शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कचऱ्यामुळे केडीएमसीची घसरगुंडी सुरूच...

By admin | Updated: February 16, 2016 02:40 IST

केंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे

मुरलीधर भवार,  कल्याणकेंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे. या सर्वेक्षणामुळे कचऱ्याच्या बाबतीत महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिका कचऱ्यामुळे वारंवार गोत्यात आली असून कचऱ्याच्या अव्यवस्थापनामुळे महापालिकेची घसरगुंडी सुरूच आहे. ती कशी काय सावरणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे. महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत तळाला गेल्याचे जाहीर होताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला गेला नाही. त्यात दिरंगाई झाली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी देताना एप्रिल २०१५ मध्ये शहरातील नव्या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यास स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कायम आहे. या स्थगितीपश्चात महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी निविदा काढली आहे. या महिनाअखेर हे डम्पिंग ग्राउंड बंद केले जाणार आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी १० टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. बारावे येथे भरावभूमी विकसित करण्यासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. उच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात महापालिकेने धाव घेतली आहे. स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा उपायुक्त पवार यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)महापालिकेत १९९७ पासून सफाई कामगारांची भरतीच झालेली नाही. सध्या कचरा वाहतूक करण्यासाठी १५० वाहने आहेत. तसेच २ हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून दररोज कचरा उचलला जात आहे. आणखीन साडेपाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.कचरा उचलणाऱ्या ३०० वाहनांची आवश्यकता आहे. चार प्रभागांत कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी गेल्या महिन्यात ठराव मंजूर करण्यात आला आहे. २७ गावे महापालिकेत आली. त्या ठिकाणचे २०० कर्मचारी महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. शहरातून दररोज ५७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो. २७ गावांतून ७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो.