शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kalyan: महिलांविषयी कुजबुज करणे चळवळीसाठी घातक- आशालता कांबळे

By सचिन सागरे | Updated: May 13, 2023 17:42 IST

Kalyan: चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले.

- सचिन सागरेकल्याण -  चळवळ मजबूत करण्याच्या अडथळ्यात महिलांविषयी करण्यात येणारी कुजबुज हे एक महत्वाचे कारण आहे. अशाप्रकारच्या कुजबुजमुळे चळवळ बॅकफुटला येत असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक आशालता कांबळे यांनी येथे व्यक्त केले. समता संघर्ष संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त 'संवाद चळवळीचा' हा कार्यक्रम पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृह येथे शनिवारी पार पडला. चार सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचे उद्घाटन आशालता यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांसोबत त्यांनी संवाद साधला.

संविधान संस्कृती रुजविण्यासाठी साहित्य व कलाक्षेत्र योग्य दिशेने विकसित करणे गरजेचे आहे. चळवळ जिवंत ठेवायची असेल तर त्यासाठी लेखन करणारे, बोलणारे आणि कृती करणारे असे सर्वच चळवळीसाठी आवश्यक आहेत. त्याचबरोबर, सखोल अभ्यास करणेही तितकेच महत्वाचे आहे. तरुणांसाठी साहित्य संमेलन होत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करीत दर महिन्याला विविध प्रकारची शिबिरे घेऊन कार्यकर्ता घडविण्याचा सल्लाही आशालता यांनी यावेळी दिला.

तरुण कार्यकर्ते घडविणे महत्वाचे असून तरुण कार्यकर्त्याची फळी कशी तयार होईल या दृष्टीने संघटनेने काम करणे महत्वाचे असल्याचे अध्यक्षीय भाषणात फुले - मार्क्स - आंबेडकरवादी ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम जाधव म्हणाले. स्वागताध्यक्ष सदानंद गायकवाड यांनी समता संघर्ष संघटनेच्या कामाबाबतची माहिती उपस्थितांना दिली. कार्यकर्ता कुठे चाललाय, कुठे हरवलाय यावर आपल्या बीजभाषणात समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी प्रकाशझोत टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सुरेखा पैठणे यांनी केले.

टॅग्स :kalyanकल्याणWomenमहिला