शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान; धन कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली. मात्र, ...

सुरेश लोखंडे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाली. मात्र, त्याला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊनही या निवडणुकीत काम केलेले अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अशा दोन हजार ९०० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर्तव्य बजावण्याचा केवळ मान मिळाला, पण आता धनासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा सूर आहे.

जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यात १४३ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान झाले आहे. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींमधील एक हजार ४७२ सदस्यांसाठी निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी चार हजार ३८ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी आठ ग्रामपंचायतींमधील ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४७९ मतदान केंद्रांवर मतदान झाले.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रिंगणात दोन हजार ४१३ उमेदवार होते. या निवडणुकीसाठी दोन लाख ५० हजार ५०० मतदारांकरिता ४७९ मतदान केंद्रे होती. या केंद्रांवर दोन हजार ९०० अधिकारी, कर्मचारी आणि तीन हजार पोलीस तैनात होते. त्यात एक जनसंपर्क अधिकारी, तीन मतदान केंद्र अधिकारी, शिपाई आणि सुरक्षेसाठी पोलीस आदी सहा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने एका मतदान केंद्राची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, ते अद्याप निवडणुकीच्या कामाच्या मानधनापासून वंचित आहेत.

---------------------