शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१०० किल्ल्यांची सायकलस्वारी; करंदीकर यांचे २० वर्षांत धाडस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:41 IST

टिळक चौकात राहणाऱ्या करंदीकर यांनी १९८९ मध्ये दहावीला असताना प्रथम साध्या सायकलने कल्याण-भीमाशंकरची सफर केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नववर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबरला रंगणाऱ्या पार्ट्या, कार्यक्रमांना बगल देत कल्याणचे सुशांत करंदीकर (वय ४७) हे २० वर्षांपासून सायकलने गडकिल्ल्यांची सफर करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १०० गडकिल्ले सायकलने सर केले आहेत. यंदा त्यांनी रायगड किल्ला सायकलने गाठला आहे. सुरुवातीला एकाकी असलेली ही अनोखी सफर अनेकांना सहभागी करून मोठी होत चालली आहे.

टिळक चौकात राहणाऱ्या करंदीकर यांनी १९८९ मध्ये दहावीला असताना प्रथम साध्या सायकलने कल्याण-भीमाशंकरची सफर केली. त्यानंतर त्यांना सायकल सफरीचा छंद लागला. १९९८ मध्ये त्यांनी एड्सच्या जागृतीसाठी सायकलने भारतभ्रमण केले. मुंबई-पुणे सायकल स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाले. मात्र, स्पर्धेत गती तर, गडकिल्ल्यांवर सायकलने जाताना मानसिक व शारीरिक संतुलन महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.

सुरुवातीला साध्या सायकलने सफर करताना अडचणी येत असत. मात्र, आता आधुनिक सायकलींनी या मोहिमा करण्याचा छंदच करंदीकर यांना लागला आहे. ३१ डिसेंबरला काहीतरी वेगळे करण्याचा मानस त्यांनी उरी बाळगला. सगळ्य़ात प्रथम हरिश्चंद्र गडावर ते सायकलने गेले. सुरुवातीला एक गड ते सायकलने करत. मग दोन गड गाठू लागले. त्यात अनेकांना सहभागी करून घेऊ लागले. २५ वर्षांत १०० गडकिल्ल्यांची सफर सायकलने करण्याचे लक्ष्य त्यांचे होते. २०१० मध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील १६ गडकिल्ल्यांची सायकलने सफर केली. त्यामुळे २० वर्षांतच त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

दरम्यान, यंदाच्या रायगडावरील सायकल मोहिमेत करंदीकर यांच्यासोबत कृष्णा नाईक, दीपाली कंपाली, दैविक कंपाली, दिवाकर भाटवडेकर, वरद मराठे, चिन्मयी ढवळे, मन नाईक हे देखील सहभागी झाले होते. रायगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने गडावर सायकल नेता येत नाही. त्यामुळे जिथपर्यंत मुभा होती, तिथपर्यंत त्यांनी सायकलप्रवास केला.

‘२५० किल्ले सर करण्याचे लक्ष्य’वर्षाच्या सुरुवातीस मोहिमा न आखता वेळ मिळेल तशा वर्षभरात त्या पार पाडायच्या, असे करंदीकर यांचे मत आहे. आगामी काळात उर्वरित जवळपास २५० गडकिल्ल्यांची सायकल सफर त्यांना करायची आहे. वर्ष संपते तेव्हा, आपण नव्या वर्षात शरीर रिचार्ज व फिट कसे राहील, यासाठी या मोहिमा करीत असल्याचे ते म्हणाले.