शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

कल्याणचे शिवस्मारक कागदावरच!

By admin | Updated: December 26, 2016 07:23 IST

अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे नुकतेच झालेले भूमिपूजन श्रेय आणि मानापमानाच्या वादावरून चांगलेच गाजले.

प्रशांत माने / कल्याणअरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे नुकतेच झालेले भूमिपूजन श्रेय आणि मानापमानाच्या वादावरून चांगलेच गाजले. मात्र, शिवरायांच्या नावाने राजकारण करून कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला कल्याणमधील प्रस्तावित शिवस्मारकाचा विसर पडला आहे.नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीपासून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी उभारलेल्या पहिल्यावहिल्या आरमाराचे स्मारक उभारण्याची कल्पना १२ वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. परंतु, त्यासंदर्भात आजतागायत ठोस कृती न झाल्याने हे शिवस्मारक कागदावरच राहिले आहे.पहिल्या सागरी आरमाराची उभारणी करण्यात आल्याने देशपातळीवर कल्याण शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपतींनी उभारलेल्या या सागरी आरमाराच्या स्मृती जतन करण्यासाठी केडीएमसीने २००४ मध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी खाडीकिनारी भव्य आरमार स्मारक उभारण्याची योजना आखली होती. पण, आज या घटनेला अनेक वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात ठोस कृतीविना हे स्मारक आजतागायत कागदावरच राहिले आहे. विशेष म्हणजे १९९५ पासून (आघाडीची अडीच वर्षे वगळता) महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या वचननाम्यात वेळोवेळी शिवआरमार स्मारकाचा उल्लेख झालेला आहे. परंतु, तो वचननाम्यापुरताच सीमित राहिला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही दुर्गाडी गणेशघाटाचा परिसर सुशोभित करून हे स्मारक उभारण्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर, त्यांनी जागेअभावी गौरीपाड्यातील प्रस्तावित सिटी पार्क येथे हे स्मारक उभारण्याला मान्यता दिली होती. तशी घोषणा २०११ मध्ये तत्कालीन महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी केली होती. परंतु, ही घोषणाही हवेतच विरली. नुकत्याच २० डिसेंबरला झालेल्या महासभेत ‘सिटी पार्क’च्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या प्रस्तावात सागरी आरमार स्मारकाला बगल देण्यात आली आहे. आरमाराचा इतिहासच्कल्याण शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहराचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे. जगाशी व्यापारी संबंध असणारे मोक्याचे ठिकाण म्हणूनही कल्याणचे बंदर प्रसिद्ध होते. याच बंदरात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सागरी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. च्स्वराज्याच्या स्थापनेच्या कालावधीत छत्रपतींचे वास्तव्य काही काळ कल्याणमध्ये होते. २४ आॅक्टोबर १६५७ ला छत्रपतींनी कल्याणबरोबरच भिवंडी हे दोन्ही सुभे जिंकले होते. या विजयात महाराजांच्या मावळ्यांनी बजावलेला पराक्रम अतुलनीय होता. च्छत्रपतींनी हिंदवी स्वराज्यात कोकणातला आपला पाया भक्कम केला. मैदानी लढाईत मराठे कधीच कमी पडणार नाहीत, हे महाराज जाणून होते. शत्रू कितीही प्रबळ असला तरी पराभवाची भीती नव्हतीच. प्रश्न होता तो समुद्री आक्रमणाचा. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर लाभलेल्या किनारपट्टीमुळे, असा हल्ल्याचा धोका शिवाजी महाराजांनी ओळखला होता. च्गडकिल्ल्यांना भक्कम तटबंदीबरोबरच सक्षम सागरी आरमारही आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी सागरी आरमार उभारण्याकडे लक्ष दिले आणि त्याची मुहूर्तमेढ कल्याणमध्ये रोवली गेली. या कामावर देखरेख राहावी, यासाठी स्वत: महाराजांचे वास्तव्य तीन महिने कल्याणमध्ये होते. च्दरम्यान, या सागरी आरमाराद्वारे महाराजांनी अनेक धाडसी मोहिमा सहज फत्ते केल्या होत्या.