शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

कचऱ्यामुळे केडीएमसीची घसरगुंडी सुरूच...

By admin | Updated: February 16, 2016 02:40 IST

केंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे

मुरलीधर भवार,  कल्याणकेंद्र सरकारने स्वच्छ भारतसाठी केलेल्या ५३ शहरांच्या सर्वेक्षणात १० शहरे निवडली. त्यात, कल्याण-डोंबिवली महापालिका ही तळाला आहे. अस्वच्छतेच्या बाबतीत कल्याण-डोंबिवली महापालिका पहिली आली आहे. या सर्वेक्षणामुळे कचऱ्याच्या बाबतीत महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिका कचऱ्यामुळे वारंवार गोत्यात आली असून कचऱ्याच्या अव्यवस्थापनामुळे महापालिकेची घसरगुंडी सुरूच आहे. ती कशी काय सावरणार, असा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर आहे. महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत तळाला गेल्याचे जाहीर होताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवला गेला नाही. त्यात दिरंगाई झाली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी देताना एप्रिल २०१५ मध्ये शहरातील नव्या इमारतींना बांधकाम परवानगी देण्यास स्थगिती दिली आहे. ही स्थगिती कायम आहे. या स्थगितीपश्चात महापालिकेने आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी निविदा काढली आहे. या महिनाअखेर हे डम्पिंग ग्राउंड बंद केले जाणार आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी १० टन क्षमतेच्या प्रकल्पासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. बारावे येथे भरावभूमी विकसित करण्यासाठी निविदा अंतिम टप्प्यात आहे. उच्च न्यायालयाची स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात महापालिकेने धाव घेतली आहे. स्थगिती उठवली जाईल, अशी अपेक्षा उपायुक्त पवार यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)महापालिकेत १९९७ पासून सफाई कामगारांची भरतीच झालेली नाही. सध्या कचरा वाहतूक करण्यासाठी १५० वाहने आहेत. तसेच २ हजार सफाई कामगारांच्या माध्यमातून दररोज कचरा उचलला जात आहे. आणखीन साडेपाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.कचरा उचलणाऱ्या ३०० वाहनांची आवश्यकता आहे. चार प्रभागांत कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी गेल्या महिन्यात ठराव मंजूर करण्यात आला आहे. २७ गावे महापालिकेत आली. त्या ठिकाणचे २०० कर्मचारी महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. शहरातून दररोज ५७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो. २७ गावांतून ७० मेट्रीक टन कचरा गोळा केला जातो.