शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

दिवे अंजूरच्या सरपंचांच्या खुर्चीला कपिल पाटील यांचे वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

भिवंडी : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे ...

भिवंडी : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेचा समारोप शुक्रवारी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर या त्यांच्या मूळगावी झाला. त्यांचे गावात जाेरदार स्वागत झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेऊन त्यांनी कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले आणि तेथील सरपंचांच्या खुर्चीला वंदन केले. यावेळी पाटील भावूक झाले होते.

१९८८ मध्ये पाटील यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा दिवे अंजूरच्या सरपंचपदापासून सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत विविध पदे भूषवून थेट केंद्रीय राज्यमंत्रिपदाला गवसणी घातली. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री बनण्याचे स्वप्न मी कधी पाहिले नव्हते. ग्रामस्थांनी १९८८ मध्ये दाखवलेला विश्वास प्रत्येक वेळी सार्थ ठरविल्याने कुटुंबीयांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाची पोचपावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सरपंचपदावर असताना ज्या खुर्चीवर मी बसलाे, त्या खुर्चीला वंदन करण्यासाठी मी आलाे असल्याचे त्यांनी सांगितले. पाच दिवसांनंतर जनआशीर्वाद यात्रेचा समारोप करून तब्बल दीड महिन्यांनंतर घरी परतलेल्या पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.