शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीवर हंडा मोर्चा

By admin | Updated: March 16, 2017 02:48 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांतील बेकायदा बांधकामधारक पाणी पळवत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांतील बेकायदा बांधकामधारक पाणी पळवत असल्याने ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. या कृत्रिम पाणीटंचाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महापालिकेविरोधात बुधवारी २७ गावांतील संतप्त नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर भव्य हंडाकळशी मोर्चा काढला.२७ गावांना पाणीपुरवठा नियमित होत नाही. त्यामुळे येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात बेकायदा बांधकामे जोमात सुरू आहेत. बांधकामधारक पाणी पळवत आहेत. परिणामी, ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाणीटंचाईप्रश्नी महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा भोपर परिसरातील भाजपा नगरसेविका रविना माळी यांनी आठवडाभरापूर्वीच दिला होता. मात्र, महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे बुधवारी भोपर परिसरातून काढलेल्या मोर्चात नगरसेविका माळी, भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी, नगरसेविका आशालता बाबर, सुनीता पाटील, प्रेमा म्हात्रे, दमयंती वझे आदी सहभागी झाले होते. मोर्चात जवळपास चार हजारांपेक्षा जास्त ग्रामस्थ मुलांसह सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. हा मोर्चा पोलिसांनी महापालिका मुख्यालयाजवळ रोखून धरला होता. महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याविरोधात मुर्दाबादचे फलक दर्शवण्यात आले. २७ गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, आगरी समाजाच्या नादी लागू नका, अशा इशारा संदीप माळी यांनी दिला. २७ गावांतील बेकायदा बांधकामांविरोधात तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. उपायुक्त सु.रा. पवार कारवाई करत नाहीत. अतिरिक्त आयुक्त घरत त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप माळी यांनी केला आहे. मोर्चाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त दीपक पाटील यांची भेट घेत त्यांना एक निवेदन दिले. त्यावर पाटील यांनी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने दोन दिवसांत २७ गावांतील पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मोर्चात शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मनसेचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले नसले तरी त्यांचा मोर्चाला पाठिंबा होता. (प्रतिनिधी)पारदर्शकता दाखवा... : बेकायदा बांधकामप्रकरणी नंदलाल समिती, नांगनुरे समिती आणि अग्यार समितीने दिलेल्या अहवालांची अंमलबजावणी राज्य सरकारने त्वरित करून पारदर्शक असल्याचे कृतीतून दाखवून द्यावे, असे आवाहन मनसेच्या जनहित कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी केले आहे. पाणीप्रश्न सोडवूपाणीप्रश्न सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. २७ गावांचा पाणीप्रश्न नक्कीच सोडवला जाणार आहे. तेथील ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सांगितले.