शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

कळवा-मुंब्य्रात मेट्रोची फलकबाजी, शिवसेनेने मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 03:00 IST

कल्याण-भिवंडी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला आले असताना कळवा आणि मुंब्रावासीयांवर अन्याय का, असा सवाल राष्टÑवादीने केला होता. तशी फलकबाजीही कळवा, मुंब्रा भागात केली होती.

ठाणे : कल्याण-भिवंडी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला आले असताना कळवा आणि मुंब्रावासीयांवर अन्याय का, असा सवाल राष्टÑवादीने केला होता. तशी फलकबाजीही कळवा, मुंब्रा भागात केली होती. परंतु, आता अवघ्या पाच दिवसांत याच भागात पुन्हा आभाराचे बॅनर लागले आहेत. परंतु, ते बॅनर राष्टÑवादीचे नसून शिवसेनेने लावल्याने अचानक पाच दिवसांत मेट्रो मंजूर कशी झाली, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.मेट्रो-४ प्रकल्पाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली आहे. कल्याण-भिवंडी मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रोचीही बांधणी करण्याचे काम वेगाने सुरूआहे. परंतु, यामध्ये कळवा आणि मुंब्य्राच्या एकाही भागाचा समावेश नसल्याचा दावा राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानुसार, कळवेकर आणि मुंब्राकर मेट्रोपासून वंचित का, असा सवाल करून त्या परिसरात त्या आशयाचे बॅनरही पाच दिवसांपूर्वी लावले होते. मेट्रोची लाइन कुठे न्यायची, हे काम वास्तविक खासदारांचे असते. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सत्ताधाऱ्यांकडूनही आम्हाला काहीच अपेक्षा नाहीत, त्यामुळेच आयुक्त जयस्वाल यांनीच मेट्रोसाठी काहीतरी करावे, अशी मागणी आव्हाड यांनी केली होती. मुख्य मेट्रो किंवा अंतर्गत मेट्रोत कळव्याचा आणि मुंब्य्राचा समावेश करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.राष्टÑवादीच्या आमदारांनी मेट्रोबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करूनये. मागील महिन्याच्या महासभेतच मंजुरी आलेल्या मेट्रोच्या प्रस्तावात कळवा-मुंब्य्राचा स्पष्ट उल्लेख होता. परंतु, राष्टÑवादीच्या आमदार आणि शहराध्यक्षांना याची माहिती त्यांच्या नगरसेवकांनी दिली नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. केवळ नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे.- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठाणे महापालिकापाच दिवसांत मंजुरी कशी?मात्र, आता या फलकबाजीस पाच दिवस उलटत नाही, तोच मेट्रो मंजूर केल्याबद्दल जाहीर आभार मानले आहेत. परंतु, हे बॅनर राष्टÑवादीचे नसून ते शिवसेनेने लावल्याने अवघ्या पाच दिवसांत मेट्रो मंजूर कशी झाली, तिचा डीपीआर केव्हा मंजूर झाला, महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव कधी मंजूर झाला, असे अनेक प्रश्न राष्टÑवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहेत.शिवसेनेने घेतला प्रस्तावाचा आधारमागील महिन्याची तहकूब महासभा १९ डिसेंबर रोजी घेण्यात आली. तीत अंतर्गत मेट्रो सल्लागार निवडीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता.याच प्रस्तावात दुसºया टप्प्यात कळवा आणि मुंब्य्राचा समावेश केला जाईल, असा उल्लेखही आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.आता याच ठरावाचा आधार घेऊन शिवसेनेने कळवा, मुंब्रा भागात भले मोठे बॅनर लावून राष्टÑवादीची हवाच गुल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे