शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पुरेशा मनुष्यबळाअभावी केडीएमसीचे पलावा अग्निशमन केंद्र अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:05 IST

गाव वगळल्याचाही बसला फटका; आवश्यक तेव्हा सेवा देणारच, केडीएमसी प्रशासनाने केले स्पष्ट

डोंबिवली : केडीएमसीचे निळजे येथील पलावा अग्निशमन केंद्र मनुष्यबळाअभावी बंद करण्यात आले आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपल्याने कर्मचाऱ्यांअभावी ते चालविणे शक्य नव्हते. तसेच निळजे गाव महापालिकेच्या हद्दीतून वगळल्याने केंद्र बंद करण्यात आल्याचे कारणही देण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात सेवा देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.निळजे येथील पलावा परिसरात वाढलेले शहरीकरण पाहता तेथे अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी पलावा सिटीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, मार्च २०१९ मध्ये पलावा अग्निशमन केंद्र चालू करण्यात आले होते. हे केंद्र चालविण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रशिक्षित २८ कर्मचारी वर्षभरासाठी नेमण्यात आले होते. कंत्राटदाराची मुदत ३१ मार्च २०२० ला संपुष्टात आली.दरम्यान, केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सप्टेंबरपर्यंत कंत्राट कायम ठेवावे, अशी विनंती कंत्राटदाराला केली होती. यावर कंत्राटदाराने मार्च ते जुलैपर्यंत कर्मचाºयांचा पुरवठा केला. परंतु, पुढे मुदत वाढविली नाही. आधीच महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने पलावा केंद्र चालविणे शक्य नव्हते. त्यातच निळजे गाव महापालिकेतून वगळले असल्याने ते केंद्र अखेर बंद करण्यात आले आहे.पलावा केंद्र बंद झाल्याने सध्या महापालिकेची कल्याण पूर्व-पश्चिम आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम अशी चार केंद्रे सुरू आहेत. लवकरच टिटवाळ्यात केंद्र चालू केले जाणार आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी ही केंद्रे चालविणे तारेवरची कसरत ठरत आहे. सध्या ४५ ते ५० च्या आसपास मनुष्यबळ आहे.२०१५ च्या भरती प्रक्रियेतील २० पैकी १६ जण सध्या ड्युटीवर हजर झाले आहेत. ही केंदे्र चालविण्यासाठी साधारण १२५ आसपास मनुष्यबळ गरजेचे आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाºयांवर अतिरिक्त ताण पडत आहे.शीळ मार्गावरील वाहतूककोंडीमुळे अग्निशमन दलाची वाट बिकटचपलावा केंद्र बंद झाल्याने आता डोंबिवली एमआयडीसीतील तसेच कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयातील केंद्रातून यापुढे अग्निशमन दलातर्फे सेवा दिली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी पाहता आपत्कालीन परिस्थितीत बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे.त्यात सध्या पावसाने रस्त्यात जीवघेणे खड्डे पडले आहेत. आधीच कोंडीने वाहतूक मंदावली असताना खड्ड्यांचाही अडथळा निर्माण होणार आहे. डोंबिवली आणि कल्याण पूर्वेपासून पलावापर्यंतचे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटर आहे. कोंडी आणि खड्ड्यांमधून हे अंतर पार करताना अग्निशमन जवानांना तारेवरची कसरत करावी लागणार यात शंका नाही.अग्निश्मन दलाचे पलावा केंद्र असलेला परिसर केडीएमसीतून वगळण्यात आला आहे. त्यात कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदाराने मुदत संपुष्टात आल्याने कंत्राट बंद केले आहे. मनुष्यबळाअभावी केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात जेव्हाजेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हातेव्हा महापालिकेच्या अग्निशमन केंद्राकडून तत्परतेने सेवा दिली जाईल.- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्तआणि अग्निशमन विभागाचे प्रमुख, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका