शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत करकोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:47 IST

‘सुविधा नाहीत, तर कर नाही,’ अशी भूमिका घेत २७ गावांतील नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कर न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी एमआयडीसी परिसरातील निवासी भागातील नागरिकांनीही पाच ते सहापट जादा दराने कराची बिले पाठवल्याबद्दल रोष व्यक्त करत कर न भरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

डोंबिवली/कल्याण : ‘सुविधा नाहीत, तर कर नाही,’ अशी भूमिका घेत २७ गावांतील नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कर न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी एमआयडीसी परिसरातील निवासी भागातील नागरिकांनीही पाच ते सहापट जादा दराने कराची बिले पाठवल्याबद्दल रोष व्यक्त करत कर न भरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनीही पालिका प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. सुविधा पुरवण्यात पालिका अपयशी ठरल्याने यापूर्वी डोंबिवलीतील नागरिकांनीही ‘सुविधा नाही, तर कर नाही,’ अशी भूमिका घेतली होती. प्रशासकीय अपयशामुळे त्याचे लोण पसरत चालल्याने कल्याण-डोंबिवलीसमोर करकोंडीचे भीषण संकट उभे ठाकले आहे. त्यातून मार्ग काढला नाही, तर पालिका चालवायची कशी हा गहन प्रश्न उभा ठाकणार आहे.केडीएमसी २७ गावांत नागरी सोयीसुविधा पुरवत नाहीकल्याण : केडीएमसी २७ गावांत नागरी सोयीसुविधा पुरवत नाही. मात्र, महापालिकेने केलेली मालमत्ताकराची आकारणी ही जिझियाकराप्रमाणे आहे. महापालिकेने या कराची आकारणी रद्द करावी, अशी मागणी २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीने सोमवारी केली.केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके शनिवारी २७ गावांचा दौरा करण्यासाठी गेले असताना संघर्ष समितीने त्यांना घेराव घातला. तसेच मालमत्ताकराच्या बिलांची होळी करून निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी बोडके यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी चर्चेसाठी बोलावले होते. त्यानुसार, पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पदाधिकारी वंडार पाटील, गणेश म्हात्रे, विजय भाने, बळीराम तरे, दत्ता वझे, गजानन मांगरूळकर, वासुदेव गायकर आदी उपस्थित होते.महापालिका कोणत्याही सोयीसुविधा पुरवत नाही, मग महापालिकेने कशाच्या आधारे थेट सात ते दहा पटीने मालमत्ताकर वाढवून त्याची बिले ग्रामस्थांना पाठवली आहेत. या मालमत्ताकरात राज्य व महापालिकेचा, असा दोन प्रकारचा शिक्षणकर लावला आहे. राज्य सरकारचा शिक्षणकर भरण्यास आमची हरकत नाही. मात्र, महापालिकेचा शिक्षणकर कशाच्या आधारे भरायचा. कारण, २७ गावांतील शाळा या महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या नाहीत. त्या जिल्हा परिषदेच्याच ताब्यात आहेत. तसेच महापालिकेने २७ गावांतील शाळांना शैक्षणिक साहित्यही दिलेले नाही. याउलट, ते न देताही महापालिकेने पुरवले, असे सांगितले जात आहे. त्यात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्याची शहानिशा करावी, अशी मागणी पदाधिकाºयांनी केली.महापालिकेने मलनि:सारणकर लावला आहे. मात्र, २७ गावांत मलनि:सारण प्रकल्पच राबवलेला नाही. मग, हा कर का भरायचा, असा सवाल समितीने केला.जून २०१५ मध्ये गावे महापालिकेत आली. त्यानंतर, निवडणूक आयोगाच्या दुटप्पीपणामुळे ७ सप्टेंबर २०१५ ला राज्य सरकारने गावे वगळण्यासाठी हरकती व सूचना मागवल्या. मात्र, त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. महापालिका सेवा पुरवत नसल्याने २७ गावांना महापालिकेतच राहायचे नाही. स्वतंत्र नगरपालिकेच्या मुद्यावर समिती ठाम आहे. जोपर्यंत महापालिकेचे पालकत्व आहे, तोपर्यंत महापालिकेने सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत, याकडे समितीने लक्ष वेधले.सुविधांची बोंब, करवसुली जोरातडोंबिवली : शहरातील एमआयडीसी परिसरातील निवासी भागात आधीच नागरी सुविधांच्या नावाने बोंब असताना केडीएमसीने मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बिले पाठवल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे. ‘आधी सुविधा द्या, मगच कर भरण्याचा विचार करू’, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. सुदर्शननगर निवासी संघाने रहिवाशांनी कर भरू नये, असे आवाहन जाहीर फलकाद्वारे केले आहे.सुविधांचा बोजवारा उडाल्याने डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने आधीच ‘सेवा नाही तर कर नाही’, असे आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या राजवटीतून महापालिकेत आलेल्या या विभागांतील रहिवाशांची स्थिती ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली आहे. पालिकेने पाच ते सहापट दराने मालमत्ताकराची बिले पाठवून रहिवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याचा आरोप होत आहे. पालिकेत सामविष्ट झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत करात वाढ करणार नाही, असे सांगितले होते. परंतु, यंदा पाठवलेली बिले मागील वर्षाच्या बिलांच्या रकमेच्या साधारण पाच ते सहापट असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मागील वर्षी २० हजार २६० इतके कराचे बिल आले होते. तर, यंदा बिल एक लाख १३ हजार ५६ इतके आल्याने सोसायटी सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्याकडूनच बिले वसूल केली जातात, मग केडीएमसी ‘वॉटर सप्लाय बेनिफिट कर’ कसा घेते, असा त्यांचा सवाल आहे. ही करवसुलीची बिले ३० मार्चपासून सोसायट्यांना मिळू लागली आहेत. काही जणांना ती मिळालेली नाहीत. बिले इतक्या उशिरा दिली जात असताना ती त्वरित न भरल्यास दोन टक्के व्याज आकारले जाईल, असे धमकीवजा इशारे दिले जात असल्याकडे रहिवाशांनी लक्ष वेधले.सुविधा नसतानाकर का भरायचा?च्एमआयडीसी निवासी भागात बहुतेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यावरील खड्डे व धुळीने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फवारणी हा प्रकार येथे बंद झाला आहे. परिणामी, डास आणि किड्यांची बेसुमार वाढ झाली आहे.च्छोटीमोठी गटारांची साफसफाई, कचरा उचलणे आदी सेवा नियमित होत नाहीत. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. नागरी सुविधा मिळत नसतील तर कर कशाला भरावा, असा सवाल ते करत आहेत.च्ग्रामपंचायतीतून मोठ्या आशेने महापालिकेत आलो, परंतु आता आमचा भ्रमनिरास झाला आहे. अशीच परिस्थिती यापुढे कायम राहिली तर आम्ही कर न भरण्याचा विचार करू. त्यासाठी आम्ही महापालिकेला १५ दिवसांचा अल्टीमेटम देत आहोत. यानंतरही सुधारणा न झाल्यास ‘सेवा नाही तर कर नाही’, असे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ‘डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन’ने आयुक्त गोविंद बोडके यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.कर हा सर्वांसाठी सारखाच आहे. ‘वॉटर बेनिफिट कर’ हा कराचाच एक भाग आहे. ज्याप्रमाणे रस्ताकर आणि वृक्षकर आहे, त्याप्रमाणे हा कर असून तो भरणे बंधनकारक आहे. ज्यावेळी २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाली, तेव्हा प्रारंभीची दोन वर्षेच त्यांना ग्रामपंचायतीप्रमाणेच कर आकारला होता. परंतु, तिसºया वर्षी मात्र सामान्यकराच्या २० टक्के कर आकारला आहे. त्यामुळे त्यांना बिले जादा दराची वाटत आहे.- विनय कुलकर्णी,करनिर्धारक व संकलन अधिकारी, केडीएमसी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका