शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

काजूपाड्यामध्ये हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:42 IST

पालिकेची कारवाई : संतप्त रहिवाशांचा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर मार्गावरील काजूपाडा परिसरात वसलेल्या अनधिकृत झोपड्या, चाळी व पक्की घरे अशा सुमारे पाचशेहून अधिक बांधकामांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी कारवाई केली. पोलीस बंदोबस्तात झालेली ही कारवाई बेकायदेशीर असून ती रोखण्यासाठी झोपडीधारकांनी पालिका मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघातील बेकायदेशीर झोपड्या व इतर बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार, सोमवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने २५० पालिका अधिकारी व कर्मचारी, २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी, १०० महिला पोलीस कर्मचारी व खाजगी महिला सुरक्षारक्षक, खाजगी बाउन्सर तसेच दोन पोकलेन, चार जेसीबी व १० डम्पर असा फौजफाटा तैनात करण्यात आला. सकाळपासून आयुक्तांच्या देखरेखीखाली कारवाईला सुरुवात झाली. अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात सोमवारी सुनावणी ठेवली असताना कारवाई कशी केली गेली, असा दावा करत रहिवाशांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी पालिका मुख्यालयात धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त दालनात नसल्याने दालनाबाहेरच ओमप्रकाश पाल यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले. पाल म्हणाले की, या बांधकामांवरील कारवाई टाळण्यासाठी प्रभाग अधिकाºयांसह प्रभागातील बीट निरीक्षकांनी मोठ्या रकमेची मागणी केली होती. त्याची तक्रार पालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिकेला देऊनही पालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. सायंकाळपर्यंत काजूपाडा व लगतच्या सुधांशू महाराज आश्रम परिसरातील सुमारे पाचशेहून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली गेली.लाच मागितली?या बांधकामांवर कारवाई होऊ नये, यासाठी प्रभाग अधिकाºयांसह अन्य काही अधिकाºयांनी लाच मागितली होती. ती मान्य केली नाही आणि त्याची तक्रार केली म्हणूनच आकसाने ही कारवाई केल्याचा आरोप तेथील रहिवाशांनी केला. या लाचप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने देऊनही ती का झाली नाही, या अधिकाºयांना कोण पाठीशी घालते आहे, असा आक्षेपही या रहिवाशांनी घेतला.

टॅग्स :thaneठाणे