शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कळवा-मुंब्य्रात मेट्रोची फलकबाजी, शिवसेनेने मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 03:00 IST

कल्याण-भिवंडी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला आले असताना कळवा आणि मुंब्रावासीयांवर अन्याय का, असा सवाल राष्टÑवादीने केला होता. तशी फलकबाजीही कळवा, मुंब्रा भागात केली होती.

ठाणे : कल्याण-भिवंडी मेट्रोच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणला आले असताना कळवा आणि मुंब्रावासीयांवर अन्याय का, असा सवाल राष्टÑवादीने केला होता. तशी फलकबाजीही कळवा, मुंब्रा भागात केली होती. परंतु, आता अवघ्या पाच दिवसांत याच भागात पुन्हा आभाराचे बॅनर लागले आहेत. परंतु, ते बॅनर राष्टÑवादीचे नसून शिवसेनेने लावल्याने अचानक पाच दिवसांत मेट्रो मंजूर कशी झाली, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.मेट्रो-४ प्रकल्पाच्या कामाला ठाण्यात सुरुवात झाली आहे. कल्याण-भिवंडी मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अंतर्गत मेट्रोचीही बांधणी करण्याचे काम वेगाने सुरूआहे. परंतु, यामध्ये कळवा आणि मुंब्य्राच्या एकाही भागाचा समावेश नसल्याचा दावा राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानुसार, कळवेकर आणि मुंब्राकर मेट्रोपासून वंचित का, असा सवाल करून त्या परिसरात त्या आशयाचे बॅनरही पाच दिवसांपूर्वी लावले होते. मेट्रोची लाइन कुठे न्यायची, हे काम वास्तविक खासदारांचे असते. परंतु, त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सत्ताधाऱ्यांकडूनही आम्हाला काहीच अपेक्षा नाहीत, त्यामुळेच आयुक्त जयस्वाल यांनीच मेट्रोसाठी काहीतरी करावे, अशी मागणी आव्हाड यांनी केली होती. मुख्य मेट्रो किंवा अंतर्गत मेट्रोत कळव्याचा आणि मुंब्य्राचा समावेश करावा, असेही त्यांचे म्हणणे आहे.राष्टÑवादीच्या आमदारांनी मेट्रोबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करूनये. मागील महिन्याच्या महासभेतच मंजुरी आलेल्या मेट्रोच्या प्रस्तावात कळवा-मुंब्य्राचा स्पष्ट उल्लेख होता. परंतु, राष्टÑवादीच्या आमदार आणि शहराध्यक्षांना याची माहिती त्यांच्या नगरसेवकांनी दिली नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. केवळ नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे.- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठाणे महापालिकापाच दिवसांत मंजुरी कशी?मात्र, आता या फलकबाजीस पाच दिवस उलटत नाही, तोच मेट्रो मंजूर केल्याबद्दल जाहीर आभार मानले आहेत. परंतु, हे बॅनर राष्टÑवादीचे नसून ते शिवसेनेने लावल्याने अवघ्या पाच दिवसांत मेट्रो मंजूर कशी झाली, तिचा डीपीआर केव्हा मंजूर झाला, महासभेत यासंदर्भातील प्रस्ताव कधी मंजूर झाला, असे अनेक प्रश्न राष्टÑवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहेत.शिवसेनेने घेतला प्रस्तावाचा आधारमागील महिन्याची तहकूब महासभा १९ डिसेंबर रोजी घेण्यात आली. तीत अंतर्गत मेट्रो सल्लागार निवडीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला होता.याच प्रस्तावात दुसºया टप्प्यात कळवा आणि मुंब्य्राचा समावेश केला जाईल, असा उल्लेखही आहे. त्या अनुषंगाने या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.आता याच ठरावाचा आधार घेऊन शिवसेनेने कळवा, मुंब्रा भागात भले मोठे बॅनर लावून राष्टÑवादीची हवाच गुल केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे