शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा मनुष्यबळाअभावी केडीएमसीचे पलावा अग्निशमन केंद्र अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:05 IST

गाव वगळल्याचाही बसला फटका; आवश्यक तेव्हा सेवा देणारच, केडीएमसी प्रशासनाने केले स्पष्ट

डोंबिवली : केडीएमसीचे निळजे येथील पलावा अग्निशमन केंद्र मनुष्यबळाअभावी बंद करण्यात आले आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपल्याने कर्मचाऱ्यांअभावी ते चालविणे शक्य नव्हते. तसेच निळजे गाव महापालिकेच्या हद्दीतून वगळल्याने केंद्र बंद करण्यात आल्याचे कारणही देण्यात आले आहे. दरम्यान, केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात सेवा देणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.निळजे येथील पलावा परिसरात वाढलेले शहरीकरण पाहता तेथे अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी पलावा सिटीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार, मार्च २०१९ मध्ये पलावा अग्निशमन केंद्र चालू करण्यात आले होते. हे केंद्र चालविण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रशिक्षित २८ कर्मचारी वर्षभरासाठी नेमण्यात आले होते. कंत्राटदाराची मुदत ३१ मार्च २०२० ला संपुष्टात आली.दरम्यान, केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सप्टेंबरपर्यंत कंत्राट कायम ठेवावे, अशी विनंती कंत्राटदाराला केली होती. यावर कंत्राटदाराने मार्च ते जुलैपर्यंत कर्मचाºयांचा पुरवठा केला. परंतु, पुढे मुदत वाढविली नाही. आधीच महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने पलावा केंद्र चालविणे शक्य नव्हते. त्यातच निळजे गाव महापालिकेतून वगळले असल्याने ते केंद्र अखेर बंद करण्यात आले आहे.पलावा केंद्र बंद झाल्याने सध्या महापालिकेची कल्याण पूर्व-पश्चिम आणि डोंबिवली पूर्व-पश्चिम अशी चार केंद्रे सुरू आहेत. लवकरच टिटवाळ्यात केंद्र चालू केले जाणार आहे. परंतु, मनुष्यबळाअभावी ही केंद्रे चालविणे तारेवरची कसरत ठरत आहे. सध्या ४५ ते ५० च्या आसपास मनुष्यबळ आहे.२०१५ च्या भरती प्रक्रियेतील २० पैकी १६ जण सध्या ड्युटीवर हजर झाले आहेत. ही केंदे्र चालविण्यासाठी साधारण १२५ आसपास मनुष्यबळ गरजेचे आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाºयांवर अतिरिक्त ताण पडत आहे.शीळ मार्गावरील वाहतूककोंडीमुळे अग्निशमन दलाची वाट बिकटचपलावा केंद्र बंद झाल्याने आता डोंबिवली एमआयडीसीतील तसेच कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयातील केंद्रातून यापुढे अग्निशमन दलातर्फे सेवा दिली जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी पाहता आपत्कालीन परिस्थितीत बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होण्याची दाट शक्यता आहे.त्यात सध्या पावसाने रस्त्यात जीवघेणे खड्डे पडले आहेत. आधीच कोंडीने वाहतूक मंदावली असताना खड्ड्यांचाही अडथळा निर्माण होणार आहे. डोंबिवली आणि कल्याण पूर्वेपासून पलावापर्यंतचे अंतर सुमारे सात ते आठ किलोमीटर आहे. कोंडी आणि खड्ड्यांमधून हे अंतर पार करताना अग्निशमन जवानांना तारेवरची कसरत करावी लागणार यात शंका नाही.अग्निश्मन दलाचे पलावा केंद्र असलेला परिसर केडीएमसीतून वगळण्यात आला आहे. त्यात कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदाराने मुदत संपुष्टात आल्याने कंत्राट बंद केले आहे. मनुष्यबळाअभावी केंद्र बंद केले असले तरी त्या परिसरात जेव्हाजेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हातेव्हा महापालिकेच्या अग्निशमन केंद्राकडून तत्परतेने सेवा दिली जाईल.- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्तआणि अग्निशमन विभागाचे प्रमुख, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका