शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

पुरेशा मनुष्यबळाअभावी केडीएमसीचे पलावा अग्निशमन केंद्र अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:05 IST

गाव वगळल्याचाही बसला फटका; आवश्यक तेव्हा सेवा देणारच, केडीएमसी प्रशासनाने केले स्पष्ट

डोंबिवली : केडीएमसीचे निळजे येथील पलावा अग्निशमन केंद्र मनुष्यबळाअभावी बंद करण्यात आले आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपल्याने कर्मचाऱ्यांअभावी ते चालविणे शक्य नव्हते. तसेच निळजे गाव महापालिकेच्या हद्दीतून वगळल्याने केंद्र बंद करण्यात आल्याचे कारणही देण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात सेवा देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.निळजे येथील पलावा परिसरात वाढलेले शहरीकरण पाहता तेथे अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी पलावा सिटीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, मार्च २०१९ मध्ये पलावा अग्निशमन केंद्र चालू करण्यात आले होते. हे केंद्र चालविण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रशिक्षित २८ कर्मचारी वर्षभरासाठी नेमण्यात आले होते. कंत्राटदाराची मुदत ३१ मार्च २०२० ला संपुष्टात आली.दरम्यान, केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सप्टेंबरपर्यंत कंत्राट कायम ठेवावे, अशी विनंती कंत्राटदाराला केली होती. यावर कंत्राटदाराने मार्च ते जुलैपर्यंत कर्मचाºयांचा पुरवठा केला. परंतु, पुढे मुदत वाढविली नाही. आधीच महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने पलावा केंद्र चालविणे शक्य नव्हते. त्यातच निळजे गाव महापालिकेतून वगळले असल्याने ते केंद्र अखेर बंद करण्यात आले आहे.पलावा केंद्र बंद झाल्याने सध्या महापालिकेची कल्याण पूर्व-पश्चिम आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम अशी चार केंद्रे सुरू आहेत. लवकरच टिटवाळ्यात केंद्र चालू केले जाणार आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी ही केंद्रे चालविणे तारेवरची कसरत ठरत आहे. सध्या ४५ ते ५० च्या आसपास मनुष्यबळ आहे.२०१५ च्या भरती प्रक्रियेतील २० पैकी १६ जण सध्या ड्युटीवर हजर झाले आहेत. ही केंदे्र चालविण्यासाठी साधारण १२५ आसपास मनुष्यबळ गरजेचे आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाºयांवर अतिरिक्त ताण पडत आहे.शीळ मार्गावरील वाहतूककोंडीमुळे अग्निशमन दलाची वाट बिकटचपलावा केंद्र बंद झाल्याने आता डोंबिवली एमआयडीसीतील तसेच कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयातील केंद्रातून यापुढे अग्निशमन दलातर्फे सेवा दिली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी पाहता आपत्कालीन परिस्थितीत बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे.त्यात सध्या पावसाने रस्त्यात जीवघेणे खड्डे पडले आहेत. आधीच कोंडीने वाहतूक मंदावली असताना खड्ड्यांचाही अडथळा निर्माण होणार आहे. डोंबिवली आणि कल्याण पूर्वेपासून पलावापर्यंतचे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटर आहे. कोंडी आणि खड्ड्यांमधून हे अंतर पार करताना अग्निशमन जवानांना तारेवरची कसरत करावी लागणार यात शंका नाही.अग्निश्मन दलाचे पलावा केंद्र असलेला परिसर केडीएमसीतून वगळण्यात आला आहे. त्यात कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदाराने मुदत संपुष्टात आल्याने कंत्राट बंद केले आहे. मनुष्यबळाअभावी केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात जेव्हाजेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हातेव्हा महापालिकेच्या अग्निशमन केंद्राकडून तत्परतेने सेवा दिली जाईल.- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्तआणि अग्निशमन विभागाचे प्रमुख, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका