शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

कारगिल विजयदिनी ३० सिंधीबांधवांना नागरिकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:29 IST

ठाण्यातील माजी सैनिक, वीरपत्नींना केले सन्मानित : नियोजन भवनमध्ये पार पडला सोहळा

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी विसावा कारगिल युद्ध विजय दिन आणि माजी सैनिक संमेलन झाले. यावेळी जिल्ह्यातील ३० सिंधीबांधवांना भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे प्रमाणपत्र ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व आमदार गुरुमुख जगवानी यांच्या हस्ते देण्यात आले.

नियोजन भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून हुतात्मा जवान स्मृती प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. या कार्यक्र मासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीरपत्नी, माजी सैनिक संघटना आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या समस्या, अडचणी आणि तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात आले.

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वीरपत्नी मीरादेवी, सत्याराणा, बेबी जोन्ह सी, सुप्रिया सुधीर आंब्रे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. याप्रमाणेच कारगिल युद्धात सहभागी झालेले माजी सैनिक संजय चौधरी, संजय पवार, कॅप्टन मिश्रा यांना जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी कारगिल हुतात्मा जवानांना पुष्पहार आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर प्रांजळ जाधव आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.