शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

जावसईचा ओसाड डोंगर आता होणार हिरवागार!

By admin | Updated: April 24, 2017 23:56 IST

गेल्या वर्षी जावसई येथील डोंगरावर वन विभागाने मोठी मोहीम हाती घेत तब्बल ५३ हजार ७०० वृक्षांची लागवड केली होती. या वृक्षांचे

पंकज पाटील / अंबरनाथगेल्या वर्षी जावसई येथील डोंगरावर वन विभागाने मोठी मोहीम हाती घेत तब्बल ५३ हजार ७०० वृक्षांची लागवड केली होती. या वृक्षांचे संवर्धन वन विभागाने केले असून ९० टक्के वृक्ष जगवण्यात त्यांना यश आले आहे. यंदा उन्हाळ्यातही हे वृक्ष तग धरून असल्याने पावसाळ्यात या वृक्षांची चांगली वाढ होईल. यामुळे पावसाळ्यात संपूर्ण डोंगरहिरवागार होणार आहे. अंबरनाथ तालुक्याच्या एका टोकाला असलेले जावसई गाव नेहमीच पाणीसमस्येसाठी प्रसिद्ध होते. मात्र, आता या गावाने वनसंपदा संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. या गावाला लागून असलेला परिसर ओसाड होता. तेथे वनसंपदा निर्माण करण्याचे काम वन विभागाचे अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी हाती घेतले. पहिल्या पावसात त्यांनी तब्बल ५३ हजार ७०० वृक्ष या डोंगरावर लावण्याचे लक्ष्य हाती घेतले. त्यासाठी पावसाच्या आधीच या डोंगरावर खड्डे खोदले. वृक्ष लागवड झाल्यावर जनावरे त्या वृक्षांचे नुकसान करतात, हे लक्षात घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठा नाला खोदण्यात आला. त्यामुळे वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी या जनावरांना जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यानंतर, १ जुलैपासून या वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली. उन्हाळ्यात पाणी जरी मिळाले नाही, तरी ते वृक्ष तग धरून राहतील, अशाच जातींच्या वृक्षांची निवड करून या ठिकाणी त्याचे वृक्षारोपण करण्यात आले.