शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

जव्हार आरटीओत नागरिकांचा होतो खोेळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:22 IST

अनेक तास पाहावी लागते वाट : अधिकारी येतात स्वत:च्या मर्जीनुसार

हुसेन मेमन लोकमत न्यूज नेटवर्क जव्हार : जव्हार प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई-विरार यांच्या माध्यमातून जव्हार येथे गुरुवारी आरटीओ कॅम्प चालविला जातो. मात्र, या कॅम्पला आरटीओचे अधिकारी आपल्या मर्जीनुसारच्या वेळेत येत असल्याने नागरिकांना अनेक तास वाट पाहत बसावे लागते. परिणामी, नागरिकांचा मोठा खोळंबा होत आहे. जव्हार येथे वाडा मार्गावर आमराई गार्डन येथे एका माळावर वाहनचालकांची पाहणी करून त्यांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याची व अन्य कामे आरटीओकडून होतात. अनेक वर्षांपासून हा कॅम्प सुरू असला तरी अद्यापही कायमस्वरूपी जागा आरटीओला उपलब्ध होऊ शकलेली नाही.

वाहनचालकाने वाहन चालविण्याचा परवाना मिळावा यासाठी येथे नोंदणी केली असता त्याला आरटीओमार्फत भेटीसाठी ठरावीक वेळ दिली जाते. जी साधारण सकाळी ११ च्या सुमाराची असते. वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातील वाहनचालक परवान्यासाठी येथे वेळेत उपस्थित राहून रांगा लावतात. मात्र येथील अधिकारी मनात येईल तेव्हा, स्वत:च्या वेळेप्रमाणे उपस्थित राहतात. त्यामुळे ते अधिकारी येईपर्यंत नागरिकांना उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी, वाहनचालकांचा हिरमोड होतो. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन नोंदणी करून दलालांकडून होणारी फसवणूक टाळण्याचा चांगला निर्णय घेतला असला तरी आजही आरटीओच्या बाजूला दलालांचाच वेढा दिसतो. सामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. 

मला सकाळी ११ ची वेळ दिली होती ; मात्र, अधिकारी १.४० ला आल्याने उन्हात ताटकळत राहावे लागले.- मुकेश पाटील, वाहनचालक

ऑनलाइनद्वारे नोंदणीने लूट थांबेल, अशी अपेक्षा होती.मात्र, आरटीओभोवती दलालांची गर्दी आहे.  - भीमराव बागुल, अध्यक्ष, गवंडी बांधकाम मजूर संघटना

टॅग्स :thaneठाणे