शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड मार्गाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी भूमिपुजन झालेल्या कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा भार दिवसेंदिवस वाढतच आहे.कळवा-ऐरोली या महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड नवीन रेल्वेमार्गाचा ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ च्या रेल्वे बजेटमध्ये या प्रकल्पासाठी ४२८ कोटी रूपये मंजूर केले होते. त्यानुसार या प्रकल्पाचे भूमिपूजन डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र दोन वर्षे उलटूनही या प्रकल्पाचे काम मार्गी लागलेले नाही. या प्रकल्पासाठी मंजूर झालेला निधी परत जाऊ नये, यासाठी त्यांनी या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करून पहिल्या टप्प्यात दिघा स्टेशनचे काम सुरू करून घेतले. दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाºया झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए खात्याकडून न झाल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे. यासंदर्भात विचारे यांनी मुख्यमंत्र्यांची वारंवार भेट घेऊन पत्रव्यवहार केला आहे. मात्र पुनर्वसनाचे आदेश एमएमआरडीएला मिळाले नसल्याने हे काम रखडले आहे. राज्य शासनास हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र शासनाने आदेश द्यावे, अशी मागणी विचारे यांनी संसदेमध्ये केली होती.>दिघा रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ५५ कोटीया प्रकल्पात कल्याण डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाचा वाटा असलेल्या कळवा-ऐरोली उन्नतमार्गासह दिघा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. दिघा स्थानक उभारणीसाठीही रेल विकास महामंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थानकाच्या उभारणीसाठी रेल्वे पहिल्या टप्प्यात ५५ कोटी रु पये खर्च करणार आहे. सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदरनजीकचा उन्नतमार्ग आणिदिघा रेल्वेस्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नतमार्गाचाच भाग आहे. दिघा रेल्वेस्थानक येत्या तीन वर्षात उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यासाठी जागतिक बँकेकडे रेल्वे विकास महामंडळाने कर्जही मागितले आहे. पंतप्रधानानी दोन वर्षांपूर्वी या मार्गाचे भूमिपूजन करूनही या मार्गातील जमीन संपादन, झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. एमएमआरडीएची जबाबादारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. मात्र, तरीही मोदींनी भूमिपूजन केलेला प्रकल्प दोन वर्षे रखडलेला असल्याने कल्याण-नवी मुंबई मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा उन्नत मार्ग झाल्यास ठाणे स्थानकावरीलताण कमी होणार आहे.