शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जन आंदोलनांची संघर्ष समितीचे २७ मेपासून ४०० तहसील कार्यालयांसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

ठाणे : जनता साथीच्या संकटात सर्व प्रकारे भरडली जात असताना कॉर्पोरेट्सना जबरदस्त अच्छे दिन देऊ केले आहेत, याचा आम्ही ...

ठाणे : जनता साथीच्या संकटात सर्व प्रकारे भरडली जात असताना कॉर्पोरेट्सना जबरदस्त अच्छे दिन देऊ केले आहेत, याचा आम्ही २६ मे च्या बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा दिवसभर निषेध करणार आहोत. तसेच २७ ते ३० मे या काळात राज्यातील ३६ जिल्हाधिकारी व ४०० तहसील कार्यालये येथे सरकारच्या जनविरोधी कारभाराविरुद्ध निदर्शने करून निवेदन देण्यात येईल. यात केंद्र सरकारचा निषेध म्हणून घरांवर व जागोजागी काळे झेंडेही लावण्यात येणार असून, कोविडचे नियम पाळून हे आंदोलन केले जाणार असल्याचे जन आंदोलनांची संघर्ष समितीने सांगितले.

यात २६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा (जयंती) आहे. त्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचे सम्यक विचार मांडणारे धनाजी गुरव व कॉ. भीमराव बनसोड यांचे व्याख्यान समितीतर्फे आयोजित केले आहे.

जन आंदोलनांची संघर्ष समितीसह दिल्ली येथे संयुक्त किसान मोर्चा आणि अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी २६ मे हा दिवस मोदी सरकार निषेध दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले आहे.

- या आहेत मागण्या

केंद्र सरकारने, शेतकरी विरोधी तीन जुलमी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांशी त्वरित चर्चा सुरू करा, कामगारांनी लढून मिळवलेल्या हक्कांना तिलांजली देणारे ४ लेबर कोड रद्द करा, कोरोनाच्या साथीवर सर्व देशवासीयांना मोफत लस आणि उपचार द्या, हाफकीन इन्स्टिट्यूटसारख्या देशातील सार्वजनिक संस्थांना लस उत्पादन करण्यास त्वरित कार्यान्वित करावे, सर्व गरजू जनतेला कार्ड असो वा नसो सर्वांना किमान ४ महिने (एप्रिल ते जुलै) रेशन देण्यात यावे, यांसारख्या इतर प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.