शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

खड्ड्यांत गेले ‘कल्याण’! डोंबिवलीतही चालकांची चकवाचकवी : परतीच्या पावसाचा रस्तादुरुस्तीत व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:56 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.

कल्याण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र डागडुजीअभावी रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘रांगोळी’ शहरांमध्ये पाहायला मिळत आहे. कल्याण आणि डोंबिवलीत जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे चुकवताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यावरच रस्ता दुरुस्तीची कामे सुरू करणार असल्याचे केडीएमसीने स्पष्ट केल्याने ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा या सणांमध्ये खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, सध्याचे वास्तव पाहता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास कायम राहण्याची चिन्हे आहेत. शहरातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले आहेत. काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक खचल्याने त्या रस्त्यांनी प्रवास करणेही जिकिरीचे होऊन बसले आहे. स्थायी समिती असो अथवा महासभेमध्ये वारंवार खड्ड्यांचा मुद्दा चर्चिला गेला आहे. स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी, तर रस्त्यांच्या कामात दर्जा राखला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. गणेश विसर्जनाआधी रस्ते खड्डेमुक्त होतील, असे आश्वासन महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते. परंतु, सध्या दिवाळी तोंडावर आला तरी रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही.नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सभा तहकुबीच्या माध्यमातून खड्ड्यांचा विषय सभागृहात उपस्थित केला होता. तसेच विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनीही मांडलेल्या तहकुबीच्या आधारे या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी आयुक्तांनी जोपर्यंत पाऊस थांबत नाही, तोपर्यंत कामे सुरू होणार नाहीत, असे स्पष्टीकरण दिले होते. हवामान खात्याशी संपर्क असून त्यांच्याकडून पावसाबाबत माहिती घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, खड्ड्यांची समस्या दिवसागणिक अधिकच गंभीर बनत चालली आहे. त्यात परतीच्या पावसाने उच्छाद मांडल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. खड्ड्यांत पडून काहीजण जायबंदी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेलरासू यांनी रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्याच्या सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, पडणाºया पावसात टाकण्यात येणारे डांबर अल्पावधीत उखडले जात आहेत. यासंदर्भात नगरसेवकांच्या तक्रारी वाढत आहेत. मात्र, सध्याचा परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने रस्त्यांची कामे सुरू करण्यास कोणताही अधिकारी धजावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाप्रमाणे आता दिवाळीतही खड्ड्यांचा त्रास नागरिकांच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली