शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार प्रतिष्ठानचा सर्वपक्षीयांना दे धक्का!

By admin | Updated: May 27, 2017 02:05 IST

येथील नगरपरिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरु होऊन अवघ्या तासाभरात बुध निहाय निकाल जाहिर झाला

हुसेन मेमन। लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : येथील नगरपरिषदेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरु होऊन अवघ्या तासाभरात बुध निहाय निकाल जाहिर झाला. यात भरत पाटील प्रणित जव्हार प्रतिष्ठान ने जव्हार मधील सर्वपक्षियांना धक्का देत चारही जागांवर सरशी मिळवली. आदिवासी भवन येथे ही मत मोजणी पार पडली. पवनीत कौर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. या निकालामुळे जव्हारच्या राजकारणाला कलाटणी मिळाली असून सर्व पक्षियांना जनतेने जागा दाखवली असल्याचे बोलले जात आहे.प्रभाग क्र. १ मधून अशोक गावंड यांनी बंडखोरी करून स्वबळावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व स्वबळावर ४२४ मते मिळविली असून अवघ्या १६४ मतांनी त्यांचा पराभव झाल्यामुळे एका जागेवर सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार राजेश रजपुत यांनी विजय मिळविला आहे. मात्र, प्रतिष्ठानच्या या विजयाने सगळ्यांनाच धक्का दिला असून यापुढे नगरपरिषदेची होणारी मुख्य निवडणूकीतही जव्हारमधील सर्व पक्षाना तगडे आव्हान निर्माण झाले आहे.पाच जागांवरील उमेदवार अपात्र ठरल्यानंतर या जागांसाठी जव्हारची पोटनिवडणुक झाली मात्र सुरवातीला ही निवडणूकच नको कारण अवघ्या काही महीन्यांवर मुख्य निवडणूक होणार असल्याचे सर्वपक्षीयानी बहीष्काराची भूमिका घेतली होती. मात्र जव्हार प्रतिष्ठानने ही निवडणूक लढण्याचे जाहिर केल्यानंतर याला शह देण्यासाठी कोणत्याही पक्षाचे चिन्ह न वापरता आपलेच उमेदवार अपक्ष म्हणून उतरवून प्रतिष्ठानला शह देण्याचे काम केले. मात्र, प्रतिष्ठानचे भरत पाटील यांची प्रभाग १ मधील उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने उर्वरित ४ जागांवर प्रतिष्ठानचा उमेदवार विरूध्द सर्वपक्षीय अशी लढत झाल्याचे चित्र होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीत जव्हार प्रतिष्ठानने विरोधी उमेदवारांना चारीमुंड्या चित करुन आपला झेंडा जव्हारमध्ये रोवल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या निकालामुळे काही महीन्यांवर येऊन ठेपलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये अनेक समिकरणे बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.मतदारांना हे नाही आवडलं ?मुळात जव्हार नगरपरिषद निवडणूकीत जव्हारकरानी संपूर्ण सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली होती. १७ पैकी तब्बल १४ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला होता. मात्र, मध्यंतरीच राष्ट्रवादीतुन फूटुन १० जणानी वेगळा गटस्थापन केल्यामुळे नगरपरिषदेचा जास्त वेळ या राजकारणातच गेला. त्यातच पाच नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे पोटनिवडणुक लागली होती. त्यानंतर सर्वपक्षियांनी घेतलेली भूमिका, प्रतिष्ठान लावून धरलेली भुमिका तसेच पुर्वीचे कुरघोडीचे राजकारण याचा विचार करुन जव्हरच्या जनतेने मतपेटीतून आपला कौल दिला.