शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

खड्ड्यांत गेले ‘कल्याण’! डोंबिवलीतही चालकांची चकवाचकवी : परतीच्या पावसाचा रस्तादुरुस्तीत व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:56 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.

कल्याण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवलीत जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे चुकवताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यावरच रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करणार असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केल्याने ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा या सणांमध्ये खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, सध्याचे वास्तव पाहता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास कायम राहण्याची चिन्हे आहेत. शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक खचल्याने त्या रस्त्यांनी प्रवास करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. स्थायी समिती असो अथवा महासभेमध्ये वारंवार खड्ड्यांचा मुद्दा चर्चिला गेला आहे. स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी, तर रस्त्यांच्या कामात दर्जा राखला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गणेश विसर्जनाआधी रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते. परंतु, सध्या दिवाळी तोंडावर आला तरी रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही.नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सभा तहकुबीच्या माध्यमातून खड्ड्यांचा विषय सभागृहात उपस्थित केला होता. तसेच विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनीही मांडलेल्या तहकुबीच्या आधारे या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी आयुक्तांनी जोपर्यंत पाऊस थांबत नाही, तोपर्यंत कामे सुरू होणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते. हवामान खात्याशी संपर्क असून त्यांच्याकडून पावसाबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, खड्ड्यांची समस्या दिवसागणिक अधिकच गंभीर बनत चालली आहे. त्यात परतीच्या पावसाने उच्छाद मांडल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्ड्यांत पडून काहीजण जायबंदी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेलरासू यांनी रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, पडणाºया पावसात टाकण्यात येणारे डांबर अल्पावधीत उखडले जात आहेत. यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, सध्याचा परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने रस्त्यांची कामे सुरू करण्यास कोणताही अधिकारी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणे आता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास नागरिकांच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली