शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

केडीएमसी प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:21 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला.

कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. नियोजन आणि सुविधांअभावी गणेशभक्तांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. यावर तातडीने नियोजनाच्या दृष्टीने तयारी करावी, सदस्यांच्या सूचना कागदावरच न ठेवता त्याबाबत कृती व्हावी, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.गणेशोत्सव जवळ आल्याने महापालिकेने कोणते नियोजन केले आहे, असा सवाल सभा सुरू होण्यापूर्वी भाजपा सदस्य विकास म्हात्रे यांनी केला. मागील वर्षी आपल्या प्रभागातील गणेशघाटावर कोणत्याही सुविधा नव्हत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. गणेशमूर्ती विसर्जन करणारी चार मुले वाहून गेली होती. परंतु, त्यांना पोहता येत असल्याने त्यांचा जीव वाचला. तेथे बोटींची व्यवस्थाही महापालिकेने केलेली नव्हती, तसेच अग्निशमन दलाचे जवानही कोणतीही साधने नसल्याने नुसते बघ्याची भूमिका घेत होते, असेही म्हात्रे म्हणाले.यावर सभापती रमेश म्हात्रे यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी सुधाकर कुलकर्णी यांना विचारणा करताच त्यांनी मागील वर्षी ५२ ठिकाणच्या विसर्जनस्थळी अग्निशमन दलाचे जवान नेमले होते. परंतु, मनुष्यबळाअभावी सर्वच ठिकाणी कर्मचारी देणे शक्य झाले नाही. यंदा १०० स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे, तसेच अस्तित्वात असलेल्या बोटींव्यतिरिक्त आणखी चार बोटी घेतल्याने या वेळेस गैरसोय होणार नाही, असे त्यांनी सांगितले. या स्वयंसेवकांची माहिती नाव आणि फोटोसह द्या, अशा सूचना सभापती म्हात्रे यांनी या वेळी महापालिका प्रशासनाला केल्या.