शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीकरांची ‘पूलकोंडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:44 IST

कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये काही पुलांची कामे सुरू आहेत. काही पूल पाडण्यात आले आहेत, तर काहींचे काम अर्धवट आहे. त्यातच, काही पूल बंद करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. पूल वाहतूक आणि रहदारीसाठी बंद केले जात असल्याने नागरिकांची पूलकोंडी झाली आहे. पूल वेळेत मार्गी लागत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच लक्ष्य केले आहे.डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर दिशेचा रेल्वे उड्डाणपूल २७ मे पासून बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याला महापालिका अनुकूल नाही. महापालिकेने पूल बंद केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्याय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कल्याण-शीळ रस्त्यावरील सगळ्यात महत्त्वाचा असलेला जुना ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याने तो नोव्हेंबर २०१८ मध्ये पाडला. त्याच्या कामाला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेजारील अरुंद पुलावरून वाहतूक कशीबशी सुरू आहे.कल्याण रेल्वेस्थानकातील लोकग्रामचा पादचारी पूल १८ मेपासून रहदारीसाठी बंद ला आहे. या पुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने एक कोटी ३८ लाख भरावेत, असे रेल्वेने सांगितले आहे. प्रत्यक्ष स्मार्ट सिटीअंतर्गत या परिसराच्या विकासात हा मुद्दा आहे. त्यामुळे महापालिकेने पैसे भरण्यास नकार देत यापूर्वी दिलेले ७४ लाख कशावर खर्च केले, असा सवाल महापालिकेने उपस्थित करून रेल्वेला फैलावर घेतले आहे.डोंबिवली स्टेशन ते मानपाडा येथील नांदिवली पुलाचे एका बाजूचे काम अर्धवट आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मानपाडा रस्त्यावर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. कल्याण-शहाडदरम्यान वालधुनी पुलाचे काम सुरू आहे. या पुलाची एक बाजू बंद करण्यात आली आहे. दुसरी बाजू प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पुलाच्या आधीच वाहतूककोंडी ॅहोत ओहे. याशिवाय, वालधुनी पुलावर कल्याण पूर्वेतील पुणे लिंक रोडवरून आनंद दिघे उड्डाणपुलावरून वाहतूक वळते. त्यामुळे वालधुनी पूलही सकाळ-सायंकाळी वाहतूककोंडीने गच्च भरलेला असतो. २०१६ मध्ये कल्याण-दुर्गाडी खाडीपुलाला समांतर सहापदरी पूल उभारला जाणार होता. या पुलाचे अर्धवट काम टाकून कंत्राटदार पळून गेला. त्यामुळे नवा कंत्राटदार नेण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१६ पासून पुलाचे काम सुरू आहे. ते मार्गी लागत नसल्याने कल्याण-भिवंडी मार्गावरील अस्तित्वात असलेला खाडीपूल हा वाहतूककोंडीचे जंक्शन झालेला आहे. याशिवाय, कल्याण शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी गोविंदवाडी बायपास हा रस्ता तयार केला गेला. त्याचे नियोजन चुकले.ठाकूर्ली रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात आला. मात्र, पूर्वेला त्याची एक बाजू स.वा. जोशी शाळेनजीक उतरते. सगळीच वाहने स.वा. जोशी शाळेकडे न वळता पुलावरून कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली असती. तसेच जोशी शाळा परिसर, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली-चोळेगाव येथे कोंडीत त्यांना अडकावे लागले नसते. या सगळ्या पूलकोंडीस सत्ताधारी शिवसेना-भाजप युती जबाबदार असल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम म्हणाले.>२० मिनिटांत ठाणे तूर्तास कागदावरचडोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली या खाडीपुलाचे काम २०१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या पुलाचे काम डोंबिवलीच्या दिशेने काही अंशी झालेले आहे. मात्र, माणकोलीच्या दिशेने भूसंपादनाचा प्रश्न निरुत्तरीत राहिल्याने २०१६ पासून हा खाडीपूल मार्गी लागलेला नाही. त्यामुळे डोंबिवली ते भिवंडी, ठाणे हे २० मिनिटांत अंतर कापण्यात येईल, हा दावा तूर्तास तरी कागदावरच आहे. त्यामुळे डोंबिवली ते ठाणे, भिवंडीला जाण्यासाठी कोपर रेल्वे उड्डाणपुलावरूनच जावे लागत आहे. हा पूलही २७ मे पासून बंद झाल्यास ठाणे-भिवंडी सोडा, शहरात पूर्व-पश्चिमेला ये-जा कशी करायची, असा प्रश्न आहे.