शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

केडीएमटीची बस चालू झाली खरी, पण थांबतेय कुठे...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:30 IST

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणा-या रेल्वेला समांतर रस्त्यावरून केडीएमटीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणा-या रेल्वेला समांतर रस्त्यावरून केडीएमटीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. जुलै महिन्यापासून ही बससेवा सुरू झाली खरी, परंतु बस थांबत नसल्याने ती निरुपयोगी ठरली आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या नशिबी रिक्षा शोधण्याचाच पर्याय राहिला आहे.कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा पर्याय म्हणून समांतर रस्त्याचा वापर होतो. सध्या या रस्त्याभोवती कॉम्प्लेक्स उभी राहिली आहेत. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने बससेवा सुरू केली. पण, नंतर ती प्रतिसादाअभावी बंद केली. या भागातून डोंबिवली व कल्याण स्थानकांकडे जाणाºयांची होणारी असलेली परवड पाहता केडीएमटीने या मार्गावरून बस सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली. भाजपाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनीही पत्र दिले होते. शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर २४ जुलैपासून या मार्गावरून बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना आणि भाजपाने मोठ्या प्रमाणावर श्रेयासाठी बॅनर लावले. बससेवेच्या शुभारंभाला भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली. बसथांबे, भाडेदरही निश्चित करण्यात आले. पण, सध्या या थांब्यांवर केवळ लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत. त्यावर, ठिकाणांची नावे तसेच बसचे वेळापत्रक लावण्यात उपक्रमाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सध्या या मार्गावरून बस धावत असली, तरी ती थांबत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. बस शुभारंभाच्या वेळी मोठा गाजावाजा करण्यात आला, पण सेवेच्या नावाने बोंब असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. श्रेयाची बॅनरबाजी करणारे आता गेले कुठे, असाही त्यांचा सवाल आहे. बस निरुपयोगी ठरत असल्यान रिक्षानेच इच्छितस्थळी जावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.‘लोकमत’ने नगरसेविका चौधरी यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, परिवहन सदस्य चौधरी यांनीही बस थांबत नसल्याबद्दल तक्रारी आल्याचे सांगितले. याबाबत, उपक्रमाच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार आहे. ‘हातदाखवा व बस थांबवा’ अशा योजनेबाबतही पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.गंभीर दखल घेतली जाईलमार्गावरून बस चालू करूनदेखील सुविधा प्रवाशांना मिळत नसेल, तर याची गंभीर दखल घेतली जाईल. मी स्वत: या मार्गाचा दौरा करेन, असे परिवहन सभापती संजय पावशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बस चालू करून काय फायदा?बस चालू केल्यामुळे सोयीचे ठरेल, अशी भावना होती. थांब्यावरही ती थांबवली जात नाही, हा अनुभव वारंवार आम्हाला येतो. याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बस थांबत नसल्याने आजही आम्हाला रिक्षानेच प्रवास करावा लागतो, असे मत प्रवासी योगेश पटेल यांनी मांडले. नवी मुंबईलाही बस जावी! : केडीएमटीच्या बसचे वेळापत्रक निश्चित नसल्याने ती बस कुठे आणि कधी येते, याची माहिती मिळत नाही. येथून नवी मुंबईला कामानिमित्त जाणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळच्या सुमारास एखादी बस तरी त्यांच्यासाठी सोडावी, अशीही मागणी असल्याचे प्रवासी सागर शिंगोटे यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका