शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
2
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
3
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
4
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
5
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
6
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
7
अनेक वर्ष एकत्र, नंतर प्रियकराचं ठरलं लग्न; व्हिडीओ बनवून तृतीयपंथीयानं संपवलं जीवन, म्हणाली...
8
७९ वर्षीय अब्जाधीश वारसदाराच्या शोधात! पत्नी हवी म्हणून जाहिरात काढली, वर्षाला ६० लाख पगार देणार, काम एकच...
9
थरारक लव्हस्टोरी! गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने केस केली; पोलिसांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी प्रियकर थेट भारतात
10
अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाला ED चा जबर दणका; FD, बँक बॅलन्ससह १,१२० कोटींची संपत्ती जप्त
11
Ayushman Card: वर्षात किती वेळा करू शकता मोफत उपचार? कशी तपासाल तुमची पात्रता
12
विराट कोहलीला तब्बल ७ वर्षानी पुन्हा 'ती' कामगिरी करायची संधी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार?
13
"जे घडलं त्यावर आता..."; एकनाथ शिंदेंबाबत रवींद्र चव्हाणांचा खुलासा; महायुतीतील वाद मिटणार?
14
मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट ०.२५% ने घटवला; तुमच्या ५० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती कमी होणार?
15
सरकार म्हणते, बघा विकासाची गती, विरोधक म्हणतात, ही तर अधोगती!
16
तुमचा पतीही इतर महिलांचे फोटो लाईक्स करतोय?; तुर्की कोर्टानं सुनावलेला 'हा' निकाल एकदा वाचाच
17
"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
18
Crime: युट्यूबवर व्हिडिओ पाहून दरोड्याचा कट, ज्वेलर्सची दुकानात घुसून हत्या, परिसरात खळबळ!
19
नवी मुंबईकरांना नवीन वर्षाचं गिफ्ट! नेरुळ-उरण-बेलापूरसाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या
20
२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार, केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियोजनाच्या नुसत्या बाताच सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:54 IST

ठाकु र्ली उड्डाणपुलावरून जीवघेणा प्रवास : अवजड वाहनांमुळे विद्यार्थी त्रस्त, अपघाताची भीती

डोंबिवली : पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलावरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात केडीएमसीने नव्याने उड्डाणपूल बांधला. परंतु, पुलालगतच्या अरुंद रस्त्यांमुळे येथील वाहतूक पूर्णत: कोलमडून पडते. पुलावरून अवजड वाहनांचीही वाहतूक सर्रास होत असल्याने येथील शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणेही जिकिरीचे होते. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाने वाहतूक शाखेशी पत्रव्यवहारही केला आहे. परंतु, वाहतूक पोलिसांकडून कृतीअभावी केवळ नियोजनाच्या ‘बाता’च सुरू आहेत.

ठाकुर्ली उड्डाणपुलानजीकचे रस्ते अरुंद आहेत. तेथील इमारती जुन्या असल्याने त्यांना स्वत:ची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात आहेत. या पुलावरून लहान वाहनांबरोबर ट्रक, बस, टँकर यांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे पूर्वेकडील स.वा. जोशी विद्यालयालगतच्या रस्त्यावर नेहमीच वाहनांची कोंडी होते. शनिवार-रविवार तर तासन्तास या कोंडीत वाहनचालक अडकून पडतात. त्याचा फटका पादचाऱ्यांनाही बसतो. रस्त्याच्या दुतर्फा होणारे वाहनांचे पार्किंग, पदपथांवर झालेली अतिक्रमणे आणि रस्त्यावरून वाहनांची सदैव वर्दळ पाहता चालायचे कसे, असा यक्षप्रश्न पादचाऱ्यांना पडतो.

स.वा. जोशी हायस्कूलच्या संकुलात एक इंग्रजी शाळा, कनिष्ठ आणि महिला महाविद्यालयही आहे. त्यात एक हजार ३०० च्या आसपास विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण होते. या त्रासाबाबत महाविद्यालय प्रशासनाने केडीएमसी व वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, वाहतूक पोलीस हालचाली होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. येथील व्यापारीही कमालीचे त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी वेळीच पावले उचलावीत, अन्यथा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असे व्यापारी नितीन सावला यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एन. जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.रोडरोमिओंनी मांडलाय उच्छाद!जोशी हायस्कूल परिसरात रोडरोमिओंनीही उच्छाद मांडला आहे. भरधाव गाड्या चालवून रोडरोमिओ शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्रास देण्याचे प्रकार येथे सर्रास घडत आहेत. विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकारही त्यांच्याकडून घडतात. यासंदर्भातही शाळा व्यवस्थापनाने रामनगर पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. शाळा भरणे आणि सुटण्याच्या कालावधीत पोलिसांची गस्त वाढावी, अशी मागणी होत आहे.