शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

१०० किल्ल्यांची सायकलस्वारी; करंदीकर यांचे २० वर्षांत धाडस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:41 IST

टिळक चौकात राहणाऱ्या करंदीकर यांनी १९८९ मध्ये दहावीला असताना प्रथम साध्या सायकलने कल्याण-भीमाशंकरची सफर केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नववर्षाच्या स्वागतानिमित्त ३१ डिसेंबरला रंगणाऱ्या पार्ट्या, कार्यक्रमांना बगल देत कल्याणचे सुशांत करंदीकर (वय ४७) हे २० वर्षांपासून सायकलने गडकिल्ल्यांची सफर करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १०० गडकिल्ले सायकलने सर केले आहेत. यंदा त्यांनी रायगड किल्ला सायकलने गाठला आहे. सुरुवातीला एकाकी असलेली ही अनोखी सफर अनेकांना सहभागी करून मोठी होत चालली आहे.

टिळक चौकात राहणाऱ्या करंदीकर यांनी १९८९ मध्ये दहावीला असताना प्रथम साध्या सायकलने कल्याण-भीमाशंकरची सफर केली. त्यानंतर त्यांना सायकल सफरीचा छंद लागला. १९९८ मध्ये त्यांनी एड्सच्या जागृतीसाठी सायकलने भारतभ्रमण केले. मुंबई-पुणे सायकल स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाले. मात्र, स्पर्धेत गती तर, गडकिल्ल्यांवर सायकलने जाताना मानसिक व शारीरिक संतुलन महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.

सुरुवातीला साध्या सायकलने सफर करताना अडचणी येत असत. मात्र, आता आधुनिक सायकलींनी या मोहिमा करण्याचा छंदच करंदीकर यांना लागला आहे. ३१ डिसेंबरला काहीतरी वेगळे करण्याचा मानस त्यांनी उरी बाळगला. सगळ्य़ात प्रथम हरिश्चंद्र गडावर ते सायकलने गेले. सुरुवातीला एक गड ते सायकलने करत. मग दोन गड गाठू लागले. त्यात अनेकांना सहभागी करून घेऊ लागले. २५ वर्षांत १०० गडकिल्ल्यांची सफर सायकलने करण्याचे लक्ष्य त्यांचे होते. २०१० मध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील १६ गडकिल्ल्यांची सायकलने सफर केली. त्यामुळे २० वर्षांतच त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले.

दरम्यान, यंदाच्या रायगडावरील सायकल मोहिमेत करंदीकर यांच्यासोबत कृष्णा नाईक, दीपाली कंपाली, दैविक कंपाली, दिवाकर भाटवडेकर, वरद मराठे, चिन्मयी ढवळे, मन नाईक हे देखील सहभागी झाले होते. रायगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असल्याने गडावर सायकल नेता येत नाही. त्यामुळे जिथपर्यंत मुभा होती, तिथपर्यंत त्यांनी सायकलप्रवास केला.

‘२५० किल्ले सर करण्याचे लक्ष्य’वर्षाच्या सुरुवातीस मोहिमा न आखता वेळ मिळेल तशा वर्षभरात त्या पार पाडायच्या, असे करंदीकर यांचे मत आहे. आगामी काळात उर्वरित जवळपास २५० गडकिल्ल्यांची सायकल सफर त्यांना करायची आहे. वर्ष संपते तेव्हा, आपण नव्या वर्षात शरीर रिचार्ज व फिट कसे राहील, यासाठी या मोहिमा करीत असल्याचे ते म्हणाले.