शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कळवा, मुंब्य्रासाठी ब्रिटिशकालीन धरण

By admin | Updated: March 13, 2016 02:35 IST

कळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या ६० तास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा

अजित मांडके, ठाणेकळवा-मुंब्य्रातील नागरिकांना सध्या ६० तास पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी आंदोलने सुरू आहेत. या पाणीसमस्येवर मात करण्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून कळवा आणि रबाळेदरम्यान पारसिक पुलामागे असलेले धरण उपयोगात आणण्याबाबत आता ठाणे महापालिका आणि रेल्वे विभागाकडे मागणी करण्यात येत आहे. या धरणाच्या जमिनीची मालकी रेल्वेकडे आहे. त्याच्या ताब्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. या धरणाला डी धरण म्हणून संबोधले जाते. इंग्रजांच्या काळात जेव्हा रेल्वे ट्रॅक हा ठाण्याच्या पुढे न्यायचा होता, त्या वेळी येथे डोंगर पोखरून दोन मोठे बोगदे तयार करण्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून मजूर आणले गेले होते. या मजुरांच्या पाण्याचा प्रश्न कायम होता, तेव्हा त्यांच्याकरिता हे डी धरण बांधले. त्याच्या तीनही बाजूंनी डोंगर असून जाण्यासाठी एक रस्ता आहे. परिणामी, तिन्ही डोंगरांवरून पावसाळ्यात वाहत येणारे पाणी या धरणात साठवले जाते. त्याचा वापर वर्षभर करता येऊ शकतो.ते गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अशरीन राऊत यांनी ठाणे महापालिकेला एक पत्र लिहून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.> या धरणातील पाणी कळवा, मुंब्य्रातील रहिवाशांना मिळावे, यासाठी पालकमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती. त्यानंतर, त्यांनी धरणाची पाहणी करून पुढील धोरण ठरविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत.- शैलेश पाटील, नगरसेवक, मनसे