शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कोविडवर केडीएमसीचे आतापर्यंत ३५ कोटी खर्च; बिले अदा, अद्याप उभारली जात आहे यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:24 IST

मनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच अद्याप काही यंत्रणा उभारण्यात येत असल्याने आणखी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मनपा हद्दीत मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. जुलैमध्ये रुग्णसंख्या शिगेला पोहोचली होती. मनपाची अवघी दोनच रुग्णालये व १५ आरोग्य केंद्रे होती. रुग्णालयांत डॉक्टर व नर्सची संख्या अपुरी होती. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी मनपाने जम्बो सेटअप उभारला. सुरुवातीला रुग्णवाहिका, आॅक्सिजन, आयसीयू बेड व व्हेंटिलेटरही मिळत नव्हते. मनपाने प्रथम शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केले.

परंतु, तेथे केवळ ६३ बेडच उपलब्ध झाले. त्यानंतर मनपाने क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृह, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, आसरा फाउंडेशनची शाळा येथे कोविड रुग्णालये उभारल्याने ७६२ बेड उपलब्ध झाले आहेत. तर, फडके आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली, टिटवाळा येथे रुग्णालये उभारण्याचे काम अजून सुरू आहे. तेथील बेड उपलब्ध झाल्यास एकूण एक हजार ३३१ बेड उपलब्ध होतील.मनपाने दुसरीकडे तीन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत केली. तेथे सुरुवातीला एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले गेले. त्याचा खर्च मनपाने केला होता. टाटा आमंत्रण येथे दोन ते तीन हजार रुग्णांचा चहा, नाश्ता, दोनवेळच्या जेवणाचा खर्च मनपा करत आहे.

मनपाने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची भरती केली. रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या. मनपाने टोकलिझुमॅब, रेमडेसिवीर ही दोन महागडी इंजेक्शन खरेदी करून रुग्णांना उपलब्ध करून दिली आहेत. तसेच वॉररूम व कॉलसेंटर सुरू केले आहे. रुग्णांना आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू मशीन उपलब्ध करून दिले आहे. या सर्व बाबींवर आतापर्यंत ३५ कोटी खर्च झाले असून, त्याची बिले प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना दिली आहेत. यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर समाधान व्यक्त केले जात आहे.सरकारकडून मिळाले १७ कोटीमनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता. मात्र, त्यापेक्षा मनपाचा दुप्पट निधी खर्च झाला आहे. सध्या कोविड रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. येत्या २५ दिवसांत ही संख्या कमी होऊ शकते, असा अंदाज असला, तरी रेल्वे सुरू झाल्यास अथवा अनलॉकमध्ये नागरिक जास्त संख्येने बाहेर पडत असल्याने पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. तेव्हा आरोग्य यंत्रणा कमी पडू नये, यासाठी पुरेशी यंत्रणा उभारल्यास ती उपयुक्त ठरू शकते, असा दावा मनपाने केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या