शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

कोविडवर केडीएमसीचे आतापर्यंत ३५ कोटी खर्च; बिले अदा, अद्याप उभारली जात आहे यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:24 IST

मनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच अद्याप काही यंत्रणा उभारण्यात येत असल्याने आणखी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मनपा हद्दीत मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. जुलैमध्ये रुग्णसंख्या शिगेला पोहोचली होती. मनपाची अवघी दोनच रुग्णालये व १५ आरोग्य केंद्रे होती. रुग्णालयांत डॉक्टर व नर्सची संख्या अपुरी होती. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी मनपाने जम्बो सेटअप उभारला. सुरुवातीला रुग्णवाहिका, आॅक्सिजन, आयसीयू बेड व व्हेंटिलेटरही मिळत नव्हते. मनपाने प्रथम शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केले.

परंतु, तेथे केवळ ६३ बेडच उपलब्ध झाले. त्यानंतर मनपाने क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृह, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, आसरा फाउंडेशनची शाळा येथे कोविड रुग्णालये उभारल्याने ७६२ बेड उपलब्ध झाले आहेत. तर, फडके आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली, टिटवाळा येथे रुग्णालये उभारण्याचे काम अजून सुरू आहे. तेथील बेड उपलब्ध झाल्यास एकूण एक हजार ३३१ बेड उपलब्ध होतील.मनपाने दुसरीकडे तीन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत केली. तेथे सुरुवातीला एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले गेले. त्याचा खर्च मनपाने केला होता. टाटा आमंत्रण येथे दोन ते तीन हजार रुग्णांचा चहा, नाश्ता, दोनवेळच्या जेवणाचा खर्च मनपा करत आहे.

मनपाने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची भरती केली. रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या. मनपाने टोकलिझुमॅब, रेमडेसिवीर ही दोन महागडी इंजेक्शन खरेदी करून रुग्णांना उपलब्ध करून दिली आहेत. तसेच वॉररूम व कॉलसेंटर सुरू केले आहे. रुग्णांना आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू मशीन उपलब्ध करून दिले आहे. या सर्व बाबींवर आतापर्यंत ३५ कोटी खर्च झाले असून, त्याची बिले प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना दिली आहेत. यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर समाधान व्यक्त केले जात आहे.सरकारकडून मिळाले १७ कोटीमनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता. मात्र, त्यापेक्षा मनपाचा दुप्पट निधी खर्च झाला आहे. सध्या कोविड रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. येत्या २५ दिवसांत ही संख्या कमी होऊ शकते, असा अंदाज असला, तरी रेल्वे सुरू झाल्यास अथवा अनलॉकमध्ये नागरिक जास्त संख्येने बाहेर पडत असल्याने पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. तेव्हा आरोग्य यंत्रणा कमी पडू नये, यासाठी पुरेशी यंत्रणा उभारल्यास ती उपयुक्त ठरू शकते, असा दावा मनपाने केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या