शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

कल्याणकरांच्या झोपेचे खोबरे

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त

कल्याण : उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त नागरिकांनी पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच लालचौकी परिसरात ‘रास्ता रोको’ करून आपला संताप व्यक्त केला.मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास पश्चिमेतील बहुतांश परिसरातील वीज गायब झाली. लालचौकी, गोल्डन पार्क, आधारवाडी, सुभाषनगर, श्री कॉम्प्लेक्स, रामबाग अशा मोठ्या परिसरातील वीजपुरवठा मध्यरात्री खंडित झाला होता. बराच वेळ उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी दूरध्वनीद्वारे ‘महावितरण’च्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘कस्टमर केअर सेंटर’ला फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोन्ही ठिकाणांहून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याची माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान, दोन तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. लालचौकी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा जमाव गोळा झाला. या जमावाने रस्त्यात ठिय्या मांडून दोन्हीकडचा रस्ता रोखून धरला. काही संतप्त नागरिकांचा जमाव पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर चालून गेला. त्या वेळी या कार्यालयात एकही कर्मचारी नसताना कार्यालयातील लाइट आणि पंखे चालूच होते. त्यामुळे आधीच संतप्त झालेल्या या जमावाचा पारा अधिकच चढल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे या जमावाने कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)