शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

रिक्षाचालकांना मदत मिळण्यास उजाडणार जून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:42 IST

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १,५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा केवळ फार्स ठरली आहे. ...

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १,५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा केवळ फार्स ठरली आहे. १३ एप्रिलला मदतीची घोषणा झाली असली, तरी प्रत्यक्ष ती मिळण्यास जून उजाडणार आहे. याकडे भाजपचे नगरसेवक व भाजप रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाऊनच्या काळातच पैशांची गरज असताना केवळ घोषणा करून राज्य सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना ठाकरे यांनी रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. मुंबई-ठाणे जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक परमिटधारक रिक्षाचालक आहेत. १ एप्रिलपासून सरकारचे निर्बंध व १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लवकर मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. सध्या आरटीओकडून रिक्षाचालकांचे बँकेतील खाते क्रमांक आधारकार्डला लिंक करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होण्यास जून उजाडणार आहे. त्यानंतरच रिक्षाचालकांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

श्रेय घेण्यासाठी धडपड

आधारकार्ड लिंक करण्यातच दोन महिने जाणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये केवळ श्रेय घेण्यासाठी रिक्षाचालकांना १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली, असा आरोप वाघुले यांनी केला. रिक्षाचालकांना तत्काळ मदत देण्यासाठी परमिटनुसार थेट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

--------------