शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

केडीएमटीची बस चालू झाली खरी, पण थांबतेय कुठे...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:30 IST

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणा-या रेल्वेला समांतर रस्त्यावरून केडीएमटीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणा-या रेल्वेला समांतर रस्त्यावरून केडीएमटीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. जुलै महिन्यापासून ही बससेवा सुरू झाली खरी, परंतु बस थांबत नसल्याने ती निरुपयोगी ठरली आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या नशिबी रिक्षा शोधण्याचाच पर्याय राहिला आहे.कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा पर्याय म्हणून समांतर रस्त्याचा वापर होतो. सध्या या रस्त्याभोवती कॉम्प्लेक्स उभी राहिली आहेत. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने बससेवा सुरू केली. पण, नंतर ती प्रतिसादाअभावी बंद केली. या भागातून डोंबिवली व कल्याण स्थानकांकडे जाणाºयांची होणारी असलेली परवड पाहता केडीएमटीने या मार्गावरून बस सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली. भाजपाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनीही पत्र दिले होते. शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर २४ जुलैपासून या मार्गावरून बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना आणि भाजपाने मोठ्या प्रमाणावर श्रेयासाठी बॅनर लावले. बससेवेच्या शुभारंभाला भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली. बसथांबे, भाडेदरही निश्चित करण्यात आले. पण, सध्या या थांब्यांवर केवळ लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत. त्यावर, ठिकाणांची नावे तसेच बसचे वेळापत्रक लावण्यात उपक्रमाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सध्या या मार्गावरून बस धावत असली, तरी ती थांबत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. बस शुभारंभाच्या वेळी मोठा गाजावाजा करण्यात आला, पण सेवेच्या नावाने बोंब असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. श्रेयाची बॅनरबाजी करणारे आता गेले कुठे, असाही त्यांचा सवाल आहे. बस निरुपयोगी ठरत असल्यान रिक्षानेच इच्छितस्थळी जावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.‘लोकमत’ने नगरसेविका चौधरी यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, परिवहन सदस्य चौधरी यांनीही बस थांबत नसल्याबद्दल तक्रारी आल्याचे सांगितले. याबाबत, उपक्रमाच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार आहे. ‘हातदाखवा व बस थांबवा’ अशा योजनेबाबतही पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.गंभीर दखल घेतली जाईलमार्गावरून बस चालू करूनदेखील सुविधा प्रवाशांना मिळत नसेल, तर याची गंभीर दखल घेतली जाईल. मी स्वत: या मार्गाचा दौरा करेन, असे परिवहन सभापती संजय पावशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बस चालू करून काय फायदा?बस चालू केल्यामुळे सोयीचे ठरेल, अशी भावना होती. थांब्यावरही ती थांबवली जात नाही, हा अनुभव वारंवार आम्हाला येतो. याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बस थांबत नसल्याने आजही आम्हाला रिक्षानेच प्रवास करावा लागतो, असे मत प्रवासी योगेश पटेल यांनी मांडले. नवी मुंबईलाही बस जावी! : केडीएमटीच्या बसचे वेळापत्रक निश्चित नसल्याने ती बस कुठे आणि कधी येते, याची माहिती मिळत नाही. येथून नवी मुंबईला कामानिमित्त जाणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळच्या सुमारास एखादी बस तरी त्यांच्यासाठी सोडावी, अशीही मागणी असल्याचे प्रवासी सागर शिंगोटे यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका