शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कचऱ्यामुळे केडीएमसीची घसरगुंडी सुरूच...

By admin | Updated: February 16, 2016 02:40 IST

केंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे

मुरलीधर भवार,  कल्याणकेंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे. या सर्वेक्षणामुळे कचऱ्याच्या बाबतीत महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिका कचऱ्यामुळे वारंवार गोत्यात आली असून कचऱ्याच्या अव्यवस्थापनामुळे महापालिकेची घसरगुंडी सुरूच आहे. ती कशी काय सावरणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे. महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत तळाला गेल्याचे जाहीर होताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला गेला नाही. त्यात दिरंगाई झाली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी देताना एप्रिल २०१५ मध्ये शहरातील नव्या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यास स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कायम आहे. या स्थगितीपश्चात महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी निविदा काढली आहे. या महिनाअखेर हे डम्पिंग ग्राउंड बंद केले जाणार आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी १० टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. बारावे येथे भरावभूमी विकसित करण्यासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. उच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात महापालिकेने धाव घेतली आहे. स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा उपायुक्त पवार यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)महापालिकेत १९९७ पासून सफाई कामगारांची भरतीच झालेली नाही. सध्या कचरा वाहतूक करण्यासाठी १५० वाहने आहेत. तसेच २ हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून दररोज कचरा उचलला जात आहे. आणखीन साडेपाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.कचरा उचलणाऱ्या ३०० वाहनांची आवश्यकता आहे. चार प्रभागांत कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी गेल्या महिन्यात ठराव मंजूर करण्यात आला आहे. २७ गावे महापालिकेत आली. त्या ठिकाणचे २०० कर्मचारी महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. शहरातून दररोज ५७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो. २७ गावांतून ७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो.