शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

कल्याण-तळोजा मेट्रो मार्गी

By admin | Updated: October 29, 2016 04:06 IST

तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो

कल्याण : तळोजा, शीळ, डोंबिवली, कल्याण परिसरातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुचवलेल्या तळोजा- डोंबिवली- कल्याण मेट्रो प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्याच्या हालचाली एमएमआरडीएने सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यातच या मार्गाला तत्वत: मंजुरी दिली. शिंदे यांनी शुक्र वारी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण केले. या वेळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. एमएमआरडीए आणि सिडको यांनी अनुक्र मे मुंबई आणि नवी मुंबईत आखलेले मेट्रो प्रकल्प परस्परांना जोडले, तर कल्याण, डोंबिवली, २७ गावे, शीळ फाटा, मुंब्रा, दिवा, कळवा, खारेगाव, उल्हासनगर, अंबरनाथ अशा महानगरांना त्याचा लाभ होईल, असे सादरीकरण शिंदे यांनी केले. त्यांनु सुचवलेल्या मेट्रो जोडणाऱ्या मार्गांत प्रामुख्याने तळोजा-शीळ फाटा-डोंबिवली-कल्याण, पोखरण-माजीवडा-खारेगाव-मुंब्रा-शीळ फाटा, महापे-शीळ फाटा, दिघा-खारेगाव आणि कासारवडवली-दहीसर या मार्गांचा समावेश आहे. शिंदे यांनी सुचवलेल्या या मार्गांचा अभ्यास करण्याचे निर्देश प्रकल्प सल्लागारांना लगेच देण्यात येतील, असे दराडे यांनी सांगितले.एमएमआर परिसरातील लोकसंख्या वाढीचा वेग मुंबईपेक्षाही अधिक आहे. येथील लोकसंख्या सध्या एक कोटीच्या आसपास आहे. २०२१ मध्ये मुंबईपेक्षाही अधिक लोकसंख्या असेल. शिवाय, २७ गावांमधील ग्रोथ सेंटर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, दिल्ली - मुंबई फ्रेट कॉरिडॉर, नैना आदी प्रकल्पांमुळे पनवेल, उरण, तळोजा, २७ गावांच्या परिसराचा प्रचंड विकास होणार आहे. (प्रतिनिधी)प्रवास होणार स्वस्त आणि मस्तकल्याण, डोंबिवली, ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळ फाटा, अंबरनाथ, उल्हासनगर या परिसरातून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर नवी मुंबईच्या दिशेने जातील. ही गरज लक्षात घेऊन आतापासूनच मेट्रोचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे खा. शिंदे यांनी सांगितले. हे प्रस्तावित मार्ग झाले तर मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनमधील प्रवासी एकाच तिकिटावर कुठूनही कुठेही आरामदायी आणि किफायतशीर प्रवास करू शकतील.