शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

केडीएमसीचे अधिकारी निलंबित होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 02:18 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची नियुक्ती जरी राज्य सरकारच्या आदेशानुसार करण्यात आली असली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची नियुक्ती जरी राज्य सरकारच्या आदेशानुसार करण्यात आली असली, तरी त्यांची सेवा सरकारकडे वर्ग केलेली नाही. त्यामुळे ते महापालिकेचे स्थानिक अधिकारी आहेत, असे पत्र नगरविकास खात्याचे अवर सचिव नवनाथ वाठ यांनी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांना पाठवले आहे. त्यामुळे घरत यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधातील निलंबनाच्या ठरावाची पालिका अंमलबजावणी करणार का, असा प्रश्न हळबे यांनी विचारला आहे.या अधिकाºयांना पाठीशी घातले तरी अडचण आणि कारवाई केली तरी अडचण अशा कात्रीत प्रशासन सापडले असून नवे आयुक्त अधिकाºयांना वेसण घालतात की ठरावाची मुदतीत अंमलबजावणी न करता तो विखंडित होईपर्यंत वाट पाहतात याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.हळबे आणि भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी बेकायदा बांधकामांच्या कारवाईत अडथळा निर्माण करून जातीवाचक शब्द वापरल्याची तक्रार महापालिकेचे प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांनी मानपाडा पोलिसांत केली होती. महासभेत बेकायदा बांधकामाचा विषय चर्चेला येताच महासभेने हळबे व धात्रक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणारे भांगरे यांच्यासह उपायुक्त सुरेश पवार, घरत यांना निलंबित करावे, असा ठराव मंजूर केला. त्यानंतर घरत यांनी, हाठराव बेकायदा आहे, अशी भूमिका घेतली.महासभेला माझ्याविरोधात कारवाईचा अधिकारच नाही. कारण माझी अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे. त्यामुळे मी पालिकेचा नाही, तर राज्य सरकारचा अधिकारी आहे, असा युक्तिवाद केला होता. परंतु, आयुक्त गोविंद बोडके यांनी घरत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यावर आयुक्तांना माझ्याविरोधात कारवाईचा अधिकार नाही. तो अधिकार सरकारलाच आहे, असे घरत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे निलंबनाचा ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.