शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवली पालिका : तुटीच्या दुष्टचक्रातून सुटकाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:35 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात अपेक्षित ८४० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. उद्दीष्टापेक्षा २६ कोटी कमी म्हणजे ८१४ जमा झाले आहेत. त्याचवेळी पालिकेने ११४० कोटींची कामे हाती घेतली असल्याने ३२६ कोटी रुपयांची तूट कायम आहे. गेली दोन वर्षे सातत्याने असणारी ही ३०० कोटी रुपयांच्या आसपासची तूट भरुन काढण्याकरिता २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा आणि बीएसयूपी योजनेत गरीबांसाठी बांधलेली घरे विकून २२४ कोटी उभे करण्याचा पर्याय प्रशासनाने सुचवला आहे.

- मुरलीधर भवारकल्याण  - कल्याण-डोंबिवली महापालिकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात अपेक्षित ८४० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे लक्ष्य गाठता आलेले नाही. उद्दीष्टापेक्षा २६ कोटी कमी म्हणजे ८१४ जमा झाले आहेत. त्याचवेळी पालिकेने ११४० कोटींची कामे हाती घेतली असल्याने ३२६ कोटी रुपयांची तूट कायम आहे. गेली दोन वर्षे सातत्याने असणारी ही ३०० कोटी रुपयांच्या आसपासची तूट भरुन काढण्याकरिता २०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा आणि बीएसयूपी योजनेत गरीबांसाठी बांधलेली घरे विकून २२४ कोटी उभे करण्याचा पर्याय प्रशासनाने सुचवला आहे. त्या दिशेने ठोस पाऊल न पडल्याने २०१८-१९ या आर्थिक वर्षअखेरीस तूट महापालिकेची पाठ सोडणार नाही, असेच निराशाजनक चित्र आहे.मालमत्ता कराची एकूण मागणी ८५९ कोटी रुपये होती. त्यापैकी यंदाची मागणी ५२९ कोटी रुपये होती. वादात अडकलेली रक्कम वजा करुन वसुलीचे लक्ष्य ३४० कोटी रुपये गृहित धरले होते. सुधारीत अर्थसंकल्पात हे लक्ष्य ३०० कोटी रुपये अपेक्षित धरले. शासकीय कर धरून मालमत्ता कराची वसुली ३०७ कोटी रुपये झाली आहे. कर वगळले तर ती २९३ कोटी होते. हे लक्ष्य १४ कोटीने कमी आहे. शासकीय कर वसुली समाविष्ट करुन वसुलीची रक्कम ३०७ कोटी रुपये असून ही रक्कम सुधारीत लक्ष्याच्या रकमेपेक्षा ७ कोटींनी अधिक आहे. बिल्डरांसाठी ओपन लॅण्ड टॅक्स कमी करुन ३३ टक्के लागू केला. मात्र तत्कालीन आयुक्तांनी ओपन लॅण्ड टॅक्सचा दर कमी करण्याचा ठराव अंमलात आणला जाईल तेव्हा ओपन लॅण्ड टॅक्सच्या एकुण रकमेपैकी बिल्डर ५० टक्के थकबाकी रक्कम भरतील, अशी अट लागू केल्याने ठरावाची अंमलबजावणीच झालेली नाही. परिमाणी मार्च अखेर ५० टक्के रक्कम जमा झालेली नाही. बिल्डराना अभय योजना हवी होती. पण ती नागरिकांनाही द्यावी लागेल आणि त्याचा फटका कर वसुलीला बसेल. त्यामुळे कोणालाही अभय योजना लागू झाली नाही. बिल्डरांकडून ओपन लॅण्ड टॅक्सच्या थकबाकीसह येणे असलेली रक्कम ४१६ कोटी होती. त्यापैकी ५० टक्के थकबाकी बिल्डरांनी भरली असती तर वसुली एका झटक्यात २०० कोटी रुपयांनी वाढली असती आणि हजार कोटी रुपयांच्या घरात गेली असती.नगरविकास विभागाकडून बांधकाम परवानग्या व विविध करापोटी मिळणाऱ्या उत्पन्नाचे संभाव्य लक्ष्य १११ कोटी रुपये ठरवण्यात आले होते. त्यापैकी ९० कोटीचेच लक्ष्य गाठता आले. ही वसुली उद्दीष्टापेक्षा २१ कोटीने कमी आहे. टीडीआरचे २५० प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे प्रलंबित होते व त्यावर तत्कालीन आयुक्तांनी निर्णय घेतला नाही. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची गंगाजळी आली असती. तसेच हे प्रस्ताव मार्गी लागले असते तर बांधकाम मंजुरीसाठी प्रस्ताव आले असते. ते न झाल्याचा हा परिणाम आहे.महापालिकेच्या उत्पन्न आणि खर्चातील तूट भरुन काढण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी २०० कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्याचा प्रस्ताव सुचवला होता. त्याचबरोबर बीएसयूपी योजनेंतर्गत बांधलेल्या ३०० सदनिकांचे पंतप्रधान आवास योजनेंंतर्गत रुपांतर करुन त्यांची विक्री करणे व या विक्रीतून २२४ कोटी रुपये उभे राहतील, अशी अपेक्षा होती. घरे विकण्यास सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.पालिकेने पाणीपट्टी वसुलीचे सुधारीत लक्ष्य ५६ कोटी रुपये ठरवले होते. ती वसुली ६० कोटी झाली आहे. या विभागाकडून वसुलीचे लक्ष्य गाठले जात नाही. त्यामुळे ती खाजगी कंत्राटदारामार्फत करण्याचा ठराव महासभेत मंजूर झाला. एलबीटी व जीएसटी अनुदानापोटी सरकारकडून २७८ कोटी रुपये येणे अपेक्षित होते. महापालिकेच्या तिजोरीत या अनुदानापोटी २९१ कोटी रुपये जमा झाले आहेत.इस्टेट विभागाच्या परवान्यांतून ७ कोटी ५० लाख वसुली झाली. एकूण करवसुलीची रक्कम ७५५ कोटी ५० लाखांच्या घरात जाते. किरकोळ करवसुलीची रक्कम ५७ कोटी आहे. त्यामुळे तिजोरीत विविध करांच्या वसुलीपोटी ८१४ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. बांधकाम मंजुरीचे प्रस्तावही रखडले आहेत. ते मार्गी लागले असते तर नगररचना विभागाची करवसुली १११ कोटी झाली असती.आयुक्तांनी काटकसर प्रस्तावित करताना खर्चाची रक्कम १ हजार ६९८ कोटी धरली होती. स्थायी समितीने त्यात १११ कोटींची वाढ करुन अपेक्षित खर्च १ हजार ८०९ कोटी करण्यास महासभेत अंतिम मान्यता दिली आहे. कर्ज मिळाले नाही व घरे विकली गेली नाही तर यंदाचे वर्ष आर्थिक तुटीचे व पर्यायाने चणचणीचे राहील, अशीच शक्यता आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाnewsबातम्या