शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

कल्याण-डोंबिवलीकरांची ‘पूलकोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:44 IST

कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे. त्यातच, काही पूल बंद करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. पूल वाहतूक आणि रहदारीसाठी बंद केले जात असल्याने नागरिकांची पूलकोंडी झाली आहे. पूल वेळेत मार्गी लागत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच लक्ष्य केले आहे.डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर दिशेचा रेल्वे उड्डाणपूल २७ मे पासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याला महापालिका अनुकूल नाही. महापालिकेने पूल बंद केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कल्याण-शीळ रस्त्यावरील सगळ्यात महत्त्वाचा असलेला जुना ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याने तो नोव्हेंबर २०१८ मध्ये पाडला. त्याच्या कामाला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेजारील अरुंद पुलावरून वाहतूक कशीबशी सुरू आहे.कल्याण रेल्वेस्थानकातील लोकग्रामचा पादचारी पूल १८ मेपासून रहदारीसाठी बंद ला आहे. या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने एक कोटी ३८ लाख भरावेत, असे रेल्वेने सांगितले आहे. प्रत्यक्ष स्मार्ट सिटीअंतर्गत या परिसराच्या विकासात हा मुद्दा आहे. त्यामुळे महापालिकेने पैसे भरण्यास नकार देत यापूर्वी दिलेले ७४ लाख कशावर खर्च केले, असा सवाल महापालिकेने उपस्थित करून रेल्वेला फैलावर घेतले आहे.डोंबिवली स्टेशन ते मानपाडा येथील नांदिवली पुलाचे एका बाजूचे काम अर्धवट आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मानपाडा रस्त्यावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. कल्याण-शहाडदरम्यान वालधुनी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाची एक बाजू बंद करण्यात आली आहे. दुसरी बाजू प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पुलाच्या आधीच वाहतूककोंडी ॅहोत ओहे. याशिवाय, वालधुनी पुलावर कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून आनंद दिघे उड्डाणपुलावरून वाहतूक वळते. त्यामुळे वालधुनी पूलही सकाळ-सायंकाळी वाहतूककोंडीने गच्च भरलेला असतो. २०१६ मध्ये कल्याण-दुर्गाडी खाडीपुलाला समांतर सहापदरी पूल उभारला जाणार होता. या पुलाचे अर्धवट काम टाकून कंत्राटदार पळून गेला. त्यामुळे नवा कंत्राटदार नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१६ पासून पुलाचे काम सुरू आहे. ते मार्गी लागत नसल्याने कल्याण-भिवंडी मार्गावरील अस्तित्वात असलेला खाडीपूल हा वाहतूककोंडीचे जंक्शन झालेला आहे. याशिवाय, कल्याण शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बायपास हा रस्ता तयार केला गेला. त्याचे नियोजन चुकले.ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र, पूर्वेला त्याची एक बाजू स.वा. जोशी शाळेनजीक उतरते. सगळीच वाहने स.वा. जोशी शाळेकडे न वळता पुलावरून कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली असती. तसेच जोशी शाळा परिसर, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली-चोळेगाव येथे कोंडीत त्यांना अडकावे लागले नसते. या सगळ्या पूलकोंडीस सत्ताधारी शिवसेना-भाजप युती जबाबदार असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले.>२० मिनिटांत ठाणे तूर्तास कागदावरचडोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाचे काम २०१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या पुलाचे काम डोंबिवलीच्या दिशेने काही अंशी झालेले आहे. मात्र, माणकोलीच्या दिशेने भूसंपादनाचा प्रश्न निरुत्तरीत राहिल्याने २०१६ पासून हा खाडीपूल मार्गी लागलेला नाही. त्यामुळे डोंबिवली ते भिवंडी, ठाणे हे २० मिनिटांत अंतर कापण्यात येईल, हा दावा तूर्तास तरी कागदावरच आहे. त्यामुळे डोंबिवली ते ठाणे, भिवंडीला जाण्यासाठी कोपर रेल्वे उड्डाणपुलावरूनच जावे लागत आहे. हा पूलही २७ मे पासून बंद झाल्यास ठाणे-भिवंडी सोडा, शहरात पूर्व-पश्चिमेला ये-जा कशी करायची, असा प्रश्न आहे.