शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

भातसा धरणातून पाणी साेडून जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी चार मीटर पाणीपातळी ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस वाढत आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी चार मीटर पाणीपातळी शिल्लक असली, तरी नदीला वाट करून देण्यासाठी शनिवारी २.३० वाजता भातसा धरणावर जलपूजन करण्यात आले. त्यासाठी धरणाचे दोन दरवाजे २५ सेंटीमीटर उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावेळी शहापूरच्या आमदार दौलत दरोडा, आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद ठाणे कृषी सभापती संजय निमसे, कार्यकारी अभियंता योगेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उपस्थित मनोज विशे आदी उपस्थित होते.

मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणावर जलपूजन करण्यात आले. प्रथेप्रमाणे नदीला वाट करून द्यायची असते आणि वाट करून देताना या नदीला साडीचोळी अर्पण केली जाते व दुपारी २.३० वाजता या धरणाची पातळी १३८ मीटर असताना जलपूजन करण्यात आले. मात्र, धरण भरून वाहण्यासाठी १४२ इतकी पाणी पातळी आवश्यक आहे. त्यामुळे धरण भरून वाहण्यासाठी अजूनही काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. धरणाची पूर्ण संचय पातळी १४२.०७ मीटर असून, शनिवारपर्यंत १३७.८६ मीटर पातळी गाठली. धरण क्षेत्रात आज ९.०० मिमी पावसाची नाेंद झाली. आतापर्यंत या क्षेत्रात १९२३.०० मिमी पाऊस झाला आहे.

भातसा धरणाची क्षमता

पूर्ण संचय पातळी : १४२.०७ मीटर

२१ ऑगस्टपर्यंत पाणी पातळी : १३७.८६ मीटर

उपयुक्त पाणीसाठा : ८२९.९८१ द.ल.घ.मी.

एकूण पाणीसाठा : ८६३.९८१ द.ल.घ.मी.

पूर्ण संचय साठा : ९७६.१०

पाणीसाठी : ८८.०९ टक्के