शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

कल्याणचे शिवस्मारक कागदावरच!

By admin | Updated: December 26, 2016 07:23 IST

अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे नुकतेच झालेले भूमिपूजन श्रेय आणि मानापमानाच्या वादावरून चांगलेच गाजले.

प्रशांत माने / कल्याणअरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाचे नुकतेच झालेले भूमिपूजन श्रेय आणि मानापमानाच्या वादावरून चांगलेच गाजले. मात्र, शिवरायांच्या नावाने राजकारण करून कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेक वर्षे सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला कल्याणमधील प्रस्तावित शिवस्मारकाचा विसर पडला आहे.नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीपासून प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांनी उभारलेल्या पहिल्यावहिल्या आरमाराचे स्मारक उभारण्याची कल्पना १२ वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. परंतु, त्यासंदर्भात आजतागायत ठोस कृती न झाल्याने हे शिवस्मारक कागदावरच राहिले आहे.पहिल्या सागरी आरमाराची उभारणी करण्यात आल्याने देशपातळीवर कल्याण शहराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपतींनी उभारलेल्या या सागरी आरमाराच्या स्मृती जतन करण्यासाठी केडीएमसीने २००४ मध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी खाडीकिनारी भव्य आरमार स्मारक उभारण्याची योजना आखली होती. पण, आज या घटनेला अनेक वर्षे उलटली तरी प्रत्यक्षात ठोस कृतीविना हे स्मारक आजतागायत कागदावरच राहिले आहे. विशेष म्हणजे १९९५ पासून (आघाडीची अडीच वर्षे वगळता) महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या वचननाम्यात वेळोवेळी शिवआरमार स्मारकाचा उल्लेख झालेला आहे. परंतु, तो वचननाम्यापुरताच सीमित राहिला आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही दुर्गाडी गणेशघाटाचा परिसर सुशोभित करून हे स्मारक उभारण्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर, त्यांनी जागेअभावी गौरीपाड्यातील प्रस्तावित सिटी पार्क येथे हे स्मारक उभारण्याला मान्यता दिली होती. तशी घोषणा २०११ मध्ये तत्कालीन महापौर वैजयंती गुजर-घोलप यांनी केली होती. परंतु, ही घोषणाही हवेतच विरली. नुकत्याच २० डिसेंबरला झालेल्या महासभेत ‘सिटी पार्क’च्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या प्रस्तावात सागरी आरमार स्मारकाला बगल देण्यात आली आहे. आरमाराचा इतिहासच्कल्याण शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहराचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे. जगाशी व्यापारी संबंध असणारे मोक्याचे ठिकाण म्हणूनही कल्याणचे बंदर प्रसिद्ध होते. याच बंदरात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सागरी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. च्स्वराज्याच्या स्थापनेच्या कालावधीत छत्रपतींचे वास्तव्य काही काळ कल्याणमध्ये होते. २४ आॅक्टोबर १६५७ ला छत्रपतींनी कल्याणबरोबरच भिवंडी हे दोन्ही सुभे जिंकले होते. या विजयात महाराजांच्या मावळ्यांनी बजावलेला पराक्रम अतुलनीय होता. च्छत्रपतींनी हिंदवी स्वराज्यात कोकणातला आपला पाया भक्कम केला. मैदानी लढाईत मराठे कधीच कमी पडणार नाहीत, हे महाराज जाणून होते. शत्रू कितीही प्रबळ असला तरी पराभवाची भीती नव्हतीच. प्रश्न होता तो समुद्री आक्रमणाचा. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर लाभलेल्या किनारपट्टीमुळे, असा हल्ल्याचा धोका शिवाजी महाराजांनी ओळखला होता. च्गडकिल्ल्यांना भक्कम तटबंदीबरोबरच सक्षम सागरी आरमारही आवश्यक आहे, या जाणिवेतून त्यांनी सागरी आरमार उभारण्याकडे लक्ष दिले आणि त्याची मुहूर्तमेढ कल्याणमध्ये रोवली गेली. या कामावर देखरेख राहावी, यासाठी स्वत: महाराजांचे वास्तव्य तीन महिने कल्याणमध्ये होते. च्दरम्यान, या सागरी आरमाराद्वारे महाराजांनी अनेक धाडसी मोहिमा सहज फत्ते केल्या होत्या.