शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागात दोन हजार ७२० पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:37 IST

पूरग्रस्तांची संख्या जवळपास तीन लाख

कल्याण : कल्याण-डोंबिवलीसह ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला. हजारो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या सर्व घरांचे नुकसान किती झाले, याचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयातर्फे सध्या सुरू आहेत. पाचही मंडळ कार्यालयांतर्फे आतापर्यंत दोन हजार ७२० घरांचे पंचनामे कल्याण तहसील कार्यालयाकडून करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षात पूरग्रस्तांची संख्या सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरूच आहे. पंचनाम्यांपश्चात सरकारकडून मदत मिळणार की नाही, याविषयी पूरग्रस्तांच्या मनात साशंकता आहे.कल्याण-डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढल्याने उल्हास नदी, कल्याण खाडी, वालधुनी नदी यांच्या किनाऱ्यांसह सखल भाग पुराच्या पाण्याने वेढला गेला. २६ जुलै रोजी झालेल्या पावसाचा जोरदार फटका अनेकांना बसला. २७ आणि २८ जुलै रोजीच्या पुराने घरात घुसलेले पाणी ओसरलेले नव्हते. त्यानंतर, दोन दिवसांनी मुरबाडला एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर कल्याण तहसीलदार कार्यालयाने पूरग्रस्तांचे पंचनामे सुरू केले. हे पंचनामे सुरू करण्यासाठी सरकारकडून एक परिपत्रक काढण्यात आले. त्यात दोन दिवस पुराचे पाणी ज्यांच्या घरात होते, तसेच जी घरे अधिकृत आहे, त्याच घरांना मदत दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २७ आणि २८ तसेच ४ आणि ५ जुलै रोजी पुराचा फटका ज्या घरांना बसला आहे, त्या घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, आतापर्यंत दोन हजार ७२० पंचनामे तहसील कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहेत. हे पंचनामे सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवले जातील. त्यानंतर, सरकारकडून त्यांना मदत दिली जाईल. मदतीची रक्कम पाच ते सहा हजार रुपये ठरवली आहे. ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांचे संसार पाच ते सहा हजार रुपयांत उभे राहणार नाहीत. नुकसानीचा आकडा जास्त असून त्यातुलनेत मदतीची रक्कम तुटपुंजी आहे. मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.अधिकृत घरांनाच मदत मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले असले तरी, तहसीलदारांकडून सरसकट सर्वांचेच पंचनामे केले जात आहेत. त्यानंतर, त्यांचे वर्गीकरण केले जाणार आहे. मदत कोणाला द्यायची आणि नाकारायची, हा धोरणात्मक निर्णय असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सरकारच्या या परिपत्रकामुळे बेकायदा घरांना मदत मिळणार नाही. त्यामुळे तहसीलदारांकडून आतापर्यंत दोन हजार ७२० एवढेच पंचनामे करण्यात आले आहेत.कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला पुराच्या पाण्याचा जबरदस्त फटका बसला. त्यात १४०० व्यापाऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांंचे पंचनामे करण्याची मागणी बाजार समितीचे सभापती कपिल थळे यांनी केली होती. त्यानुसार, तहसीलदार कार्यालयाकडून ४०० व्यापाºयांचे पंचनामे केले आहेत. कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागात तीन लाखांपेक्षा जास्त पूरग्रस्त आहेत. त्यामुळे पंचनाम्यांचा आकडा व बाधितांची संख्या हे प्रमाण व्यस्त दिसून येत आहे.जी घरे पाण्याखाली पूर्णपणे बुडाली होती, त्यांच्या घरातील विजेचे मीटर नादुरुस्त झालेले आहे. हे मीटर पाणी ओसल्यावर बदलून देण्यात यावे, यासाठी नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे धाव घेतली असता, मीटर बदलून देण्यासाठी शुल्क आकारले जात आहेत. मीटर बदलून देण्याकरिता पैसे आकारले जाऊ नये. ते मीटर मोफत बदलून द्यावेत, अशी मागणी माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.पालकमंत्र्यांनी बुधवारी हा विषय मंत्रालयाच्या बैठकीत चर्चेला घेतला. त्यावेळी पैसे न घेता मीटर बदलून देण्याचे आदेश वीज वितरण विभागाला दिल्याची माहिती देवळेकर यांनी दिली. कल्याण तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच ४ आणि ५ जुलै रोजी पुन्हा पावसाने कहर केला. मुसळधार पावसाने तोच परिसर पुन्हा पाण्याखाली बुडाला. अवघ्या आठ दिवसांआधीच्या पुरातून सावरण्याआधीच अनेकांची घरे पुन्हा पाण्याखाली गेली.