शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

केडीएमसीने थकबाकीदारांच्या ७०३ गाळ्यांना लावले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:57 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीकरिता थकबाकीदारांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीकरिता थकबाकीदारांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. एप्रिलपासून आतापर्यंत मालमत्ता कराची थकबाकी असलेले ७०३ गाळे सील करण्यात आले असून १६५ कोटी ३९ लाख रुपयांची कराची वसुली केली आहे. यंदाचे करवसुलीचे लक्ष्य ४५० कोटी रुपयांचे असून ते गाठण्यासाठी महापालिकेच्या हातात अद्याप साडेचार महिने शिल्लक आहेत. अर्थात उद्दीष्ट गाठण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाला अद्याप बरीच कसरत करावी लागणार आहे.महापालिका प्रशासनाकडून मालमत्ताकर वाढीचा प्रस्ताव महासभेत ठेवला जातो. मात्र या प्रस्तावाला सदस्यांचा विरोध आहे. महापालिकेत ज्या वेळेस जवाहरल नेहरू नागरी पुनरुर्त्थान अभियानांतर्गत प्रकल्प मंजूर करण्यात आले तेव्हा महापालिकेने २२ टक्के करवाढ दोन टप्प्यात केली होती. पहिल्या टप्प्यात ११ टक्के व दुसऱ्या टप्प्यात ११ टक्के करवाढ केली. या शर्तीवर योजना मंजूर झाल्या होत्या. महापालिकेतील करदाता हा विविध करांच्या स्वरुपात ७१ टक्के कर भरत आहे. अन्य महापालिकेच्या तुलनेत कर आकारणी जास्त आहे. हा कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ठीक नाही. मालमत्ता करातून मिळणाºया उत्पन्नाच्या आधारे महापालिका क्षेत्रातील विकास कामे केली जातात. आयुक्तांचा अर्थसंकल्प व स्थायी समितीने सुधारित केलेल्या अर्थसंकल्पात बरीच तफावत आहे. प्रत्यक्षातील उत्पन्न व केला जाणारा खर्च यात अंतर आहे. त्यामुळे विकास कामे होत नसल्याची ओरड सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक करतात.महापालिके प्रशासनाने मालमत्ता करातून मागच्या वर्षी कर वसुलीचे ३५० कोटी रुपयांचे उद्दीष्ट निश्चित केले होते. रोखरकमेच्या स्वरूपात व जप्त केलेल्या मालमत्तांची किंमत धरुन हे उद्दीष्ट गाठल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. कर वसुलीचे काम जानेवारीनंतर गतिमान पद्धतीने केले जाते. मात्र यंदाच्या वर्षी कर वसुली विभागाने एप्रिलमहिन्यापासूनच वसुलीच्या कामाला सुरुवात केली होती. थकबाकीदारांच्या विरोधात त्यांची मालमत्ता सील करण्याचे काम वर्षाच्या शेवटी न करता सुरुवातीपासून करण्याचा पायंडा यंदाच्या वर्षीपासून सुरु केला आहे. मालमत्ता कर वसुली विभागाचे कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांनी एप्रिल ते आत्तापर्यंत मालमत्ता कराची थकबाकी असणाºया ७०३ गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई केली आहे. आटाळी येथे केलेल्या कारवाईतून गेल्या आठवड्यात दोन लाख रुपये वसूल केले होते.दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीला लोकसभेची निवडणूक होती तर सप्टेंबर व आॅक्टोबर हा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कामकाजात गेला. त्यामुळे त्याचा वसुलीवर परिणाम झाला.>साडेचार महिन्यांत २८५ कोटींच्या वसुलीचे लक्ष्यविधानसभा निवडणुकीच्या आधी वसुली विभागाकडून जवळपास १३१ कोटी रुपये वसुली केली होती. निवडणुकीची आचारसंहिता संपताच कामगारांनी पुन्हा कारवाई गतिमान केली. आजमितीस वसुलीची रक्कम १६५ कोटी ३९ लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे. २५ आॅक्टोबर ते आजपर्यंत अवघ्या २० दिवसांत महापालिकेने २४ कोटी रुपयांची वसुली केली आहे. महापालिकेने यंदा वसुलीचे लक्ष्य ४५० कोटी रुपये ठेवले आहे.आत्तापर्यंत झालेली कराची वसुली पाहता येत्या साडेचार महिन्यांत महापालिकेस २८५ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. दोन निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक लागला नसता तर आतापर्यंत २०० कोटी रुपयांची वसुली केली गेली असती, असा अंदाज वसुली विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका