शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे.कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचा ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ च्या रेल्वे बजेटमध्ये या प्रकल्पासाठी ४२८ कोटी रूपये मंजूर केले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र दोन वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे काम मार्गी लागलेले नाही. या प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी परत जाऊ नये, यासाठी त्यांनी या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करून पहिल्या टप्प्यात दिघा स्टेशनचे काम सुरू करून घेतले. दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाºया झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए खात्याकडून न झाल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. यासंदर्भात विचारे यांनी मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेऊन पत्रव्यवहार केला आहे. मात्र पुनर्वसनाचे आदेश एमएमआरडीएला मिळाले नसल्याने हे काम रखडले आहे. राज्य शासनास हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाने आदेश द्यावे, अशी मागणी विचारे यांनी संसदेमध्ये केली होती.>दिघा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ५५ कोटीया प्रकल्पात कल्याण डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या कळवा-ऐरोली उन्नतमार्गासह दिघा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दिघा स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रु पये खर्च करणार आहे. सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदरनजीकचा उन्नतमार्ग आणिदिघा रेल्वेस्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नतमार्गाचाच भाग आहे. दिघा रेल्वेस्थानक येत्या तीन वर्षात उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडे रेल्वे विकास महामंडळाने कर्जही मागितले आहे. पंतप्रधानानी दोन वर्षांपूर्वी या मार्गाचे भूमिपूजन करूनही या मार्गातील जमीन संपादन, झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. एमएमआरडीएची जबाबादारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. मात्र, तरीही मोदींनी भूमिपूजन केलेला प्रकल्प दोन वर्षे रखडलेला असल्याने कल्याण-नवी मुंबई मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा उन्नत मार्ग झाल्यास ठाणे स्थानकावरीलताण कमी होणार आहे.