शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कल्याण दिशेकडील पादचारी पूल केला खुला; पूर्व-पश्चिम जाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 01:21 IST

रेल्वे फलाटात प्रवेश बंदच, पुलाची रुंदी वाढवल्याने प्रवाशांची सोय

डोंबिवली : डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल अखेरीस रेल्वे प्रशासनाने कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी खुला केला. त्यामुळे पूर्व- पश्चिम नागरिकांची ये जा सुरू झाली आहे. सध्या सामान्य नागरिकांसाठी रेल्वेसेवा सुरू नसल्याने या पुलाच्या फलाटांना जोडणारे प्रवेश बंद ठेवण्यात आले आहेत. रामनगर दिशेकडील पुलासारखाच वापर प्रवासी करू शकत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

१९८० च्या दशकात हा पादचारी पूल बांधण्यात आला होता. मात्र एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेनंतर झालेल्या आॅडिटमध्ये हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या पुलावरून प्रवासी जाऊ नयेत अशी व्यवस्था करण्याची मागणी तत्कालीन राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार गेल्यावर्षी हा पूल रेल्वे अधिकाऱ्यांनी बंद केला. त्यानंतर काही काळात त्याचे पाडकाम करण्यात आले.

मध्यंतरी शहरातील दक्ष समितीने या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत रेल्वे अभियंत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी कामाला काहीसा वेग आला होता, मात्र कोरोनाच्या काळात पुन्हा काम मंदावले. त्यानंतर रेल्वे बंद असल्याने त्याचे काम तातडीने हाती घ्यावे आणि पूल पूर्ण करून तो खुला करावा यासाठी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने पाठपुरावा केला. अखेर क्रेन आणून गार्डर चढवले गेले आणि १५ आॅगस्टदरम्यान सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु तेही तांत्रिक कारणामुळे लांबले. अखेरीस सर्व चाचण्या केल्यानंतर तो खुला करण्यात आला. नव्या पूलाच्या उभारणीत तो ४.५ मीटरवरून ६ मीटर रुंद केला आहे.

नव्या पुलाच्या पूर्वेकडील पायºया जिथे उतरतात, तिथे काही पायºया या अडथळे आणणाºया असून त्याची डागडुजी करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संजीव बिडवाडकर यांनी केली आहे. पुलावर चढताना लागणारी पहिली पायरी चढण्यास त्रासदायक आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी छोटा रॅम्प असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. याबाबत पाहणी करून आवश्यक ती सुधारणा करण्यात येईल, असे रेल्वेच्या अभियंत्यांनी सांगितले.