शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

केडीएमटीची बस चालू झाली खरी, पण थांबतेय कुठे...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:30 IST

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणा-या रेल्वेला समांतर रस्त्यावरून केडीएमटीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणा-या रेल्वेला समांतर रस्त्यावरून केडीएमटीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. जुलै महिन्यापासून ही बससेवा सुरू झाली खरी, परंतु बस थांबत नसल्याने ती निरुपयोगी ठरली आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या नशिबी रिक्षा शोधण्याचाच पर्याय राहिला आहे.कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा पर्याय म्हणून समांतर रस्त्याचा वापर होतो. सध्या या रस्त्याभोवती कॉम्प्लेक्स उभी राहिली आहेत. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने बससेवा सुरू केली. पण, नंतर ती प्रतिसादाअभावी बंद केली. या भागातून डोंबिवली व कल्याण स्थानकांकडे जाणाºयांची होणारी असलेली परवड पाहता केडीएमटीने या मार्गावरून बस सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली. भाजपाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनीही पत्र दिले होते. शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर २४ जुलैपासून या मार्गावरून बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना आणि भाजपाने मोठ्या प्रमाणावर श्रेयासाठी बॅनर लावले. बससेवेच्या शुभारंभाला भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली. बसथांबे, भाडेदरही निश्चित करण्यात आले. पण, सध्या या थांब्यांवर केवळ लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत. त्यावर, ठिकाणांची नावे तसेच बसचे वेळापत्रक लावण्यात उपक्रमाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सध्या या मार्गावरून बस धावत असली, तरी ती थांबत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. बस शुभारंभाच्या वेळी मोठा गाजावाजा करण्यात आला, पण सेवेच्या नावाने बोंब असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. श्रेयाची बॅनरबाजी करणारे आता गेले कुठे, असाही त्यांचा सवाल आहे. बस निरुपयोगी ठरत असल्यान रिक्षानेच इच्छितस्थळी जावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.‘लोकमत’ने नगरसेविका चौधरी यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, परिवहन सदस्य चौधरी यांनीही बस थांबत नसल्याबद्दल तक्रारी आल्याचे सांगितले. याबाबत, उपक्रमाच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार आहे. ‘हातदाखवा व बस थांबवा’ अशा योजनेबाबतही पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.गंभीर दखल घेतली जाईलमार्गावरून बस चालू करूनदेखील सुविधा प्रवाशांना मिळत नसेल, तर याची गंभीर दखल घेतली जाईल. मी स्वत: या मार्गाचा दौरा करेन, असे परिवहन सभापती संजय पावशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बस चालू करून काय फायदा?बस चालू केल्यामुळे सोयीचे ठरेल, अशी भावना होती. थांब्यावरही ती थांबवली जात नाही, हा अनुभव वारंवार आम्हाला येतो. याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बस थांबत नसल्याने आजही आम्हाला रिक्षानेच प्रवास करावा लागतो, असे मत प्रवासी योगेश पटेल यांनी मांडले. नवी मुंबईलाही बस जावी! : केडीएमटीच्या बसचे वेळापत्रक निश्चित नसल्याने ती बस कुठे आणि कधी येते, याची माहिती मिळत नाही. येथून नवी मुंबईला कामानिमित्त जाणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळच्या सुमारास एखादी बस तरी त्यांच्यासाठी सोडावी, अशीही मागणी असल्याचे प्रवासी सागर शिंगोटे यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका