शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जीन्स कारखाने १० दिवसांत बंद

By admin | Updated: March 25, 2016 00:56 IST

वालधुनी आणि उल्हास नदी प्रदूषित करणारे उल्हासनगरमधील जीन्स कारखाने येत्या १० दिवसांत बंद करण्याचे आणि त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी

उल्हासनगर : वालधुनी आणि उल्हास नदी प्रदूषित करणारे उल्हासनगरमधील जीन्स कारखाने येत्या १० दिवसांत बंद करण्याचे आणि त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रदूषण मंडळ व पालिकेला दिले आहेत. प्रदूषणाचे नियम धुडकावणाऱ्या, सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते तसेच नदीत सोडणाऱ्या कारखानदारांचे यामुळे धाबे दणाणले असून त्यांनी आता कामगार बेरोजगार होणार असल्याचे कारण पुढे केले आहे. त्याच वेळी पालिकेने मात्र कारखान्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ४ आणि ५ मध्ये ५०० हून अधिक जीन्स कारखाने आहेत. त्यांच्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट वालधुनी नदीत सोडतात. त्यामुळे ती नदी प्रदूषित झाली आहे. मृतावस्थेत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हरित लवादाने यापूर्वीच उल्हास नदीसह वालधुनी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अखेर उल्हास नदी प्रदूषित करणाऱ्या खेमाणी नाल्याचा प्रवाह बदल्याचे काम पालिकेने सरकारच्या मदतीने सुरू केले आहे.पर्यावरणमंत्री कदम यांनी वालधुनी व उल्हास नदीच्या प्रदूषणाबाबत पालिका आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता कलई सेलवन, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बेकायदा जीन्स कारखाने सांडपाणी थेट नदीत सोडत असल्याबद्दल काय कारवाई केली, असा प्रश्न प्रदूषण मंडळासह पालिका आयुक्तांना केला आणि १० दिवसांत कारवाई करून तसा अहवाल पाठवण्याचा आदेशही दिला.११० कारखान्यांना नोटिसा पालिकेने ११० जीन्स कारखान्यांना कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली आहे. तसेच परवान्यासह इतर कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. यातील ३८ कारखान्यांची पाणीजोडणी तोडल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. मुदतीत कागदपत्रे सादर न कारखान्यांची वीज तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. जीन्स कारखान्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची लेखी हमी दिल्यानंतरच या कारवाईवर तोडगा काढला जाणार आहे.कारखान्यांवर कारवाई अटळ शहरातील ९५ टक्के कारखान्यांकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याने कारवाई अटळ आहे. वर्षभरापूर्वी कारखान्यांवर कारवाई सुरू झाली होती. कारखानामालकांच्या संघटनेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच जिल्हास्तरावरील दबंग नेत्यांनी मध्यस्थी करत कारवाईत अडथळा आणला होता.नद्यांच्या शुद्धीकरणासाठी निधीची मागणीठाणे जिल्ह्यातील वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने निधी देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी लोकसभेत केली. वालधुनी नदीचे नाल्यात रूपांतर झाले असून तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य सरकारने वालधुनी नदी प्राधिकरणाची स्थापना केली. तिच्या शुद्धीकरणाचा खर्च ६५० कोटी रु पये आहे. तो स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावा, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, पालिकांची ती क्षमता नाही. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळण्यात आला आहे. त्यासाठी केंद्राने निधी देण्याची मागणी त्यांनी केली.