शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी केडीएमसीची अभय योजना; महापौर, आयुक्तांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 01:24 IST

१०० कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित

कल्याण : केडीएमसी हद्दीतील मालमत्ताकराची थकबाकी न भरणाऱ्यांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. थकबाकीदारांनी एकरकमी २५ टक्के रक्कम महापालिकेत भरल्यास त्यांच्या थकबाकीवरील ७५ टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ केली जाईल. ही योजना १५ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान लागू राहणार आहे.

अभय योजनेची घोषणा महापौर विनीता राणे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी आयुक्तांच्या दालनात केली. यावेळी सभागृह नेते प्रकाश पेणकर, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, मालमत्ता विभागाचे प्रमुख विनय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

यासंदर्भात सूर्यवंशी म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून केडीएमसीची सर्व यंत्रणा कामाला लागली होती. तरीही, महापालिकेने मालमत्ताकराची आतापर्यंत १३९ कोटी वसुली केली आहे. ही वसुली मागच्या वर्षीच्या तुलनेत २३ कोटी रुपयांनी कमी आहे. महापालिका हद्दीत थकबाकीदारांकडून एकूण एक हजार ३८२ कोटी रु पये येणे अपेक्षित आहे. सगळीच थकबाकी वसूल होत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव दूर झालेला नाही. मात्र, कोरोना रु ग्णांची संख्या सध्या स्थिरावलेली आहे. या अभय योजनेतून थकबाकीदारांकडून किमान १०० कोटी रु पये वसूल होणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ थकबाकीदारांनी घेऊन योजनेला प्रतिसाद द्यावा. तसेच या योजनेतून जमा होणारे उत्पन्न हे कोरोना प्रादुर्भाव दूर करण्यावर खर्च केले जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेने राज्य सरकारकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी २१४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.वास्तववादी अपेक्षायापूर्वीही मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. तेव्हा एक हजार कोटी रु पये वसुलीचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात ६५ कोटी रु पये वसूल झाले होते. त्यामुळे आताही अभय योजनेला प्रतिसाद मिळणार की नाही, असा सवाल उपस्थित केला असता आयुक्तांनी अपेक्षित उत्पन्न हे १०० कोटी रुपये धरले आहे. वास्तववादी आकडे अपेक्षित ठेवले आहेत. त्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका