शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी केडीएमसीची अभय योजना; महापौर, आयुक्तांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:24 IST

१०० कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित

कल्याण : केडीएमसी हद्दीतील मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी एकरकमी २५ टक्के रक्कम महापालिकेत भरल्यास त्यांच्या थकबाकीवरील ७५ टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ केली जाईल. ही योजना १५ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लागू राहणार आहे.

अभय योजनेची घोषणा महापौर विनीता राणे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी आयुक्तांच्या दालनात केली. यावेळी सभागृह नेते प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, मालमत्ता विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

यासंदर्भात सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून केडीएमसीची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. तरीही, महापालिकेने मालमत्ताकराची आतापर्यंत १३९ कोटी वसुली केली आहे. ही वसुली मागच्या वर्षीच्या तुलनेत २३ कोटी रुपयांनी कमी आहे. महापालिका हद्दीत थकबाकीदारांकडून एकूण एक हजार ३८२ कोटी रु पये येणे अपेक्षित आहे. सगळीच थकबाकी वसूल होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव दूर झालेला नाही. मात्र, कोरोना रु ग्णांची संख्या सध्या स्थिरावलेली आहे. या अभय योजनेतून थकबाकीदारांकडून किमान १०० कोटी रु पये वसूल होणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ थकबाकीदारांनी घेऊन योजनेला प्रतिसाद द्यावा. तसेच या योजनेतून जमा होणारे उत्पन्न हे कोरोना प्रादुर्भाव दूर करण्यावर खर्च केले जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेने राज्य सरकारकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी २१४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.वास्तववादी अपेक्षायापूर्वीही मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. तेव्हा एक हजार कोटी रु पये वसुलीचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ६५ कोटी रु पये वसूल झाले होते. त्यामुळे आताही अभय योजनेला प्रतिसाद मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला असता आयुक्तांनी अपेक्षित उत्पन्न हे १०० कोटी रुपये धरले आहे. वास्तववादी आकडे अपेक्षित ठेवले आहेत. त्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका