शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

केडीएमसीला दिव्यांगांचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 03:27 IST

दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान तीन टक्के निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे.

कल्याण : दिव्यांग (अपंग) व्यक्तींच्या कल्याणासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी किमान तीन टक्के निधी राखून ठेवून तो कल्याणकारी कामांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, सरकारच्या याबाबतच्या परिपत्रकाकडे केडीएमसीचे मात्र पुरते दुर्लक्ष झाल्याचे उघड झाले आहे.२०१० ते २०१७ दरम्यान तीन टक्के निधीच्या अनुषंगाने आतापर्यंत ३१० कोटी दोन लाखांची तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, केवळ १२ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातही केलेल्या तरतुदीतील सात वर्षांत ६२ लाख ३४ हजार रुपयेच खर्च झाल्याने १२ कोटी १२ लाख ६६ हजारांचा निधी खर्चाविना वाया गेल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. प्रशासनाची उदासीनता आणि हलगर्जी याला कारणीभूत आहे. संबंधित अधिकाºयांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.भारतीय संविधान अपंग कायदा १९९५ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या किमान तीन टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राखून ठेवणे क्रमप्राप्त आहे. परंतु, केडीएमसी प्रशासनाने या सरकारी आदेशाची ऐशीतैशी केल्याचे चित्र माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.डोंबिवलीतील दिव्यांग दत्तात्रेय सांगळे यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात हे वास्तव उघड झाले आहे. मागील सात वर्षांत कायद्यान्वये ३२२ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, सरकारी परिपत्रकाकडे दुर्लक्ष करत महापालिकेने केवळ १२ कोटी ७५ लाखांचीच तरतूद केली. तीन टक्के निधी राखून ठेवणे बंधनकारक केले असताना केलेली तुटपुंजी तरतूद पाहता ३१० कोटी २ लाखांची तरतूद केली नसल्याचे उघड झाले आहे.तरतूद न केलेली ही रक्कम व तरतूद केलेला परंतु खर्च न केलेला १२ कोटी १२ लाख ६६ हजारांचा निधी अशा एकूण ३२२ कोटी १४ लाख ६६ हजारांच्या निधीपासून दिव्यांगांना प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वंचित राहावे लागले आहे.विशेष म्हणजे, यंदाच्या २०१७-१८ च्या अंदाजपत्रकानुसार ६३ कोटींची तरतूद करणे बंधनकारक आहे. असे असताना केवळ ४ कोटी ६५ लाखांवर बोळवण करण्यात आली आहे. आजतागायत यातील एकही रुपया खर्च केला गेलेला नाही, याकडेही सांगळे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिकेने सरकारी परिपत्रकाची उघडपघड पायमल्ली केली आहे. निधी खर्च न करता दिव्यांगांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित राहावे लागले आहे. संविधान व कायद्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार सुगम्य भारत योजनेंतर्गत विविध प्रकल्पांसह अनेक योजना राबवत आहेत.उदासीनता कारणीभूतठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, ठाणे आणि वसई-विरार महापालिका दिव्यांगांबाबत अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करत असताना केडीएमसी याबाबत कोसो दूर आहे. दिव्यांगांच्या प्रश्नी महापालिका क्षेत्रातील दोन खासदार, चार आमदार आणि १२७ नगरसेवक हे देखील गांभीर्याने पाहत नसल्याने त्यांचीही उदासीनता या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याचा आरोप सांगळे यांचा आहे.आॅडिटची मागणीअत्यल्प व अखर्चित निधीच्या तरतुदीबद्दल संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी तसेच कॅग अथवा त्यांनी नेमणूक केलेल्या व्यक्तींकडून २०१०-१८ दरम्यानच्या अपंग निधीचे आॅडिट (लेखापरीक्षण) व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, नाइलाजास्तव उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशाराही सांगळे यांनी दिला आहे.>सरकारी परिपत्रकानुसार न केलेली तरतूदसन केडीएमसी कायद्यान्वये अंदाजपत्रकीय तरतूद कायद्यान्वये नअंदाजपत्रक करावयाची तरतूद केलेली तरतूद२०१०-११ १२७६९७.३० ३८ कोटी २८ लाख ५० लाख ३७ कोटी ७८ लाख२०११-१२ १२९३५०.८६ ३८ कोटी ७९ लाख ०१ कोटी ३७ कोटी ७९ लाख२०१२-१३ १४८५९९.२० ४४ कोटी ५५ लाख ०१ कोटी ४३ कोटी ५५ लाख२०१३-१४ १५०८७९.३३ ४५ कोटी २४ लाख ०१ कोटी ५० लाख ४३ कोटी ७४ लाख२०१४-१५ १५९८८०.३५ ४७ कोटी ९४ लाख ०१ कोटी ५० लाख ४६ कोटी ४४ लाख२०१५-१६ १५१०५०.५५ ४५ कोटी ३० लाख ०३ कोटी ५० लाख ४१ कोटी ८० लाख२०१६-१७ २०८९४६.२१ ६२ कोटी ६७ लाख ०३ कोटी ७५ लाख ५८ कोटी ९२ लाखएकूण ३२२ कोटी ७७ लाख १२ कोटी ७५ लाख ३१० कोटी ०२ लाख२०१७-१८ २१००२४.०६ ६३ कोटी ४ कोटी ६५ लाख ५८ कोटी ३५ लाख