शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

कपिल पाटील यांचे उपटले कान?

By admin | Updated: May 30, 2017 05:59 IST

जनमताचा कौल काहीही असला, तरी सत्ता आणि पैशांच्या बळावर आपल्या पुतण्याला महापौर करण्याकरिता इरेला पेटलेले

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी/ठाणे : जनमताचा कौल काहीही असला, तरी सत्ता आणि पैशांच्या बळावर आपल्या पुतण्याला महापौर करण्याकरिता इरेला पेटलेले खासदार कपिल पाटील यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी कान उपटल्याची चर्चा आहे. संपूर्ण बहुमत प्राप्त केलेला काँग्रेस पक्ष फोडून सत्ता स्थापन केली, तर भाजपावर सत्तालोलुपतेची टीका होईल. त्यापेक्षा सत्तेचे पाठबळ असतानाही मतदारांनी चपराक का दिली, त्याचे आत्मचिंतन करण्याचा सल्ला भाजपाच्या नेत्यांनी पाटील यांना दिल्याचे समजते.भिवंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन ते तीनवेळा पायधूळ झाडायला लावून पाटील यांनी आपल्याबरोबरच त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, प्रत्यक्षात भाजपाची स्वबळावर सत्ता दूरच राहिली. आता कोणार्क विकास आघाडीच्या कुबड्या घेऊन सत्तेचे गणित जुळवण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुुरू असून त्यामुळे भिवंडी भाजपात जुने निष्ठावंत भाजपावाले विरुद्ध कपिल पाटील यांच्या कंपूतील नवभाजपावाले यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मुस्लिमांनी मते दिली. मात्र भिवंडी, मालेगाव येथील कौल पाहता मुस्लिम समाजाचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपा व संघ परिवारातील नेत्यांची आगखाऊ वक्तव्ये आणि उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला रिंगणात न उतरवता विजय संपादन केल्याची भाजपा नेत्यांची मिरवलेली शेखी यांचे परिणाम या निवडणुकीत दिसल्याचे बोलले जाते.भिवंडीतील मतदारांनी एमआयएमसारख्या जहाल जातीयवादी पक्षाला अव्हेरून सर्वसमावेशक विचारांच्या सेक्युलर काँग्रेसचा पर्याय निवडला. शहरात निवडणूक काळात मुस्लिम समाजातील खान, मोमीन असा कोकणी-उत्तर भारतीय मुस्लिमांमधील वाद उकरून काढला जातो. मात्र, यावेळी उत्तर भारतीय व स्थानिक मुस्लिमांनी एकत्र राहून कौल दिला.रमजानमुळे नगरसेवकांना हलवणे अशक्यभाजपाच्या नेत्यांनी काँग्रेस फोडण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चा असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे निवडणुकीतील निरीक्षक माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली. आपण सर्व पक्षासोबत असून कुठल्याही परिस्थितीत आमिषांना बळी पडणार नाही, अशी ग्वाही नगरसेवकांनी बैठकीत दिली. निवडणूक निकालाची अधिसूचना जारी झाल्यावर काँग्रेस आपल्या ४७ नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करील. त्यानंतर, फाटाफूट करणे कुणालाही शक्य होणार नाही. जेव्हा पक्षाचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा काँग्रेसही त्यांना दूर नेऊन ठेवू शकते. मात्र, सध्या शहरात रमजानच्या पवित्र महिन्याचे वातावरण असून रोजे सुरू आहेत. काँग्रेसचे ४३ मुस्लिम नगरसेवक आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन कुठे बाहेर जाणे अशक्य आहे.माजी खासदार तथा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश टावरे यांनी सांगितले की, जनमताचा भक्कम कौल पाहिल्यावर तरी भाजपाने स्वप्न पाहणे सोडले पाहिजे. भाजपाने लोकांनी दिलेला कौल स्वीकारला पाहिजे. काँग्रेसचाच महापौर महापालिकेवर बसणार आहे. भिवंडीतील सपा शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामेमहानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या असफलतेची नैतिक जबाबदारी स्वीकारत समाजवादी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राजीनामा दिला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत सपाने ३५ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी केवळ दोन उमेदवार निवडून आले. या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दुस्सलाम नोमानी यांनी आपल्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसीम आझमी यांच्याकडे पाठवले आहेत, अशी माहिती पक्षाचे मीडिया प्रभारी सुभाषचंद्र यादव यांनी दिली.सत्ता मिळाली नाही तरी खचू नका - रवींद्र चव्हाण महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळाली नसली, तरी खचून जाऊ नका. शहराच्या विकासाकरिता विरोधक म्हणून आग्रही भूमिका घेत राहा, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी केले. भाजपा नगरसेवकांची संख्या आठवरून २० पर्यंत वाढवल्याबद्दल खा. कपिल पाटील यांचे चव्हाण यांनी कौतुक केले.कणेरी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी खा. कपिल पाटील, आ. महेश चौघुले, सतीश धोंड, शहराध्यक्ष संतोष चव्हाण, श्याम अग्रवाल, ममता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.खा. पाटील यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे वाढलेले संख्याबळ हे फळ आहे. यशाने हुरळून न जाता मतदारांच्या भावनांचा, आशाआकांक्षांचा सन्मान ठेवा, असे चव्हाण म्हणाले. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात कसे काम करायचे, याचे धडे नवनिर्वाचित नगरसेवकांना लवकरच दिले जातील, असेही ते म्हणाले.