शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कल्याण-डोंबिवलीकरांची ‘पूलकोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:44 IST

कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे. त्यातच, काही पूल बंद करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. पूल वाहतूक आणि रहदारीसाठी बंद केले जात असल्याने नागरिकांची पूलकोंडी झाली आहे. पूल वेळेत मार्गी लागत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच लक्ष्य केले आहे.डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर दिशेचा रेल्वे उड्डाणपूल २७ मे पासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याला महापालिका अनुकूल नाही. महापालिकेने पूल बंद केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कल्याण-शीळ रस्त्यावरील सगळ्यात महत्त्वाचा असलेला जुना ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याने तो नोव्हेंबर २०१८ मध्ये पाडला. त्याच्या कामाला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेजारील अरुंद पुलावरून वाहतूक कशीबशी सुरू आहे.कल्याण रेल्वेस्थानकातील लोकग्रामचा पादचारी पूल १८ मेपासून रहदारीसाठी बंद ला आहे. या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने एक कोटी ३८ लाख भरावेत, असे रेल्वेने सांगितले आहे. प्रत्यक्ष स्मार्ट सिटीअंतर्गत या परिसराच्या विकासात हा मुद्दा आहे. त्यामुळे महापालिकेने पैसे भरण्यास नकार देत यापूर्वी दिलेले ७४ लाख कशावर खर्च केले, असा सवाल महापालिकेने उपस्थित करून रेल्वेला फैलावर घेतले आहे.डोंबिवली स्टेशन ते मानपाडा येथील नांदिवली पुलाचे एका बाजूचे काम अर्धवट आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मानपाडा रस्त्यावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. कल्याण-शहाडदरम्यान वालधुनी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाची एक बाजू बंद करण्यात आली आहे. दुसरी बाजू प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पुलाच्या आधीच वाहतूककोंडी ॅहोत ओहे. याशिवाय, वालधुनी पुलावर कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून आनंद दिघे उड्डाणपुलावरून वाहतूक वळते. त्यामुळे वालधुनी पूलही सकाळ-सायंकाळी वाहतूककोंडीने गच्च भरलेला असतो. २०१६ मध्ये कल्याण-दुर्गाडी खाडीपुलाला समांतर सहापदरी पूल उभारला जाणार होता. या पुलाचे अर्धवट काम टाकून कंत्राटदार पळून गेला. त्यामुळे नवा कंत्राटदार नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१६ पासून पुलाचे काम सुरू आहे. ते मार्गी लागत नसल्याने कल्याण-भिवंडी मार्गावरील अस्तित्वात असलेला खाडीपूल हा वाहतूककोंडीचे जंक्शन झालेला आहे. याशिवाय, कल्याण शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बायपास हा रस्ता तयार केला गेला. त्याचे नियोजन चुकले.ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र, पूर्वेला त्याची एक बाजू स.वा. जोशी शाळेनजीक उतरते. सगळीच वाहने स.वा. जोशी शाळेकडे न वळता पुलावरून कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली असती. तसेच जोशी शाळा परिसर, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली-चोळेगाव येथे कोंडीत त्यांना अडकावे लागले नसते. या सगळ्या पूलकोंडीस सत्ताधारी शिवसेना-भाजप युती जबाबदार असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले.>२० मिनिटांत ठाणे तूर्तास कागदावरचडोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाचे काम २०१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या पुलाचे काम डोंबिवलीच्या दिशेने काही अंशी झालेले आहे. मात्र, माणकोलीच्या दिशेने भूसंपादनाचा प्रश्न निरुत्तरीत राहिल्याने २०१६ पासून हा खाडीपूल मार्गी लागलेला नाही. त्यामुळे डोंबिवली ते भिवंडी, ठाणे हे २० मिनिटांत अंतर कापण्यात येईल, हा दावा तूर्तास तरी कागदावरच आहे. त्यामुळे डोंबिवली ते ठाणे, भिवंडीला जाण्यासाठी कोपर रेल्वे उड्डाणपुलावरूनच जावे लागत आहे. हा पूलही २७ मे पासून बंद झाल्यास ठाणे-भिवंडी सोडा, शहरात पूर्व-पश्चिमेला ये-जा कशी करायची, असा प्रश्न आहे.