शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘मदर अ‍ॅण्ड चाइल्ड सेंटर’ला केडीएमसीचा थंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:19 IST

डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केली खंत : आरोग्य सेवाव्रती पुरस्कारांचे वितरण

डोंबिवली : सूतिकागृहामध्ये ‘मदर अ‍ॅण्ड चाइल्ड सेंटर’ उभे करण्यासाठी रोटरी क्लबने केडीएमसीकडे प्रस्ताव मांडला आहे. त्यासाठी एकूण २५ कोटींची तरतूद रोटरी क्लबने केली आहे. मात्र, महापालिकेने त्याला अत्यंत थंडा प्रतिसाद दिला आहे, अशी खंत बालरोगतज्ज्ञ आणि रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केली.

वैद्यकीय मदत निधी ट्रस्टतर्फे कै. परशुराम महाजन धनी माधवाश्रम व कै. प्रमोदिनी गजानन निमकर स्मृती आरोग्य सेवाव्रती पुरस्कारांचे वितरण शुभमंगल कार्यालयात रविवारी झाले. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. कोल्हटकर बोलत होते. हा पुरस्कार डॉ. विजय नेगलूर व डॉ. कोल्हटकर यांना मुंबई महापालिका आरोग्यसेवेचे माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आ. रवींद्र चव्हाण, डॉ. निशिकांत पतंगे, डॉ. सुनील गडकरी, डॉ. यशवंत घोटीकर, डॉ. विश्वास पुराणिक, डॉ. इंद्रनील भोळे होते.

डॉ. कोल्हटकर म्हणाले की, आम्हाला पक्षीय राजकारणाशी काय घेणेदेणे नाही. अजूनही केडीएमसीने या प्रकल्पाला परवानगी दिल्यास आम्ही त्याची अंमलबजावणी करू. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी आहे. मात्र, येथे मेडिकल कॉलेज नाही. भारतात आरोग्याची परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकेत २० हजार रुपये प्रतिमाणूस आरोग्यावर खर्च केला जातो, तर भारतात हाच ९०० रुपये प्रतिमाणूस इतका अत्यल्प आहे. त्यामुळेच आपल्याला आरोग्यनिधी उभारावा लागतो. त्याची कारणे काहीही असली तरी सरकार हे करीत नाही. संस्थांना त्यासाठी पुढे यावे लागते. १९९२ मध्ये डोंबिवलीतील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन डोंबिवली फिव्हरचा नायनाट केला.

डॉ. सुपे म्हणाले की, ‘वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली असली, तरी सेवाधर्म विसरू नका. सेवाधर्म रुग्णसेवेचा कणा आहे. आपल्याकडील अर्थसंकल्प मोठे असतात. पण, त्यातील किती रक्कम प्रत्यक्ष आरोग्यसेवेवर खर्च होते, हा प्रश्न आहे. यामधून गरीब रुग्णाची सर्वाधिक परवड होते. अशा वेळी वैद्यकीय मदत निधीसारख्या संस्था खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईतील रुग्णालयात काम करताना आम्ही सामाजिक दायित्वाच्या नात्याने ५० ते १०० कोटींचा निधी उभा केला आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रामीण भागातील मुलगी उपचारासाठी मुंबईत आली होती. तिच्या पालकांकडील उपचारांसाठीचे पैसे संपले, त्यावेळी त्यांनी व्हेंटिलेटर काढण्यास सांगितले आणि निघून गेले. पण, एका डॉक्टरचे प्रथम कर्तव्य हे रुग्णाचे प्राण वाचविणे हेच आहे. प्रत्येक डॉक्टरने वैद्यकीय सेवाधर्म पाळला पाहिजे.’कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुराणिक यांनी तर, सूत्रसंचालन विनय भोळे यांनी केले.