शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गंधीमुळे क्षणभरही उभे राहणे मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:23 IST

अस्वच्छ कल्याण स्थानक : अडीच लाख प्रवाशांकरिता केवळ तीन स्वच्छतागृहे

डोंबिवली : कल्याण रेल्वेस्थानकात पाऊल ठेवताच रेल्वेमार्गातील विष्ठा, कचरा यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना तेथे क्षणभरही उभे राहावेसे वाटत नाही. मोठमोठ्या घुशी रेल्वेमार्ग, फलाटावर वावरत असतात. कोपरे, भिंती यावर पान, तंबाखू खाऊन पिचकाºया मारलेल्या असतात. लांब पल्ल्यांच्या दररोज अडीचशे गाड्यांची होणारी वाहतूक, तर कर्जत-कसाºयाकडे जाणाºया उपनगरीय लोकलच्या ८०० फेºया यामुळे दिवसभर या स्थानकात कमालीची गर्दी असते. रात्रीच्यावेळी या स्थानकाचा ताबा भिकारी, गर्दुल्ले, भटके कुत्रे घेतात. त्यामुळे देशभरातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वेस्थानकांच्या यादीत कल्याणचा लागलेला तिसरा क्रमांक ही आश्चर्याची नव्हे तर खेदाचीच बाब आहे.कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ४ ते ६ या ठिकाणी मुख्यत्वे बाहेरगावाकडे जाणाºया व येणाºया गाड्या थांबतात. या फलाटांवर प्रचंड गर्दी व घाण असल्याने दुर्गंधी येते. त्या तुलनेत अन्य तीन फलाटांची स्थिती बरी आहे. स्थानकात सर्वत्र माश्या घोंघावत असतात. त्यामुळे येथील फलाटांवरील खाद्यपदार्थ सोडाच, पण पाणीदेखील प्यावेसे वाटत नाही. दिवसाकाठी किमान अडीच लाख प्रवाशांचा वावर या स्थानकात असतो. बाहेरगावच्या गाड्यांंमधून लाखोंच्या संख्येने येणारे लोंढे कल्याणमध्ये उतरतात व येथूनच एकतर अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा वगैरे स्थानकांच्या दिशेने किंवा दिवा-मुंब्रा स्थानकांकडे जातात. बाहेरगावाकडील गाड्या उशिरा येतात किंवा सुटतात. त्यामुळे बºयाचदा अन्य ठिकाणांहून आलेली कुटुंबे येथेच आपल्यासोबत आणलेले अन्न खातात. उरलेले तेथेच फेकून देतात. लहान मुलांना स्थानकावरच नैसर्गिक विधीकरिता बसवतात. स्थानकातच पथारी पसरून झोपतात.प्रवाशांसाठी एसी डॉरमेटरीची सुविधा असली, तरी त्यात अवघे ५० ते ७० प्रवासीच थांबू शकतात. लांब पल्ल्यांच्या गाड्या फलाट क्र. ४ ते ६ वरून सुटतात. पण, ही डॉरमेटरीची सुविधा फलाट १ वर असल्याने प्रवासी येथवर येणे टाळतात.स्थानकात सकाळी, सायंकाळी पाऊल ठेवायला जागा नसते, तर सफाई काय करणार? केवळ तीन स्वच्छतागृहे असून अडीच लाख प्रवाशांसाठी ती अपुरी आहेत. या शौचालयांमध्ये सुविधांची बोंबाबोंब आहे. तेथे नैसर्गिक विधी करण्याकरिता पैसे घेतले जातात. मात्र, स्वच्छता ठेवली जात नाही. अनेक शौचालयांत पाण्याचीही धड सोय नाही. रात्री गर्दुल्ल्यांनी शौचालयांचा ताबा घेतलेला असल्याने प्रवासी तेथे जाण्याचे टाळतात. जागा मिळेल तेथे आडोसा पाहून नैसर्गिक विधी करतात.धक्कादायक बाब म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. त्यामुळे त्यांची कुचंबणा होते. ‘प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र’ अशी हाक राज्य सरकारने दिलेली असली, तरी या स्थानकात पाणी, शीतपेये यांच्या बाटल्या, वेफर्स व खाद्यपदार्थांची पाकिटे अस्ताव्यस्त पडलेली असतात. कचरावेचक मुले, महिला रेल्वेमार्गात उतरून किंवा फलाटावर फिरून ते कचरा गोळा करत असतात. स्थानकात तीन पादचारी पूल असून ते पुरेसे नाहीत. कल्याण दिशेकडील पूल अरुंद आहे, तसेच मुंबई दिशेकडील पूल जुना झाल्याने त्याला डागडुजीची गरज आहे. मधला नवा एकमेव पूल सुस्थितीत आहे. वर्षानुवर्षे स्थानकाचा विस्तार झालेला नाही. वाणिज्य विभागाच्या माहितीनुसार, या स्थानकातून दिवसाला एक लाख तिकिटांची विक्री होते. त्यातून दररोज ७० लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, त्या तुलनेत स्थानकातील सुविधांवर रेल्वे पैसे खर्च करत नाही. त्याचा परिणाम अस्वच्छतेत दिसून येतो.ट्रॅकमध्ये टाकण्यात येणाºया खडींच्या बॅगा येथे इतस्तत: टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानकातील काही भागांत विनाकारण गर्दी झाली आहे.कुठेही कम्पाउंड वॉल नाही, त्यामुळे स्थानकाच्या आजूबाजूला राहणारे त्यांचा कचरा सर्रास स्थानकात टाकतात. तो नेमका उचलायचा कोणी, महापालिकेने की रेल्वेने? यावरून वाद होतात. पावसाळ्यात तर स्थानकातील परिस्थिती आणखी बिघडते. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान