शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षकांचीच जनता दरबाराला दांडी!

By admin | Updated: August 12, 2016 01:28 IST

पोलिसांविरोधात असलेला रोष वसईत गुरूवारी झालेल्या जनता दरबारात प्रकट झाला खरा परंतु नागिरकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वसई : पोलिसांविरोधात असलेला रोष वसईत गुरूवारी झालेल्या जनता दरबारात प्रकट झाला खरा परंतु नागिरकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक तक्रारीत गुन्हे दाखल होते तर काही तक्रारी अदखलपात्र होत्या असे पोलिसांनी स्पष्ट केले. वसईतल्या नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वसई जनआंदोलन समितीच्या पुढाकाराने हा जनता दरबार आयोजित क़रण्यात आला होता. मात्र, आधी वेळ देऊनही पोलीस अधिक्षक जनता दरबारात आल्या नाहीत. तर अपर पोलीस अधिक्षकही बैठकीसाठी निघून गेल्याने पोलीस उपअधिक्षकांनी तक्रारी ऐकून त्यांचा निपटारा केल्याने प्रारंभी संतापलेले जनआंदोलनाचे र्काकर्ते नंतर शांत झाले.वसई विरार मधल्या पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी पोलीस नोंदवून घेत नाहीत असा आरोप जनआंदोलन समितीने केला होता. त्यासाठी नागरिकांचा हेल्प डेस्क स्थापन क़रण्यात आला होता. ज्या नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. तसेच पंधरा आॅगस्ट नंतर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे पालघरच्या पोलीस अधिक्षकांनी गुरूवारी वसईत जनता दरबाराचे आयोजन केले होते. मात्र पोलीस अधिक्षिका शारदा राऊत या दरबारात उपस्थित राहू शकल्या नाहीत. तसेच अपर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांच्या कार्यालयातच हा जनता दरबार असतांनाही ते ही पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले होते. त्यामुळे जनआंदोलनाचे कार्यकर्ते संतापले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विभागीय पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी हा दरबार घेतला. त्यात ४१ तक्रारी करण्यात आल्या. त्यात फसवणूक, घोटाळे, महिला अत्याचार आदींचा समावेश होता. सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावून घेण्यात आले होते. आमच्याकडे आलेल्या तक्रारदारांचे आम्ही निरसन केले आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्याबाबात सूचना दिल्या. अनेक तक्रारींमध्ये यापूर्वीच गुन्हे दाखल होते असे उपअधिक्षक अनिल आकडे यांनी सांगितले. बलात्कारा प्रकरणी गुन्हा दाखल करत नाही अशी तक्रार होती पण त्याही प्रकरणात आरोपीला अटक केली होती असे ते म्हणले. काही तक्रारींमध्ये तथ्य नव्हते. अनेक तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या होत्या. काही तक्रारी पालिकेविरोधातील होत्या अशीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक नागरिकांच्या तकारी नोंदवून घ्याव्यात तसेच पिडितांना ताटकाळत ठेवू नये अशा सूचना उपअधिक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिल्या. तक्रारदारांचे समाधान झाले नाही तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)