शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पत्रकारांनी जांभेकरांसारखे सडेतोड लिखाण करावे - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:38 IST

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भीडपणे लिखाण करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले.

डोंबिवली : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भीडपणे लिखाण करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने बालभवन येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यमंत्री चव्हाण बोलत होते. महापौर राजेंद्र देवळेकर, सहायक पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कांबळे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, न्यूज १८ ‘लोकमत’चे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे, आयएमएचे सहसचिव डॉ. मंगेश पाटे, अण्णा बेटावदकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत, डोंबिवली विभागीय अध्यक्ष अनिकेत घमंडी आदींसह मान्यवर उपस्थित होते.पत्रकार केतन बेटावदकर यांना झुंजार पत्रकार, ‘लोकमत’चे पत्रकार प्रशांत माने यांना कै. श्रीकांत टोळ स्मृती पुरस्कार, झी २४ तासचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांना रत्नाकर चासकर पुरस्कार, डॉ. पाटे यांना पत्रकारमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्यमंत्री चव्हाण म्हणाले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातले, मीही कोकणातला म्हणूनच सडेतोड आणि रोखठोक, स्पष्ट बोलणे हे आपल्याला अपेक्षित असते.महापौर देवळेकर म्हणाले की, नव्या पत्रकार भवनाची वास्तू लागलीच कधी उभारली जाईल, ते सांगता येत नाही. पण, बालभवनची जागा पत्रकारांना त्यांच्या उपक्रमांसाठी विनामूल्य देण्यात येईल. आगामी काळात पत्रकार हल्लाविरोधी कायदा संमत झाला की, अनेक समस्या मार्गी लागतीलच, असा विश्वासही देवळेकर यांनी व्यक्त केला.‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक प्रधान म्हणाले की, नवोदित पत्रकारांच्या लेखनात अनेक चुका असतात. विषयाची माहिती नसल्याने लिखाणात स्पष्टता नसते. त्या सुधारण्याची नितांत गरज आहे. नव्या डिजिटल मीडियात वेळेची स्पर्धा जिंकतानाच चुकीची बातमी दिल्याने विश्वासार्हता गमावून बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पत्रकार हुंजे म्हणाले की, पत्रकारांना अत्याधुनिकता आणि अचूकता दोन्ही साधणे गरजेचे आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाता कामा नयेत. डॉ. पाटे यांनी डॉक्टरांवरील हल्ले कायद्याने थांबले नाहीत, अशी खंत व्यक्त केली. पत्रकार संघाचे डोंबिवली अध्यक्ष अनिकेत घमंडी यांनी मान्यवरांचे स्वागत व आभारप्रदर्शन केले, तर पत्रकार निनाद करमरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, ज्येष्ठ नगरसेवक स्थायीचे सभापती रमेश म्हात्रे, केडीएमसीचे उपायुक्त सु.रा.पवार, राहुल दामले, संदीप पुराणिक, राजन आभाळे, विनोद काळण, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, सरचिटणीस शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर, नगरसेविका खुशबू चौधरी, डॉ. सुनीता पाटील, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी, डॉ. अर्चना पाटे, महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने, दत्ता माळेकर, रवी ठाकूर, नंदू परब आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवली