मार्गावर कायमस्वरूपी बस चालवण्यासाठी केडीएमटी व्यवस्थापनाकडे नोंद असणे आवश्यक आहे. डोंबिवलीत रिक्षांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाचे गोविंद गंभीरे यांनी लक्षात आणून दिले. त्यानसार वस्तूस्थितीचा आढावा घेत दोन-तीन बसच्या सहा फेऱ्या सायंकाळी तीन तासांत होत आहेत. त्यातून सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ही सुविधा कायम देण्याचा विचार आहे.- संजय पावशे, सभापती, परिवहन समिती