शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

‘कल्याण’ शिवसेनेचेच यावर शिक्कामोर्तब

By admin | Updated: November 3, 2015 01:10 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याकरिता कल्याण पश्चिमेतील २८ जागांपैकी शिवसेनेच्या पारड्यात पडलेल्या २१ जागा तर पूर्वेतील

- प्रशांत माने,  कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष होण्याकरिता कल्याण पश्चिमेतील २८ जागांपैकी शिवसेनेच्या पारड्यात पडलेल्या २१ जागा तर पूर्वेतील २० पैकी १६ जागांवर मिळालेले यश हेच मुख्य कारण ठरले आहे. एकूण ५२ जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या शिवसेनेचे कल्याण याच ३७ जागांमुळे झाले. एकीकडे कल्याणने शिवसेनेला भरभरून दिले असताना याच शहरातून त्यांच्या महापौर कल्याणी पाटील यांच्यासह सभागृह नेते कैलास शिंदे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकूण ३१ जागा मिळाल्या होत्या. यावेळेस तर ती सर एकट्या कल्याणातूनच भरुन निघाली आहे. त्यामुळे डोंबिवलीसह टिटवाळा, आणि ग्रामीण भागातून सेनेला मिळालेले यश हे बोनस पकडले जात असल्याचे स्पष्ट झाले.उंबर्डे, गांधारे, बारावे, मोईली, वडवली, आंबिवली, बल्याणी, शहाड, मिलींद नगर, वायले नगर, म्हसोबा मैदान, रामदास वाडी, रामबाग खडक, श्रेयस समेळ, बिर्ला कॉलेज, वडवली, रामदासवाडी, बैलबाजार, अशोक नगर, गावदेवी आदी भागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे या ठिकाणी भगवा डौलाने फडकला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ते आपल्या शेवटच्या सभेला कल्याणमध्ये आले होते तेव्हा ही विजयाची सभा असल्याचे म्हंटले होते. कल्याणमधील सैनिकांचीही कडवा, कट्टर शिवसैनिक अशीच ओळख आहे. त्यांच्यामध्ये पक्ष आदेशाला प्रचंड महत्व असून डोंबिवलीतील सैनिकांच्या तुलनेने ते अधिक आक्रमक आणि स्पर्धेत पुढे असल्याचेही वेळोवेळी दिसून आले. दुर्गाडी गडावरचा घंटानाद असो की श्री मलंग यात्रा अशा हिंदुत्वाच्या मुद्यावर त्या ठिकाणचा सैनिक एकजुटीने कार्यरत असतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचेही कल्याणकरांवर विशेष प्रेम होते. धर्मवीर आनंद दिघेंना मानणारे नेते अजुनही त्यांच्या स्मृतींना उजाळा देतांना तसे हिंदुत्व आता नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांमध्ये चेतना निर्माण करतात. कल्याणमध्ये शिवसेना स्ट्राँग असल्याची जाण पालकमंत्री एकनाथ शिंदेंना होती, म्हणूनच की काय त्यांनी तुलनेने ‘वीक’ असलेल्या डोंबिवलीत जरा जास्त लक्ष घातले होेते. गेल्या पंधरवड्यात त्यांनी डोंबिवलीतच ठाण मांडले होते. कल्याणकरांनी शिवसेनेला भरभरून दिले तरीही त्यांना सत्तेच्या मॅजीक फिगरपासून दूर राहावे लागले आहे. भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनीही गेल्या काही दिवसात शिवसेनेला अंगावर घेण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे डोंबिवलीचे माहीत नाही, पण कल्याणात सेनाच अग्रक्रमी असणार असा चंग तेथील नेत्यांनी बांधला होता, झाले ही तसेच.कल्याण पूर्वेत मात्र भाजपचे नामोनिषाण नव्हते, आमदार गणपत गायकवाड यांनी त्या ठिकाणी भाजपाचे कमळ फुलवले असले तरीही शिवसेनेला चांगले यश मिळाले..