शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

केडीएमसी आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

By admin | Updated: December 22, 2016 06:02 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरील याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादापुढे बुधवारी पहिली

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरील याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादापुढे बुधवारी पहिली सुनावणी झाली. यावेळी लवादाने महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना १० जानेवारीला होणाऱ्या पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन घनकचरा गोळा केला जातो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच डम्पिंग खाडी व नदीकिनाऱ्यापासून लांब असले पाहिजे. मात्र, आधारवाडी डम्पिंग खाडीजवळ आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ते बंद करण्याचा आदेश दिला आहे. शिवाय, त्याची क्षमताही संपली आहे.आधारवाडी डम्पिंग बंद करून घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. महापालिकेने २००० मधील या नियमावलीचे उल्लंघन केले आहे. प्रकल्पही उभारलेला नाही. न्यायालयाने फटकारल्यावरही महापालिकेची कार्यवाही संथगतीनेच सुरू आहे. मागील दीड वर्षापासून महापालिका केवळ आधारवाडी डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून बारावे व मांडा येथे भरावभूमी क्षेत्र विकसित करण्यासाठी निविदा मागवत आहेत. जवळपास ११ वेळा फेरनिविदा मागवूनदेखील त्याला प्रतिसाद मिळत नाही. आता प्रतिसाद मिळाला आहे. तो विषय स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाकडून हरित लवादाकडे वर्ग झाली आहे. त्याची पहिली सुनावणी बुधवारी झाली. त्यावेळी लवादाने आयुक्त रवींद्रन यांनी १० जानेवारी रोजीच्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहे. घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी आतापर्यंत काय केले, त्यातून आतापर्यंत काय झाले, याचा अहवालच आयुक्तांना १० जानेवारीला लवादासमोर सादर करावा लागणार आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीच्या आधारे राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी लवादासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीतील घनकचरा प्रकल्प व मलनि:सारण प्रकल्प मे २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन दिली आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे आयुक्त पुन्हा १० जानेवारीच्या सुनावणीत काय माहिती देतात, हे त्यादिवशीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केडीएमसीच्या घनकचरा प्रकल्पाविषयी सद्य:स्थिती अहवाल मागवला होता. मंडळाने तो अहवाल लवादाला सादर केला आहे. या अहवालानुसार महापालिकेने आधारवाडी डम्पिंग न्यायालयाच्या आदेशानंतर बंद केलेले नाही. केवळ बंद करण्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच डम्पिंग बंद करून इतर जागेवर ते विकसित करावयाचे आहे. त्याठिकाणी त्या जागाही विकसित केलेल्या नाहीत. प्रकल्पही उभारलेला नाही. त्यामुळे त्याठिकाणच्या नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीसह कचऱ्याला लागणाऱ्या आगीचा त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)