शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

केडीएमसी प्रशासन धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:21 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला.

कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे नियोजन हे ठोस कृतीअभावी कागदावरच राहत असल्याचा आरोप शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केला. नियोजन आणि सुविधांअभावी गणेशभक्तांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. यावर तातडीने नियोजनाच्या दृष्टीने तयारी करावी, सदस्यांच्या सूचना कागदावरच न ठेवता त्याबाबत कृती व्हावी, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.गणेशोत्सव जवळ आल्याने महापालिकेने कोणते नियोजन केले आहे, असा सवाल सभा सुरू होण्यापूर्वी भाजपा सदस्य विकास म्हात्रे यांनी केला. मागील वर्षी आपल्या प्रभागातील गणेशघाटावर कोणत्याही सुविधा नव्हत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. गणेशमूर्ती विसर्जन करणारी चार मुले वाहून गेली होती. परंतु, त्यांना पोहता येत असल्याने त्यांचा जीव वाचला. तेथे बोटींची व्यवस्थाही महापालिकेने केलेली नव्हती, तसेच अग्निशमन दलाचे जवानही कोणतीही साधने नसल्याने नुसते बघ्याची भूमिका घेत होते, असेही म्हात्रे म्हणाले.यावर सभापती रमेश म्हात्रे यांनी अग्निशमन दलाचे अधिकारी सुधाकर कुलकर्णी यांना विचारणा करताच त्यांनी मागील वर्षी ५२ ठिकाणच्या विसर्जनस्थळी अग्निशमन दलाचे जवान नेमले होते. परंतु, मनुष्यबळाअभावी सर्वच ठिकाणी कर्मचारी देणे शक्य झाले नाही. यंदा १०० स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे, तसेच अस्तित्वात असलेल्या बोटींव्यतिरिक्त आणखी चार बोटी घेतल्याने या वेळेस गैरसोय होणार नाही, असे त्यांनी सांगितले. या स्वयंसेवकांची माहिती नाव आणि फोटोसह द्या, अशा सूचना सभापती म्हात्रे यांनी या वेळी महापालिका प्रशासनाला केल्या.