शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कल्याणकरांच्या झोपेचे खोबरे

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त

कल्याण : उकाड्याने हैराण झालेल्या कल्याण पश्चिमेतील नागरिकांच्या सहनशीलतेचा मंगळवारी अंत झाला. सतत दोन दिवस मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ शेकडो संतप्त नागरिकांनी पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच लालचौकी परिसरात ‘रास्ता रोको’ करून आपला संताप व्यक्त केला.मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास पश्चिमेतील बहुतांश परिसरातील वीज गायब झाली. लालचौकी, गोल्डन पार्क, आधारवाडी, सुभाषनगर, श्री कॉम्प्लेक्स, रामबाग अशा मोठ्या परिसरातील वीजपुरवठा मध्यरात्री खंडित झाला होता. बराच वेळ उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी दूरध्वनीद्वारे ‘महावितरण’च्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘कस्टमर केअर सेंटर’ला फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोन्ही ठिकाणांहून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याची माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान, दोन तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला. लालचौकी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा जमाव गोळा झाला. या जमावाने रस्त्यात ठिय्या मांडून दोन्हीकडचा रस्ता रोखून धरला. काही संतप्त नागरिकांचा जमाव पारनाका येथील ‘महावितरण’च्या कार्यालयावर चालून गेला. त्या वेळी या कार्यालयात एकही कर्मचारी नसताना कार्यालयातील लाइट आणि पंखे चालूच होते. त्यामुळे आधीच संतप्त झालेल्या या जमावाचा पारा अधिकच चढल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यामुळे या जमावाने कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)