शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

महासभेच्या मंजुरीविनाच केडीएमसी होणार स्मार्ट

By admin | Updated: December 15, 2015 01:05 IST

नगरसेवक गटनोंदणी अहवालाअभावी महासभा पार न पडल्याचे कारण देत तिच्या मंजुरीविनाच कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीचा आराखडा मंगळवारी केंद्र

कल्याण : नगरसेवक गटनोंदणी अहवालाअभावी महासभा पार न पडल्याचे कारण देत तिच्या मंजुरीविनाच कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीचा आराखडा मंगळवारी केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुकीच्या प्रचारात परस्परांची लायकी काढल्यानंतर सत्तेसाठी शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने इतर ठिकाणांपेक्षा स्मार्ट सिटीबाबत थोडी मवाळ भूमिका घेत येथील प्रकल्प मार्गी लागतील, अशी चिन्हे आहेत. मात्र भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यातच गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवल्याने अंतर्गत विरोध उफाळून आले आहेत. नागरिक, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या सूचनांचा विचार करून स्मार्ट सिटी प्रकल्पाचा सुमारे एक हजार ४४५ कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून तो मंगळवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून केंद ्रसरकारला सादर केला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाला दिल्या जाणाऱ्या निधीच्या मुद्दयावरून पालिका निवडणुकीत बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपने तोच आपल्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवला. शिवसेनेने नागरी प्रश्न सोडवण्यावर भर दिला. मात्र नंतर सत्तेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आल्याने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव फारशी खळखळ न करता मंजूर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अहवालाचे काम खोटे : गायकवाडकल्याण-डोंबिवलीला स्मार्ट करण्याचा आराखडा ज्या प्रकल्प अहवालाच्या आधारे तयार केला आहे, तो अहवाल तयार करताना सामान्य नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप करत कल्याण पूर्वमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी घरचा अहेर दिला आहे. महापालिकेकडे जमीन किती, आरक्षणे किती उपलब्ध आहेत, याचा कोणताही विचार न करता हा अहवाल तयार केला गेला आहे. ज्या एजन्सीला याचे काम दिले होते. त्या एजन्सीने केलेले काम खोटे असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे. (प्रतिनिधी)अंतिम आराखड्याला मान्यता घेऊ - देवळेकरकल्याण-डोंबिवली पालिकेचा स्मार्ट सिटीचा आराखडा मंगळवारी सरकारला सादर केला जाणार आहे. इतर ठिकाणी याला विरोध झाला असला तरी विरोध करणे चुकीचे आहे. महासभा अद्याप झाली नसली आणि आराखडा महासभेच्या मंजुरीविना पाठविला जाणार असला तरी हा प्राथमिक आराखडा आहे. ज्यावेळी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला जाईल, तेव्हा त्याला महासभेची मान्यता घेतली जाईल. स्मार्ट सिटीसाठी वेळ कमी मिळाला. तरीही अनेकांनी कमी वेळेत चांगल्या सूचना केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी सांगितल्यानुसार निधी कमी पडणार आहे. आणखी निधीची आवश्यकता आहे. निधी खूपच अपुरा-शिंदे महापालिकेने एक हजार ४४४ कोटी ४५ लाखांचा स्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल तयार केला असला, तरी हा निधी अपुरा असल्याचे मत ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.