शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोविडवर केडीएमसीचे आतापर्यंत ३५ कोटी खर्च; बिले अदा, अद्याप उभारली जात आहे यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:24 IST

मनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत ३५ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तसेच अद्याप काही यंत्रणा उभारण्यात येत असल्याने आणखी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मनपा हद्दीत मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. जुलैमध्ये रुग्णसंख्या शिगेला पोहोचली होती. मनपाची अवघी दोनच रुग्णालये व १५ आरोग्य केंद्रे होती. रुग्णालयांत डॉक्टर व नर्सची संख्या अपुरी होती. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी मनपाने जम्बो सेटअप उभारला. सुरुवातीला रुग्णवाहिका, आॅक्सिजन, आयसीयू बेड व व्हेंटिलेटरही मिळत नव्हते. मनपाने प्रथम शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केले.

परंतु, तेथे केवळ ६३ बेडच उपलब्ध झाले. त्यानंतर मनपाने क्रीडासंकुलातील बंदिस्त सभागृह, डोंबिवली जिमखाना, पाटीदार भवन, आसरा फाउंडेशनची शाळा येथे कोविड रुग्णालये उभारल्याने ७६२ बेड उपलब्ध झाले आहेत. तर, फडके आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली, टिटवाळा येथे रुग्णालये उभारण्याचे काम अजून सुरू आहे. तेथील बेड उपलब्ध झाल्यास एकूण एक हजार ३३१ बेड उपलब्ध होतील.मनपाने दुसरीकडे तीन खाजगी रुग्णालये अधिग्रहीत केली. तेथे सुरुवातीला एक महिन्यापेक्षा जास्त काळ कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले गेले. त्याचा खर्च मनपाने केला होता. टाटा आमंत्रण येथे दोन ते तीन हजार रुग्णांचा चहा, नाश्ता, दोनवेळच्या जेवणाचा खर्च मनपा करत आहे.

मनपाने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयची भरती केली. रुग्णवाहिका भाड्याने घेतल्या. मनपाने टोकलिझुमॅब, रेमडेसिवीर ही दोन महागडी इंजेक्शन खरेदी करून रुग्णांना उपलब्ध करून दिली आहेत. तसेच वॉररूम व कॉलसेंटर सुरू केले आहे. रुग्णांना आॅक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू मशीन उपलब्ध करून दिले आहे. या सर्व बाबींवर आतापर्यंत ३५ कोटी खर्च झाले असून, त्याची बिले प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना दिली आहेत. यामुळे पालिका प्रशासनाच्या कारभारावर समाधान व्यक्त केले जात आहे.सरकारकडून मिळाले १७ कोटीमनपाच्या लेखा विभागाने कोविडसाठी एक वेगळे खाते उघडले आहे. अन्य उत्पन्नातील पैसाही त्यावरच खर्च केला जात आहे. मनपास राज्य सरकारकडून १७ कोटींचा निधी कोविडसाठी मिळाला होता. मात्र, त्यापेक्षा मनपाचा दुप्पट निधी खर्च झाला आहे. सध्या कोविड रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. येत्या २५ दिवसांत ही संख्या कमी होऊ शकते, असा अंदाज असला, तरी रेल्वे सुरू झाल्यास अथवा अनलॉकमध्ये नागरिक जास्त संख्येने बाहेर पडत असल्याने पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. तेव्हा आरोग्य यंत्रणा कमी पडू नये, यासाठी पुरेशी यंत्रणा उभारल्यास ती उपयुक्त ठरू शकते, असा दावा मनपाने केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या