शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांत गेले ‘कल्याण’! डोंबिवलीतही चालकांची चकवाचकवी : परतीच्या पावसाचा रस्तादुरुस्तीत व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:56 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.

कल्याण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवलीत जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे चुकवताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यावरच रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करणार असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केल्याने ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा या सणांमध्ये खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, सध्याचे वास्तव पाहता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास कायम राहण्याची चिन्हे आहेत. शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक खचल्याने त्या रस्त्यांनी प्रवास करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. स्थायी समिती असो अथवा महासभेमध्ये वारंवार खड्ड्यांचा मुद्दा चर्चिला गेला आहे. स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी, तर रस्त्यांच्या कामात दर्जा राखला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गणेश विसर्जनाआधी रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते. परंतु, सध्या दिवाळी तोंडावर आला तरी रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही.नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सभा तहकुबीच्या माध्यमातून खड्ड्यांचा विषय सभागृहात उपस्थित केला होता. तसेच विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनीही मांडलेल्या तहकुबीच्या आधारे या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी आयुक्तांनी जोपर्यंत पाऊस थांबत नाही, तोपर्यंत कामे सुरू होणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते. हवामान खात्याशी संपर्क असून त्यांच्याकडून पावसाबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, खड्ड्यांची समस्या दिवसागणिक अधिकच गंभीर बनत चालली आहे. त्यात परतीच्या पावसाने उच्छाद मांडल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्ड्यांत पडून काहीजण जायबंदी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेलरासू यांनी रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, पडणाºया पावसात टाकण्यात येणारे डांबर अल्पावधीत उखडले जात आहेत. यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, सध्याचा परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने रस्त्यांची कामे सुरू करण्यास कोणताही अधिकारी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणे आता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास नागरिकांच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली