शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

केडीएमसीत कोंडमारा

By admin | Updated: February 10, 2017 04:05 IST

मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांमुळे युतीमधून विस्तव जात नसतानाच त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही (केडीएमसी) उमटत आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीमुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांमुळे युतीमधून विस्तव जात नसतानाच त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली महापालिकेतही (केडीएमसी) उमटत आहेत. महापालिकेच्या कारभारात आपल्याला डावलले जात आहे, अशी भावना येथील भाजपा नगरसेवकांची आहे. त्यामुळे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, सहयोगी आमदार गणपत गायकवाड, खासदार कपिल पाटील यांनी लक्ष घालावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.केडीएमसीत भाजपाचे ४२ नगरसेवक आहेत. त्यांच्यातील काहींनी यासंदर्भात ‘लोकमत’शी दबक्या आवाजात चर्चा केली. राज्यमंत्री चव्हाण, आमदार पवार, आमदार गायकवाड तसेच खासदार पाटील यांची येथे पकड आहे. मात्र, तरीही भाजपा नगरसेवकांंमध्ये ही भावना आहे. महापालिकेत कुठला निधी कुठे वापरायचा, त्याचे प्रस्ताव कसे करायचे, यासह विविध बाबींमध्ये प्रचंड अडचणी येत असल्याने भाजपा नगरसेवक त्रस्त आहेत. त्यांना मार्गदर्शनासाठी वरिष्ठ नेत्यांना वेळ नसल्याने त्यांची कुचंबणा झाली आहे. महापालिकेचे अधिकारी दाद लागू देत नसल्याने ही कोंडी फोडण्यासाठी आमदारांपैकी कोणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी शिवसेना-भाजपामध्ये जो कलगीतुरा रंगला, त्याची दखल वरिष्ठांनी तातडीने घ्यावी, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. तेथे तर २७ गावांच्या ठरावाला आडकाठी घालण्यात आली; परंतु महापालिकेत प्रत्येक कामालाच विरोध होतो. त्यामुळे दीड वर्षात म्हणावे तसे एकही काम झाले नसल्याने नागरिकांना तोंड देताना नाकीनऊ येत आहेत, असे काही नगरसेवकांनी सांगितले.शिवसेनेच्या नेत्यांना महापालिकेतील कामाचा अनुभव असल्याने ते कामे करून घेतात, पण भाजपाचे नगरसेवक नवखे असल्याने काम कसे करायचे, कोणाकडून करवून घ्यायचे, हे माहीत नसल्याने पंचाईत होत आहे. निधीही मिळत नाही. येऊन जाऊन कचरा, स्वच्छता, रस्त्यावरचे गतिरोधक यातच वेळ घालवला जात आहे. अनेकदा कमीपणा घ्यायला लागत असल्याचे त्यांनी सांगितले.