शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

केडीएमसीत कोंडमारा

By admin | Updated: February 10, 2017 04:05 IST

मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांमुळे युतीमधून विस्तव जात नसतानाच त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही (केडीएमसी) उमटत आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीमुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांमुळे युतीमधून विस्तव जात नसतानाच त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही (केडीएमसी) उमटत आहेत. महापालिकेच्या कारभारात आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना येथील भाजपा नगरसेवकांची आहे. त्यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, सहयोगी आमदार गणपत गायकवाड, खासदार कपिल पाटील यांनी लक्ष घालावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.केडीएमसीत भाजपाचे ४२ नगरसेवक आहेत. त्यांच्यातील काहींनी यासंदर्भात ‘लोकमत’शी दबक्या आवाजात चर्चा केली. राज्यमंत्री चव्हाण, आमदार पवार, आमदार गायकवाड तसेच खासदार पाटील यांची येथे पकड आहे. मात्र, तरीही भाजपा नगरसेवकांंमध्ये ही भावना आहे. महापालिकेत कुठला निधी कुठे वापरायचा, त्याचे प्रस्ताव कसे करायचे, यासह विविध बाबींमध्ये प्रचंड अडचणी येत असल्याने भाजपा नगरसेवक त्रस्त आहेत. त्यांना मार्गदर्शनासाठी वरिष्ठ नेत्यांना वेळ नसल्याने त्यांची कुचंबणा झाली आहे. महापालिकेचे अधिकारी दाद लागू देत नसल्याने ही कोंडी फोडण्यासाठी आमदारांपैकी कोणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी शिवसेना-भाजपामध्ये जो कलगीतुरा रंगला, त्याची दखल वरिष्ठांनी तातडीने घ्यावी, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. तेथे तर २७ गावांच्या ठरावाला आडकाठी घालण्यात आली; परंतु महापालिकेत प्रत्येक कामालाच विरोध होतो. त्यामुळे दीड वर्षात म्हणावे तसे एकही काम झाले नसल्याने नागरिकांना तोंड देताना नाकीनऊ येत आहेत, असे काही नगरसेवकांनी सांगितले.शिवसेनेच्या नेत्यांना महापालिकेतील कामाचा अनुभव असल्याने ते कामे करून घेतात, पण भाजपाचे नगरसेवक नवखे असल्याने काम कसे करायचे, कोणाकडून करवून घ्यायचे, हे माहीत नसल्याने पंचाईत होत आहे. निधीही मिळत नाही. येऊन जाऊन कचरा, स्वच्छता, रस्त्यावरचे गतिरोधक यातच वेळ घालवला जात आहे. अनेकदा कमीपणा घ्यायला लागत असल्याचे त्यांनी सांगितले.