शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

खाडीकिनाऱ्यांवरील १६०० हेक्टरवरील कांदळवन आता पुन्हा बहरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:16 IST

न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळणार दिलासा; रेतीमाफियांना चाप बसण्याची शक्यता

- सुरेश लोखंडेठाणे : नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, नागलाबंदर, मीरा-भार्इंदर, भिवंडी, दिवा, कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या खाडीकिनारी सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन, खारफुटी आणि तिवरांचे जंगल आहे. सततच्या कत्तलीनंतरही काही कांदळवने तग धरून आहेत. काही ठिकाणी जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित करून सुमारे ७२ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. आता मुंबई उच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिल्यामुळे कांदळवनाची वाढ होऊन ते बहरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.समुद्र, खाडीकिनारी उद्भवणाºया त्सुनामीच्या संकटापासून कांदळवन व तिवरांच्या जंगलामुळे बचाव होतो. यामुळे त्यांचा ºहास होऊ न देता त्यांचे संरक्षण करण्याचे न्यायालयीन आदेश आहेत. सोमवारी पुन्हा त्यावर शिक्कामोर्तब होऊन कांदळवन, तिवरांच्या झाडांना सक्तीने वाढवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले. रेतीच्या हव्यासापोटी रेतीमाफियांनी ठिकठिकाणचे कांदळवन नष्ट करून मनसोक्त रेती उत्खनन केली. यामुळे दिवाखाडीसह, मुंब्रा, कोपर, कळवा आदी खाडीकिनारे ओस पडले आहेत. कांदळवन नष्ट झाल्यामुळे या खाडीचे पाणी रेल्वे रुळांपर्यंत पोहोचल्याचे वास्तव आहे.ठिकठिकाणच्या खाडीकिनारी दोन हजार हेक्टरपेक्षा क्षेत्रावर कांदळवन-तिवरांची झाडे आहेत. पण रेती काढण्यासाठी अडथळा ठरणाºया या तिवराच्या झाडांसह कांदळवनाच्या बुंध्याशी केमिकल्स टाकून रेतीमाफियांनी ते नष्ट केले. यामुळे काही ठिकाणचे खाडीकिनारे पूर्णपणे ओसाड झाले. त्यावर भरतीचे पाणी शिरून या मोकळ्या ठिकाणी गाळ साचला. मात्र या गाळातूनही नष्ट केलेले तिवरांच्या झाडांचा बुंधा, लाकूडतोड करून अस्तित्वाची जाणीव करून देताना दिसून येत आहे. प्रशासनाकडे सुमारे एक हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनाची नोंद आढळते. पण सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त कांदळवन, तिवरांचे क्षेत्र जिल्ह्यात असल्याचे जाणकारांकडून कळते. या वनाच्या संवर्धनासाठी न्यायालयीन आदेशानंतर राजपत्रातदेखील वनसंवर्धन घोषित करण्यात आले होते. सोमवारी याचिकेवर न्यायालयात सुनावणी होऊन प्रशासनावर न्यायालयाने जोरदार ताशेरे आढले. कांदळवनाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या आधीच कांदळवन किंवा पाणथळ जागेचा नाश करणाºया सुमारे ६० जणांवर तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुन्हे दाखल केले होते. यात नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मीरा-भार्इंदर या भागातील कांदळवन व जागा नाश करणाºयांचा समावेश आहे.भिवंडी तालुक्यात शासकीय जमिनीवरील कांदळवन व्याप्ती सुमारे १३७ हेक्टरची आहे. ती वन संरक्षित करण्यासाठी प्रस्तावित आहे. ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवर सुमारे १,४७१ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन आहे. त्याची अधिसूचना वर्षापूवीच काढण्यात आली होती.याशिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन संरक्षण समिती स्थापन झालेली आहे. सतत होणारा ºहास थांबविण्यासाठी या कांदळवनाच्या क्षेत्रास राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याची प्रारूप अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्धही झाली आहे.या अधिसूचनेमध्ये वाशी, तळवली, सारसोळे, नेरूळ, घणसोली, जुहू, तुर्भे, कोपरखैरणे, गोठवली, सोनखार, शहाबाज, दिवे, करावे आणि ऐरोली या गावांमधील कांदळवन जमिनीचा समावेश झाला आहे. वनसंवर्धनासाठीच्या याचिकेमध्ये न्यायालयाने जोरदार ताशेरेही ओढले होते.

टॅग्स :thaneठाणे